शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

एमआयडीसीत स्थानिक युवकांना प्राधान्य केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 21:54 IST

नांदगावपेठ एमआयडीसीत तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेल्या एमओयू कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य नाही. जिल्ह्यातील युवकांना केवळ कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्यात येत आहेत.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर सभागृहात कडाडल्या : ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या भूलथापा

आॅनलाईन लोकमतअमरावती : नांदगावपेठ एमआयडीसीत तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेल्या एमओयू कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य नाही. जिल्ह्यातील युवकांना केवळ कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्यात येत आहेत. ‘मेक इन इंडिया’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांना भूलथापा मिळत आहेत, असा घणाघाती हल्ला आ. यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विधानसभेत सरकारवर केला.विधानसभेत आ. यशोमती ठाकूर यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले. महिलांवरील अत्याचार, बलात्कार वाढले आहेत. राज्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची २९६२ प्रकरणे आहेत. गृह विभागाचाच हा चिंताजनक अहवाल असला तरी त्यावर प्रतिबंधक उपाययोजना झालेल्या नाहीत. अवैध गोरक्षण, गोमांस, गोवंशाचा अवैध व्यापार, गाईच्या नावावर जातीचे राजकरण याकडे सरकार डोळेझाक करीत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील मिलिंद एकबोटे वगळता भिडे गुरुजी खुलेआम फिरत असून, त्यांना अटक झालेली नाही. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर परिसर व तिवसा बॉर्डरवरून वर्धा जिल्ह्यात खुलेआम दारूविक्री व तस्करी सुरू आहे. त्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय पूर्णानगर व कौंडण्यपूर येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, कुºहा येथे ग्रामीण रुग्णालयाला मान्यता तसेच तिवसा येथील नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर युनिटला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन रिक्त पदे मंजूर करण्याबाबत विनंती वजा पत्र त्यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना दिले आहे.वलगाव सरपंच हत्याप्रकरणी आरोपींना अटक केव्हा?वलगावचे माजी सरपंच अब्दुल करीम (कम्मू भाई) यांच्या खुनाच्या आरोपींना अजून अटक झालेली नाही, नांदगाव खंडेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ता व शिक्षिका कविता इंगोले (कटकतलवारे) व नुकतेच शीतल पाटील यांच्या खुनातील आरोपी नाट्यमयरीत्या अटक होतात. सोशल मीडिया, सायबर क्राइम व फेसबूकवरील आक्षेपार्ह, अनैतिक पोस्ट, हॅकिंग याबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक होत नसल्याबाबत आ.ठाकूर यांनी शासनाचे लक्ष्य वेधले