शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

जाणे, निस्ताने, बारब्दे, काळेंवर कारवाई केव्हा ?

By admin | Updated: June 23, 2017 00:13 IST

चार नवजात शिशुंच्या मृत्यूप्रकरणात दोषी असणारे अधिष्ठाता दिलीप जाणे, पंकज बारब्दे व प्रतिभा काळे

पोलीस आयुक्तांना निवेदन : शिशुंच्या पालकांची न्यायासाठी भटकंतीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार नवजात शिशुंच्या मृत्यूप्रकरणात दोषी असणारे अधिष्ठाता दिलीप जाणे, पंकज बारब्दे व प्रतिभा काळे यांच्यावर कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न पालकांनी पुन्हा केला आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांसह पालकांनी गुरुवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदनाद्वारे दोषींवर कारवाईची मागणी केली. रिपाइंकडून पोलिसांना तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. त्यामध्ये दोषी डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा रिपाइंने पोलीस आयुक्तांना दिला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात चार नवजात शिशुंचा चुकीच्या औषधोपचाराने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा रोष अनावर झाला होता. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी डॉ.भूषण कट्टा, परिचारिका विद्या थोरात व जामनिकला अटक केली. सद्यस्थितीत हे तिघे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. ही कारवाई योग्य असली तरी, या प्रकरणात डीन डॉ. जाणे, बालरोग विभागप्रमुख डॉ.राजेंद्र निस्ताने, बारब्दे व काळे हेही जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सहआरोपी करावे, अशी मागणी पालक माधुरी बंटी कावरे, शिल्पा दिनेश विरुळकर, पूजा आशिष घरडे यांनी केली आहे. याप्रकरणी शिशुंचे पालक राजकीय पक्षांसह प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या मागणीवर अद्याप प्रशासनाने विचार केला नसल्याची ओरड आहे.पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपाइंचा लढाशिशूंच्या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात पालकांनी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांना निवेदन सादर केले आहे. गुरुवारी पोलीस आयुक्तांना निवेदन देताना जिल्हा संघटक अमोल इंगळे, मनोज वानखडे, मनोज थोरात, आतीष डोंगरे, प्रशांत वाकोडे, गौतम मोहोड यांच्यासह शिशूंच्या पालकांचा सहभाग होता. दोषी डॉक्टरांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू, त्याच्या परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा रिपाइंकडून देण्यात आलेला आहे.