शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

एमआयडीसीत स्थानिक युवकांना प्राधान्य केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 21:54 IST

नांदगावपेठ एमआयडीसीत तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेल्या एमओयू कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य नाही. जिल्ह्यातील युवकांना केवळ कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्यात येत आहेत.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर सभागृहात कडाडल्या : ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या भूलथापा

आॅनलाईन लोकमतअमरावती : नांदगावपेठ एमआयडीसीत तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेल्या एमओयू कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य नाही. जिल्ह्यातील युवकांना केवळ कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्यात येत आहेत. ‘मेक इन इंडिया’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांना भूलथापा मिळत आहेत, असा घणाघाती हल्ला आ. यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विधानसभेत सरकारवर केला.विधानसभेत आ. यशोमती ठाकूर यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले. महिलांवरील अत्याचार, बलात्कार वाढले आहेत. राज्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची २९६२ प्रकरणे आहेत. गृह विभागाचाच हा चिंताजनक अहवाल असला तरी त्यावर प्रतिबंधक उपाययोजना झालेल्या नाहीत. अवैध गोरक्षण, गोमांस, गोवंशाचा अवैध व्यापार, गाईच्या नावावर जातीचे राजकरण याकडे सरकार डोळेझाक करीत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील मिलिंद एकबोटे वगळता भिडे गुरुजी खुलेआम फिरत असून, त्यांना अटक झालेली नाही. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर परिसर व तिवसा बॉर्डरवरून वर्धा जिल्ह्यात खुलेआम दारूविक्री व तस्करी सुरू आहे. त्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय पूर्णानगर व कौंडण्यपूर येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, कुºहा येथे ग्रामीण रुग्णालयाला मान्यता तसेच तिवसा येथील नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर युनिटला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन रिक्त पदे मंजूर करण्याबाबत विनंती वजा पत्र त्यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना दिले आहे.वलगाव सरपंच हत्याप्रकरणी आरोपींना अटक केव्हा?वलगावचे माजी सरपंच अब्दुल करीम (कम्मू भाई) यांच्या खुनाच्या आरोपींना अजून अटक झालेली नाही, नांदगाव खंडेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ता व शिक्षिका कविता इंगोले (कटकतलवारे) व नुकतेच शीतल पाटील यांच्या खुनातील आरोपी नाट्यमयरीत्या अटक होतात. सोशल मीडिया, सायबर क्राइम व फेसबूकवरील आक्षेपार्ह, अनैतिक पोस्ट, हॅकिंग याबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक होत नसल्याबाबत आ.ठाकूर यांनी शासनाचे लक्ष्य वेधले