शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

मेळघाटातील वाहन चालक, शिपाई, वनमजुरांना न्याय केव्हा?

By admin | Updated: June 2, 2014 00:54 IST

मेळघाटातील वाहन चालक, शिपाई, वनमजूर, खानसामा आणि उद्यान माळी यांच्या २0 वर्षांंपासून बदल्या..

अमरावती : मेळघाटातील वाहन चालक, शिपाई, वनमजूर, खानसामा आणि उद्यान माळी यांच्या २0 वर्षांंपासून बदल्या करण्यात आल्या नाहीत. यापैकी काही जण रूजू झाले तेव्हापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांना न्याय कधी मिळणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी काही दिवसांपूर्वी वनपाल व वनरक्षकांच्या पारदर्शकतेने बदल्या करून न्याय देण्याची भूमिका बजावली. पहिल्यांदाच या बदली प्रक्रियेत उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आदी कोणत्याही अधिकार्‍यांचा हस्तक्षेप न ठेवता थेट बदल्यांची प्रक्रिया राबवून मुख्य वनसंरक्षकांनी वनपाल, वनरक्षकांना न्याय दिला. मात्र वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मेळघाटात कार्यरत वाहन चालक, शिपाई, वनमजूर, खानसामा आणि उद्यान माळी यांच्या बदल्याबाबत केव्हा निर्णय घेतला जाईल, या प्रतीक्षेत हे कर्मचारी आहेत. वन विभागात वरिष्ठपदी कार्यरत अधिकारी, कर्मचारी हे राजकीय दबाव किंवा वशिलेबाजी करून मर्जीच्या ठिकाणी बदली करून घेतात. मात्र तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या बदल्या होत नसतील तर त्यांनी कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न निर्माण होत आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यरत हे कर्मचारी एकाच ठिकाणी सेवा देत सेवानवृत्तीच्या उंबरठय़ावर पोहचले आहेत. तरीदेखील या कर्मचार्‍यांच्या बदलीची फाईल फिरवली जात नाही, हे वास्तव पुढे आले आहे. धारणी, चिखलदरा या भागातील वाहन चालक, शिपाई, वनमजूर, खानसामा आणि उद्यान माळी, वाहन क्लिनर हे बदली केव्हा होणार या प्रतीक्षेत अनेक वर्षांंपासून आहेत.

उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी या कर्मचार्‍यांच्या बदलीसंदर्भात वरिष्ठांकडे अद्यापर्यंंत कोणताही प्रस्ताव पाठविला नाही, अशी माहिती आहे. बदलीसंदर्भात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी आर्त हाक अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)