शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

वडाळी तलाव गाळमुक्त केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:29 IST

शहरालगतच्या ब्रिटिशकालीन वडाळी तलावात प्रमाणापेक्षा अधिक गाळ साचल्याने कधी न दिसलेली तलावातील जमीन आता उघडी पडू लागली आहे. या ऐतिहासिक तलावाला दोन तलावांची साथ असल्याने पाण्याचा ‘फ्लो’ कायम आहे.

ठळक मुद्देजलस्तर कमी, मृतसाठा वाढतोय : महापालिका उद्यान विभागाचे दुर्लक्ष

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरालगतच्या ब्रिटिशकालीन वडाळी तलावात प्रमाणापेक्षा अधिक गाळ साचल्याने कधी न दिसलेली तलावातील जमीन आता उघडी पडू लागली आहे. या ऐतिहासिक तलावाला दोन तलावांची साथ असल्याने पाण्याचा ‘फ्लो’ कायम आहे. मात्र, तलावाची खोली गाळाने भरल्यामुळे मृतसाठाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अवघ्या महिनाभरात हा तलाव कोरडा पडण्याचे संकेत मिळू लागले आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात उमरावती नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहराला याच वडाळी तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. हा ऐतिहासिक तलाव असून, याला 'सपोर्ट' म्हणून त्याचेही वर दोन तलावांची ब्रिटिश शासनाने निर्मिती केली होती. त्यामुळे वडाळी तलावावर तळ गाठण्याची वेळ कधीच आली नव्हती. ब्रिटिशांनी या तलावाची निर्मिती तंत्रशुद्ध पद्धतीने केली असून, शहराला पाणीपुरवठा ‘ग्रेव्हीटी’ पद्धतीने होत होता. मात्र, वाढती लोकसंख्या व शहरीकरणाचा व्याप पाहता तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात सिंभोरा धरणाची निर्मिती झाली. तेव्हापासून या तलावाचा होणारा पाणीपुरवठा थांबला. परंतु सद्यस्थितीत या तलावाच्या भरवशावर दोन पर्यटन स्थळे निर्माण करण्यात आली आहेत. वडाळी गार्ड व बांबू गार्डन अशी या प्रसिद्ध पर्यटन स्थळांनी नावे होत. अमरावतीकरांना शिण घालवण्यासाठी वा मनमोकळेपणाने पक्ष्यांचा मनाला आनंद देणारा आवाज ऐकण्यासाठी हे पूरक असून, येथे विद्यार्थ्यांसह वृद्धांची मोठी आवक असते. परंतु, ज्या तलावाच्या पाण्यावर हे पर्यटन स्थळ फुलले तेथे पाणीच शिल्लक राहणार नसेल तर येथील हिरवळ कशी बरी जिवंत राहील, असा सवाल आता नागरिकांना सतावत आहे. या समस्येवर मात करणे तेव्हाच शक्य होईल, जोपर्यंत तलावातील गाळ व वनस्पती काढली जाणार नाही, हे वास्तव आहे. या तलावाचे खोलीकरण याच महिन्यात केल्यास ते सोयीचे तर होणार असून, यापुढेही पाण्याची तमतरता भासणार नाही. यासंदर्भात महापालिकेचे शहर अभियंता जीवन सदार यांचेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.ब्रिटिशकालीन चिमणी बंदावस्थेतवडाळी तलाव हे शहरालगतच असून, त्यातील पाणी शहराच्या मध्यभागातून जाणाºया अंबानाल्यातून वाहते. त्यामुळे तलाव फुटल्यास शहराला धोका संभवतो. याबाबत सतर्कता म्हणून ब्रिटिश शासनाने तंत्रशुद्ध पद्धतीने त्याची निर्मिती केलेली आहे. जेव्हा पाण्याची पातळी वाढेल तेव्हा तेथे बसविलेल्या लोखंडी खांबावरील चिमणीतून पाण्याची धार वाहायला लागायची. अशा वेळी तलावाने धोक्याची पातळी गाठल्याचे लक्षात यायचे. त्यामुळे नालाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला जायचा. मात्र, ती चिमणी कित्येक वर्षांपासून बंदावस्थेत असताना महापालिका उद्यान विभाग याकडे अजिबात लक्ष देत नसल्याचे निदर्शनास आले आहे.हा तलाव दोन्ही पर्यटन स्थळांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या महिन्यात गाळ काढणे शक्य आहे. पुढे धोकादेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- अशोक बुंधे,व्यवस्थापक, वडाळी गार्डनसदर कार्य शहर अभियंता व बांधकाम विभागांतर्गत येत असून, वडाळी गार्डन बीओटी तत्त्वावर दिलेले आहे.- प्रमोद येवतीकर,उद्यान अधीक्षक, महापालिका