शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

सरकीची दरवाढ, कापसाची केव्हा ?

By admin | Updated: March 12, 2017 00:33 IST

यंदाच्या हंगामात तूर, सोयाबीन भाव कोसळले असताना कापूस मात्र हमीच्या वरच आहे.

शेतकऱ्यांना आशा : निर्यातीसह देशांतर्गत उद्योगात वाढती मागणीअमरावती : यंदाच्या हंगामात तूर, सोयाबीन भाव कोसळले असताना कापूस मात्र हमीच्या वरच आहे. कापसाच्या गाठींची होत असलेली निर्यात, देशांतर्गत उद्योगात कापसाला असलेली मागणी व सरकीची होत असलेली भाववाढ यामुळे कापसाला किमान सहा हजारपर्यंत भाव मिळायला पाहिजे. मात्र त्या दराच्या आत कापसाचे भाव स्थिरावले असल्याने, कापसाला किमान सहा हजार भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. कित्येक हंगामाच्या तुलनेत यंदा प्रथमच कापसाच्या भावातील तेजीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सद्यस्थितीत कापसाच्या हंगामाला सुरूवात झाली. गतवर्षी दिवाळीला कापूस ५८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता. मात्र, जसजशी आवक वाढली तसतशी कापसाचा भाव कमी होत आहे. मात्र तरीही हा भाव शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा जास्तच आहे. मात्र, ज्या प्रमाणात सरकीचे भाव वाढत आहे, त्याप्रमाणात कापसाला भाव मिळत नसल्याची शेतकऱ्यांची खंत आहे. सद्यस्थितीत सरकीचे भाव २५०० ते २७०० रुपये क्विंटलपर्यंत आहे. त्यामुळे कापसाला किमान ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावयास पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशांतर्गत कापसाचे उत्पादन अधिक आहे व किमान ३ लाख क्विंटलपेक्षा अधिक गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत दीड लाख क्विंटल गाठींची खरेदी झालेली आहे. यंदा कापसाचे सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्र व गुजरातमध्ये होत आहे. या खालोखाल पंजाब, राजस्थान, हरियाणा, तेलंगना व आंध्रप्रदेशात देखील उत्पादन होत आहे. देशांतर्गत उद्योगात वाढती मागणीसह परदेशातदेखील कापसाची मागणी वाढली आहे. मागील वर्षी कापसाच्या गाठी शिल्लक होत्या मात्र, यंदा तशी स्थिती नाही. चीन, पाकिस्तान व बांगलादेशातदेखील कापसाची निर्यात सुरू झाली आहे व याचा परिणाम होऊन सरकीचे भाव वधारले आहे. मात्र, तुलनेत ५५०० ते ५८०० रुपये दरम्यान स्थिरावलेले कापसाचे भाव हे किमान सहा हजारापर्यंत पोहचतील असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला आहे. सोयाबीन, तुरीचे भाव कमालीचे घसरल्याने शेतकरी आधीच आर्थिक कोंडीच आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना कापसाचा आधार राहिला होता. व गतवर्षीपेक्षा यंदा भावदेखील समाधानकारक आहे. मात्र ज्याप्रमाणात सरकी व ढेपीची भाववाढ होत आहे. त्यातुलनेत कपाशीला भाव नाही.दीड दशकांपासून पणनची केंदे्र नावालाचलांब धाग्याच्या कापसाला सर्वाधिक असा ४०५० रुपये क्विंटल यंदाचा हमी भाव आहे. मागील वर्षी केवळ ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, खासगी बाजारात यापेक्षा अधिक भाव आहे. त्यामुळे शेतकरी पणनच्या खरेदी केंद्राकडे फिरकत नाहीत. किंबहुना दीड दशकापासून पणनच्या खरेदी केंद्रांची दैनावस्था आहे. जोवर हमीभावात वाढ होत नाही, तोवर अशीच स्थिती राहणार आहे. देशाच्या बाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. गाठीची निर्यातदेखील सुरू झाली आहे. सरकीच्या भावातही तेजी आली आहे. यामुळे कापसाच्या भावात थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र परदेशात पाहिजे तशी मागणी नाही. - संजय राठी, कापूस व्यावसायी