शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेचे १५ लाख रूपये अनुदान केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

असाइनमेंट जिल्ह्यात २९ विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना अनुदान; २० प्रकरणे प्रलंबित, दोन वर्षांत ५३ मृत्यू अमरावती : पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाऱ्या ...

असाइनमेंट

जिल्ह्यात २९ विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना अनुदान; २० प्रकरणे प्रलंबित, दोन वर्षांत ५३ मृत्यू

अमरावती : पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षभरापासून सानुग्रह अनुदान मिळाले नाही, तर शासनाकडे या बाबीसाठी एकूण १५ लाख रुपये पडून आहेत. दोन वर्षांत ५३ विद्यार्थी अपघातात दगावले असून, यातील चार प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केली आहेत.

राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघातात विद्यार्थ्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते. शरीराचा एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार, तर दाेन अवयव निकामी झाल्यास ५० हजार रुपये अनुदान देिले जाते. अनुदान मंजूर समितीेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. समितीमार्फत शासन निकषांच्या आधारे राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेचे अनुदान मंजूर केले जाते. गतवर्षी २९, तरयंदा २० विद्यार्थ्यांना अपघातात मृत्यू ओढवला. सर्वाधिक मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाले आहेत.

----------------------

५३ विद्यार्थ्यांचा दोन वर्षात मृत्यू

२९ सानुग्रह अनुदान मंजूर झालेली प्रकरणे

------------------

कोट

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. आतापर्यंत २९ कुटुंबांना अनुदान मिळाले आहे. यंदा २० प्रकरणे मंजूर करून अनुदानासाठी शासनाकडे पाठविली आहेत. ही रक्कम येताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना दिली जाईल.

- एस.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अमरावती.

--------------------

कोट

मुलाचा विजेच्या धक्क्याने १७ एप्रिल २०१९ रोजी मृत्यू झाला. पाेलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक कागदपत्रे जमा केली. ७५ हजार रुपये सानुग्रह रक्कम मिळाली आहे.

- सागर शेळके, पालक.

----------------------

मृत्यूचा पोलीस अहवाल प्राप्त, अनुदानाची प्रतीक्षा

जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या ५३ विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी अपघातात मृत्यू झाले. मृत्यूच्या ठोस कारणांचा पोलीस अहवाल प्राप्त झाला. समितीने ४९ प्रकरणे मंजूर केली. केवळ चार प्रकरणे नामंजूर केली आहेत. शिक्षण विभागाने ही चारही प्रकरणे पुनश्च निर्णयार्थ पाठविली.

-----------------------

मृत्यूचे कारण काय?

पाण्यात बुडून- १४

सर्पदंश- ५

अपघाती मृत्यू- १९

चक्कर येऊन- २

अन्य कारणांमुळे- १३

-------------------------