शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकीची दरवाढ, कापसाची केव्हा ?

By admin | Updated: March 12, 2017 00:33 IST

यंदाच्या हंगामात तूर, सोयाबीन भाव कोसळले असताना कापूस मात्र हमीच्या वरच आहे.

शेतकऱ्यांना आशा : निर्यातीसह देशांतर्गत उद्योगात वाढती मागणीअमरावती : यंदाच्या हंगामात तूर, सोयाबीन भाव कोसळले असताना कापूस मात्र हमीच्या वरच आहे. कापसाच्या गाठींची होत असलेली निर्यात, देशांतर्गत उद्योगात कापसाला असलेली मागणी व सरकीची होत असलेली भाववाढ यामुळे कापसाला किमान सहा हजारपर्यंत भाव मिळायला पाहिजे. मात्र त्या दराच्या आत कापसाचे भाव स्थिरावले असल्याने, कापसाला किमान सहा हजार भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. कित्येक हंगामाच्या तुलनेत यंदा प्रथमच कापसाच्या भावातील तेजीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सद्यस्थितीत कापसाच्या हंगामाला सुरूवात झाली. गतवर्षी दिवाळीला कापूस ५८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता. मात्र, जसजशी आवक वाढली तसतशी कापसाचा भाव कमी होत आहे. मात्र तरीही हा भाव शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा जास्तच आहे. मात्र, ज्या प्रमाणात सरकीचे भाव वाढत आहे, त्याप्रमाणात कापसाला भाव मिळत नसल्याची शेतकऱ्यांची खंत आहे. सद्यस्थितीत सरकीचे भाव २५०० ते २७०० रुपये क्विंटलपर्यंत आहे. त्यामुळे कापसाला किमान ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावयास पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशांतर्गत कापसाचे उत्पादन अधिक आहे व किमान ३ लाख क्विंटलपेक्षा अधिक गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत दीड लाख क्विंटल गाठींची खरेदी झालेली आहे. यंदा कापसाचे सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्र व गुजरातमध्ये होत आहे. या खालोखाल पंजाब, राजस्थान, हरियाणा, तेलंगना व आंध्रप्रदेशात देखील उत्पादन होत आहे. देशांतर्गत उद्योगात वाढती मागणीसह परदेशातदेखील कापसाची मागणी वाढली आहे. मागील वर्षी कापसाच्या गाठी शिल्लक होत्या मात्र, यंदा तशी स्थिती नाही. चीन, पाकिस्तान व बांगलादेशातदेखील कापसाची निर्यात सुरू झाली आहे व याचा परिणाम होऊन सरकीचे भाव वधारले आहे. मात्र, तुलनेत ५५०० ते ५८०० रुपये दरम्यान स्थिरावलेले कापसाचे भाव हे किमान सहा हजारापर्यंत पोहचतील असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला आहे. सोयाबीन, तुरीचे भाव कमालीचे घसरल्याने शेतकरी आधीच आर्थिक कोंडीच आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना कापसाचा आधार राहिला होता. व गतवर्षीपेक्षा यंदा भावदेखील समाधानकारक आहे. मात्र ज्याप्रमाणात सरकी व ढेपीची भाववाढ होत आहे. त्यातुलनेत कपाशीला भाव नाही.दीड दशकांपासून पणनची केंदे्र नावालाचलांब धाग्याच्या कापसाला सर्वाधिक असा ४०५० रुपये क्विंटल यंदाचा हमी भाव आहे. मागील वर्षी केवळ ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, खासगी बाजारात यापेक्षा अधिक भाव आहे. त्यामुळे शेतकरी पणनच्या खरेदी केंद्राकडे फिरकत नाहीत. किंबहुना दीड दशकापासून पणनच्या खरेदी केंद्रांची दैनावस्था आहे. जोवर हमीभावात वाढ होत नाही, तोवर अशीच स्थिती राहणार आहे. देशाच्या बाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. गाठीची निर्यातदेखील सुरू झाली आहे. सरकीच्या भावातही तेजी आली आहे. यामुळे कापसाच्या भावात थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र परदेशात पाहिजे तशी मागणी नाही. - संजय राठी, कापूस व्यावसायी