शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

मेळघाटातील वाहन चालक, शिपाई, वनमजुरांना न्याय केव्हा?

By admin | Updated: June 2, 2014 00:54 IST

मेळघाटातील वाहन चालक, शिपाई, वनमजूर, खानसामा आणि उद्यान माळी यांच्या २0 वर्षांंपासून बदल्या..

अमरावती : मेळघाटातील वाहन चालक, शिपाई, वनमजूर, खानसामा आणि उद्यान माळी यांच्या २0 वर्षांंपासून बदल्या करण्यात आल्या नाहीत. यापैकी काही जण रूजू झाले तेव्हापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांना न्याय कधी मिळणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी काही दिवसांपूर्वी वनपाल व वनरक्षकांच्या पारदर्शकतेने बदल्या करून न्याय देण्याची भूमिका बजावली. पहिल्यांदाच या बदली प्रक्रियेत उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आदी कोणत्याही अधिकार्‍यांचा हस्तक्षेप न ठेवता थेट बदल्यांची प्रक्रिया राबवून मुख्य वनसंरक्षकांनी वनपाल, वनरक्षकांना न्याय दिला. मात्र वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मेळघाटात कार्यरत वाहन चालक, शिपाई, वनमजूर, खानसामा आणि उद्यान माळी यांच्या बदल्याबाबत केव्हा निर्णय घेतला जाईल, या प्रतीक्षेत हे कर्मचारी आहेत. वन विभागात वरिष्ठपदी कार्यरत अधिकारी, कर्मचारी हे राजकीय दबाव किंवा वशिलेबाजी करून मर्जीच्या ठिकाणी बदली करून घेतात. मात्र तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या बदल्या होत नसतील तर त्यांनी कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न निर्माण होत आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यरत हे कर्मचारी एकाच ठिकाणी सेवा देत सेवानवृत्तीच्या उंबरठय़ावर पोहचले आहेत. तरीदेखील या कर्मचार्‍यांच्या बदलीची फाईल फिरवली जात नाही, हे वास्तव पुढे आले आहे. धारणी, चिखलदरा या भागातील वाहन चालक, शिपाई, वनमजूर, खानसामा आणि उद्यान माळी, वाहन क्लिनर हे बदली केव्हा होणार या प्रतीक्षेत अनेक वर्षांंपासून आहेत.

उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी या कर्मचार्‍यांच्या बदलीसंदर्भात वरिष्ठांकडे अद्यापर्यंंत कोणताही प्रस्ताव पाठविला नाही, अशी माहिती आहे. बदलीसंदर्भात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी आर्त हाक अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)