शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

प्रमाणपत्र अभ्यासक्रम परीक्षा केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:19 IST

विद्यापीठाने कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा गाजावाजा करीत विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. मात्र, या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाने घेतली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रोजगाराचे साधन कसे उपलब्ध होतील, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ प्रशासनाकडून दिरंगाई : विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठाने कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा गाजावाजा करीत विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. मात्र, या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाने घेतली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रोजगाराचे साधन कसे उपलब्ध होतील, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांची परीक्षा न झाल्याने त्यांना प्रमाणपत्रदेखील मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना रोजगारापासून वंचित रहावे लागत असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई याला कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, ते आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभागाच्यावतीने हे अभ्यासक्रम तयार करण्यात आलेले आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या जवळपास ११ केंद्रावर हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेले आहेत. यामध्ये त्यांना टेक्सटाईल वेव्हींग, हाऊस किपिंग, रिटेल सेल्स असोसिएट, कॅशीअर, डीटीपी, टॅली, फूड अँड बेव्हरेज, सॉईल टेस्टींग आदी अभ्यासक्रम शिकविण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांच्या पहिल्या बॅचमध्ये जवळपास ५०० ते ६०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. परीक्षा मात्र अद्यापही घेण्यात आलेल्या नाही. विद्यापीठातील एकूणच समन्वयाच्या अभावाने ही परीक्षा प्रलंबित राहली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना रोजगारापासून देखील वंचित रहावे लागत असल्याची स्थिती आहे.निविदा आटोपली, परीक्षा केव्हा ?आजीवन अध्ययन विभागाने प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यामध्ये एसएमबी सोल्युशन्स प्रा.लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. २२३ रुपये दराने ही कंपनी परीक्षेचे संपूर्ण काम करणार आहे. मात्र निविदा प्रक्रिया आटोपल्यानंतरदेखील परीक्षा प्रक्रिया मात्र सुरू झालेली नाही. या विषयाच्या मंजुरीसंदर्भात २७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेली तातडीची व्यवस्थापन परिषदेची सभादेखील स्थगित करण्यात आली आहे. प्रशासनाकडून यासंदर्भात होत असलेली दिरंगाई विद्यार्थ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे.