शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

शाळकरी मुलांच्या बेभान वाहतुकीला लगाम केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हसत-खेळत गप्पा करत वाहनाच्या वर्दळीतून मार्ग काढणाऱ्या शाळकरी मुलांच्या बेभान वाहतुकीला कोण आवरणार, असा प्रश्न सध्या शहरात निर्माण झाला आहे. या बालवयातील मुलांच्या भरधाव वाहनांना पाहून वयोवृद्ध किंवा महिला अक्षरशा वैतागल्या आहेत. हा सर्व प्रकार दसरा मैदान मार्गावरील रवि नगर चौकात सर्वाधिक पहायला मिळत आहे.शहरात वाहनांची वर्दळ ...

ठळक मुद्देवयोवृद्ध, महिला वैतागल्या : पालकांनो, मुलांना आवरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हसत-खेळत गप्पा करत वाहनाच्या वर्दळीतून मार्ग काढणाऱ्या शाळकरी मुलांच्या बेभान वाहतुकीला कोण आवरणार, असा प्रश्न सध्या शहरात निर्माण झाला आहे. या बालवयातील मुलांच्या भरधाव वाहनांना पाहून वयोवृद्ध किंवा महिला अक्षरशा वैतागल्या आहेत. हा सर्व प्रकार दसरा मैदान मार्गावरील रवि नगर चौकात सर्वाधिक पहायला मिळत आहे.शहरात वाहनांची वर्दळ बघता कधी अपघात घडेल, हे सांगता येत नाही. 'नजर हटी दुर्घटना घटी, अशीच स्थिती शहराची आहे. अशा स्थितीत शाळकरी मुलांची बेभान वाहतूक अपघाताला आमंत्रण देत आहे. या मुलांकडे परवाना नसतानाही पालकवर्ग त्यांच्या हाती वाहन देत आहे. मात्र, ही मुले शाळेत जाताना व घरी परतताना वाहने व्यवस्थित चालवितात का, हे पाहण्याची तसदीही पालक घेत नाहीत. एकाच दुचाकीवर तिब्बल सिट भरधाव वाहन चालविण्यातही हे शाळकरी मुले पटाईत आहेत. या मुलांना अपघात घडण्याची थोडीही भीती उरली नसल्याचे त्यांच्या चेहºयावरून दिसून येते. वाहनांची शांततेत वर्दळ सुरू असताना अचानक एक दुचाकी भरधाव वेगाने जाते आणि अन्य वाहनांना कट मारत पुढे जात असल्याचे किस्से दररोज शहरात पाहायला मिळत आहे. मात्र, कट मारून पुढे जाणाऱ्या या शाळकरी मुलांना मागील वाहनाधारक किती धाबरला किंवा तो खाली पडला का, हे पाहण्याससुद्धा फुरसत नसते. वाहनांना कट मारल्यानंतरही जोरजोºयात हसत शाळकरी मुले भरधाव निघून जातात. दररोज घडणारे हे प्रकार अनेकांच्या निदर्शनास येतात. अनेक वाहनचालक मुलांना हटकतातसुद्धा. मात्र, त्यांची क्षुल्लकशी दखलसुद्धा हे शाळकरी मुले घेत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या शाळकरी मुलांची बेभान वाहतूक एखादी मोठ्या घटनेला आमंत्रण देऊ शकते. त्यांना वेळेव्त लगाम लावणे आता गरजेचे झाले आहे.दसरा मैदान मार्गावर वृद्ध कोसळलाएक वृद्ध मंगळवारी सायंकाळी दसरा मैदान ते रविनगर मार्गावरून दुचाकी घेऊन हळूहळू जात होते. अचानक भरधाव तिब्बल सिट बसलेले काही शाळकरी मुले त्या वृद्धाच्या दुचाकीला कट मारून पुढे निघाले. अचानक घडलेला हा प्रकार पाहून त्या वृद्धाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते खाली कोसळले. मात्र, भरधाव पुढे गेलेल्या त्या शाळकरी मुलांना ते वृद्ध खाली पडल्याचे काही देण-घेण नसल्याचे दिसून आले. असे प्रकार दररोज शहरात घडत आहेत.पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये. ती अपघाताला आमंत्रण देणारी ठरू शकते. त्याच्या वाहतुकीस बे्रक लावण्याचे प्रयत्न करू. त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात येईल.- अर्जुन ठोसरे,पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा