शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

वरूड तालुक्यात संत्रा प्रकल्पाची उभारणी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST

दर पंचवार्षिकला निव्वळ घोषणा : २० हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन वरूड (अमरावती) : सन २०२१ च्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यातील ...

दर पंचवार्षिकला निव्वळ घोषणा : २० हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन

वरूड (अमरावती) : सन २०२१ च्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांसाठी वरूड व मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, वरूड-मोर्शीकरांसाठी संत्रा प्रक ल्पाची घोषणा नवी नाही. संत्रा उत्पादकांना प्रतीक्षा आहे ती अर्थसंकल्पातील घोषणेच्या अंमलबजावणीची, संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणीची.

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारुपास असलेला वरुड तालुका भूजल पातळी खालावल्याने वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. तरीदेखील नगदी पीक म्हणून येथील शेतकरी संत्रा पिकवितो. मात्र, बाजारपेठ नसल्याने मृग, आंबिया बहारालाच संत्र्याचे भाव पाडले जातात. एकीकडे उद्योगाअभावी संत्र्यावर प्रक्रि या होऊ शकत नाही. संत्र्यासह मोसंबीवर प्रक्रिया करणारा उद्योग आल्यास संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येणार, अशी येथील शेतकºयांची भाबडी आशा आहे. मात्र, प्रत्येक अधिवेशनात घोषणांचा पाऊस पडतो. डीपीआर बनविण्याची वेळ आली की, येथील प्रकल्प दुसरीकडे पळविण्याचा घाट रचला जातो. मोर्शी व वरूड तालुक्यात अनेकदा संत्रा प्रकल्पांची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात येथे संत्रा प्रकल्प आणण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. आता पून्हा अत्याधुनिक संत्रा प्रकल्पाची घोषणा झाली. अपेक्षा पल्लवित झाल्या असल्या तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारणार काय? अशी शंका संत्रा उत्पादकांना आहे. तर यापूर्वी आलेले काही प्रकल्प बंद पडले तर कुणी नांदेडला पळविले. मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथील संत्रा प्रकल्प उभारणीच्या तिसºया दिवशीपासून बंद पडला आहे.

नावलौकीक लयाला

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरुड तालुक्याचा नावलौकीक आहे. तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर जमिनीत संत्रा आहे. मात्र पाणी टंचाईचा प्रश्न उदभवल्याने हजारो संत्रा बागांवर कुºहाडी चालल्या. यामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया वाळंवट होण्याच्या मार्गावर होता. येथील कृषकांनी एकापेक्षा एक असे प्रयोग करुन ६७ वर्षात संत्रा जगविला. मात्र, तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने आलेली संत्री व्यापाºयांना विकण्याशिवाय संत्रा उत्पादकांकडे अन्य पर्यायच उपलब्ध झाला नाही. स्वबळावर उपाययोजना करुन संत्रा जगविण्याचे प्रयत्न सुरु आहे. संत्रा फळांना परप्रांतिय बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक डबघाईस आला आहे.

बॉक्स २

असे आलेत न् गेलेत

तालुक्यात १९५७ मध्ये शेंदूरजनाघाटमध्ये पहिली ज्यूस फॅक्टरी सहकारी तत्वावर उभारली गेली. त्या काळात देशाच्या मुख्य शहरात ज्यूस पाठविण्याचा प्रयत्न झाला. राजाश्रय न मिळाल्याने पाच वर्षात फॅक्टरी कर्जबाजारी होवून ती जागा मध्यवर्ती बॅकेला विकावी लागली. नंतर वरुडमध्ये सोपॅक ही खासगी संत्रा प्रक्रिया करणारी फॅक्टरी १९९२ मध्ये उभी राहिली. तीही बंद पडली. तत्कालीन कृषि मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी सिंचनासह मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे शासकिय संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला. तोही सुरु होताच बंद पडला. यानंतर हा प्रकल्प एका संत्रा उत्पादक संस्थेला भाडेतत्वावर देण्यात आला. मात्र त्यातून प्रक्रिया झालीच नाही

सेंट्रल डेस्कसाठी