शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेचे १५ लाख रूपये अनुदान केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

असाइनमेंट जिल्ह्यात २९ विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना अनुदान; २० प्रकरणे प्रलंबित, दोन वर्षांत ५३ मृत्यू अमरावती : पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाऱ्या ...

असाइनमेंट

जिल्ह्यात २९ विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना अनुदान; २० प्रकरणे प्रलंबित, दोन वर्षांत ५३ मृत्यू

अमरावती : पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षभरापासून सानुग्रह अनुदान मिळाले नाही, तर शासनाकडे या बाबीसाठी एकूण १५ लाख रुपये पडून आहेत. दोन वर्षांत ५३ विद्यार्थी अपघातात दगावले असून, यातील चार प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केली आहेत.

राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघातात विद्यार्थ्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते. शरीराचा एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार, तर दाेन अवयव निकामी झाल्यास ५० हजार रुपये अनुदान देिले जाते. अनुदान मंजूर समितीेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. समितीमार्फत शासन निकषांच्या आधारे राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेचे अनुदान मंजूर केले जाते. गतवर्षी २९, तरयंदा २० विद्यार्थ्यांना अपघातात मृत्यू ओढवला. सर्वाधिक मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाले आहेत.

----------------------

५३ विद्यार्थ्यांचा दोन वर्षात मृत्यू

२९ सानुग्रह अनुदान मंजूर झालेली प्रकरणे

------------------

कोट

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. आतापर्यंत २९ कुटुंबांना अनुदान मिळाले आहे. यंदा २० प्रकरणे मंजूर करून अनुदानासाठी शासनाकडे पाठविली आहेत. ही रक्कम येताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना दिली जाईल.

- एस.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अमरावती.

--------------------

कोट

मुलाचा विजेच्या धक्क्याने १७ एप्रिल २०१९ रोजी मृत्यू झाला. पाेलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक कागदपत्रे जमा केली. ७५ हजार रुपये सानुग्रह रक्कम मिळाली आहे.

- सागर शेळके, पालक.

----------------------

मृत्यूचा पोलीस अहवाल प्राप्त, अनुदानाची प्रतीक्षा

जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या ५३ विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी अपघातात मृत्यू झाले. मृत्यूच्या ठोस कारणांचा पोलीस अहवाल प्राप्त झाला. समितीने ४९ प्रकरणे मंजूर केली. केवळ चार प्रकरणे नामंजूर केली आहेत. शिक्षण विभागाने ही चारही प्रकरणे पुनश्च निर्णयार्थ पाठविली.

-----------------------

मृत्यूचे कारण काय?

पाण्यात बुडून- १४

सर्पदंश- ५

अपघाती मृत्यू- १९

चक्कर येऊन- २

अन्य कारणांमुळे- १३

-------------------------