शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

प्रमाणपत्र अभ्यासक्रम परीक्षा केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:19 IST

विद्यापीठाने कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा गाजावाजा करीत विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. मात्र, या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाने घेतली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रोजगाराचे साधन कसे उपलब्ध होतील, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ प्रशासनाकडून दिरंगाई : विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठाने कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा गाजावाजा करीत विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. मात्र, या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाने घेतली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रोजगाराचे साधन कसे उपलब्ध होतील, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांची परीक्षा न झाल्याने त्यांना प्रमाणपत्रदेखील मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना रोजगारापासून वंचित रहावे लागत असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई याला कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, ते आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभागाच्यावतीने हे अभ्यासक्रम तयार करण्यात आलेले आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या जवळपास ११ केंद्रावर हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेले आहेत. यामध्ये त्यांना टेक्सटाईल वेव्हींग, हाऊस किपिंग, रिटेल सेल्स असोसिएट, कॅशीअर, डीटीपी, टॅली, फूड अँड बेव्हरेज, सॉईल टेस्टींग आदी अभ्यासक्रम शिकविण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांच्या पहिल्या बॅचमध्ये जवळपास ५०० ते ६०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. परीक्षा मात्र अद्यापही घेण्यात आलेल्या नाही. विद्यापीठातील एकूणच समन्वयाच्या अभावाने ही परीक्षा प्रलंबित राहली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना रोजगारापासून देखील वंचित रहावे लागत असल्याची स्थिती आहे.निविदा आटोपली, परीक्षा केव्हा ?आजीवन अध्ययन विभागाने प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यामध्ये एसएमबी सोल्युशन्स प्रा.लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. २२३ रुपये दराने ही कंपनी परीक्षेचे संपूर्ण काम करणार आहे. मात्र निविदा प्रक्रिया आटोपल्यानंतरदेखील परीक्षा प्रक्रिया मात्र सुरू झालेली नाही. या विषयाच्या मंजुरीसंदर्भात २७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेली तातडीची व्यवस्थापन परिषदेची सभादेखील स्थगित करण्यात आली आहे. प्रशासनाकडून यासंदर्भात होत असलेली दिरंगाई विद्यार्थ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे.