शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रसंतांच्या शाळेचा कायापालट केव्हा?

By admin | Updated: February 3, 2015 22:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीक्षेत्र वरखेड येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शाळेचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शाळा

ज्ञानेश्वर बेलूरकर - वरखेड राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीक्षेत्र वरखेड येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शाळेचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मनगटे व विद्यार्थी पालकांनी केली आहे. तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र वरखेड ही संतांची पवित्र भूमी म्हणून परिचित आहे. गावात समर्थ आडकुजी महाराजांची समाधी, राष्ट्रसंतांच्या मातोश्री पुष्पमंजुळा माता यांचे वास्तव्य व वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून या गावाची ओळख आहे.सन १ आॅगस्ट १८७६ मध्ये येथील प्राथमिक मराठी शाळेची स्थापना झाली. या शाळेत तुकडोजी महाराजांनी सन १९२० या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेश केला. ३ एप्रिल १९२३ ला इयत्ता ४थी पर्यंत प्राथमिक शिक्षक घेतले. तुकडोजी महाराज ज्या खोलीत बसवाचे त्या ठिकाणी सध्या विद्यार्थ्यांकरिता पोषण आहार शिजविण्यात येते. अशा या महत्त्वपूर्ण स्थानाचे शासनाने ऐतिहासिक महत्त्व जाणून बांधकाम करुन तुकडोजी महाराजांचे विद्येचे स्थान म्हणून गुरुदेवभक्तांकरिता परिचित राहिले असते. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून जीवन शिक्षण या एकोणविसाव्या अध्यायात्त शिक्षणाचे महत्त्व किती, याचे स्पष्टीकरण केले आहे. या जि.प. प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता १ली ते ७वी पर्यंतच्या ७ तुकड्या आहेत. मुले ७३ व मुली ६० असे १३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील पाच वर्गखोल्या जीर्णावस्थेत आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे.या शाळेच्या छतावरील इंग्रजी कवेलू अद्यापही कायम आहेत. माकडांचा नेहमीच हौदोस असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसवावे कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने शाळेचे बांधकाम करण्याकरिता ठराव घेऊन शासन दरबारी प्रस्ताव सादर केला. परंतु शासनाकडून केराची टोपलीच दाखविल्याचे समजते. या ऐतिहासिक शाळेचे बांधकाम व्हावे, असे कोणत्याच लोकप्रतिनिधीला वाटत नसल्याने शाळेची स्थिती दयनीय झाली आहे. नुकतीच सभापती अर्चना वेरुळकर व गटविकास अधिकारी किशोर काळे यांनी शाळेची पाहणी केली. शाळेचे बांधकाम तत्काळ व्हावे याकरिता ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बेलूरकर, माजी उपसरपंच दिलीप कडू, संदीप मनगटे, राजेंद्र कांडलकर, माजी सरपंच विलास होले, गणेश कोहरे, उपसरपंच सदाशिव मेश्राम, प्रगती अग्रवाल, विनोद अग्रवाल, मनोहर अमझरे, मोहन अग्रवाल, अशोक इंगळे यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे.