शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

वरूड तालुक्यात संत्रा प्रकल्पाची उभारणी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST

दर पंचवार्षिकला निव्वळ घोषणा : २० हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन वरूड (अमरावती) : सन २०२१ च्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यातील ...

दर पंचवार्षिकला निव्वळ घोषणा : २० हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन

वरूड (अमरावती) : सन २०२१ च्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांसाठी वरूड व मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, वरूड-मोर्शीकरांसाठी संत्रा प्रक ल्पाची घोषणा नवी नाही. संत्रा उत्पादकांना प्रतीक्षा आहे ती अर्थसंकल्पातील घोषणेच्या अंमलबजावणीची, संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणीची.

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारुपास असलेला वरुड तालुका भूजल पातळी खालावल्याने वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. तरीदेखील नगदी पीक म्हणून येथील शेतकरी संत्रा पिकवितो. मात्र, बाजारपेठ नसल्याने मृग, आंबिया बहारालाच संत्र्याचे भाव पाडले जातात. एकीकडे उद्योगाअभावी संत्र्यावर प्रक्रि या होऊ शकत नाही. संत्र्यासह मोसंबीवर प्रक्रिया करणारा उद्योग आल्यास संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येणार, अशी येथील शेतकºयांची भाबडी आशा आहे. मात्र, प्रत्येक अधिवेशनात घोषणांचा पाऊस पडतो. डीपीआर बनविण्याची वेळ आली की, येथील प्रकल्प दुसरीकडे पळविण्याचा घाट रचला जातो. मोर्शी व वरूड तालुक्यात अनेकदा संत्रा प्रकल्पांची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात येथे संत्रा प्रकल्प आणण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. आता पून्हा अत्याधुनिक संत्रा प्रकल्पाची घोषणा झाली. अपेक्षा पल्लवित झाल्या असल्या तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारणार काय? अशी शंका संत्रा उत्पादकांना आहे. तर यापूर्वी आलेले काही प्रकल्प बंद पडले तर कुणी नांदेडला पळविले. मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथील संत्रा प्रकल्प उभारणीच्या तिसºया दिवशीपासून बंद पडला आहे.

नावलौकीक लयाला

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरुड तालुक्याचा नावलौकीक आहे. तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर जमिनीत संत्रा आहे. मात्र पाणी टंचाईचा प्रश्न उदभवल्याने हजारो संत्रा बागांवर कुºहाडी चालल्या. यामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया वाळंवट होण्याच्या मार्गावर होता. येथील कृषकांनी एकापेक्षा एक असे प्रयोग करुन ६७ वर्षात संत्रा जगविला. मात्र, तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने आलेली संत्री व्यापाºयांना विकण्याशिवाय संत्रा उत्पादकांकडे अन्य पर्यायच उपलब्ध झाला नाही. स्वबळावर उपाययोजना करुन संत्रा जगविण्याचे प्रयत्न सुरु आहे. संत्रा फळांना परप्रांतिय बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक डबघाईस आला आहे.

बॉक्स २

असे आलेत न् गेलेत

तालुक्यात १९५७ मध्ये शेंदूरजनाघाटमध्ये पहिली ज्यूस फॅक्टरी सहकारी तत्वावर उभारली गेली. त्या काळात देशाच्या मुख्य शहरात ज्यूस पाठविण्याचा प्रयत्न झाला. राजाश्रय न मिळाल्याने पाच वर्षात फॅक्टरी कर्जबाजारी होवून ती जागा मध्यवर्ती बॅकेला विकावी लागली. नंतर वरुडमध्ये सोपॅक ही खासगी संत्रा प्रक्रिया करणारी फॅक्टरी १९९२ मध्ये उभी राहिली. तीही बंद पडली. तत्कालीन कृषि मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी सिंचनासह मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे शासकिय संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला. तोही सुरु होताच बंद पडला. यानंतर हा प्रकल्प एका संत्रा उत्पादक संस्थेला भाडेतत्वावर देण्यात आला. मात्र त्यातून प्रक्रिया झालीच नाही

सेंट्रल डेस्कसाठी