शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सैराट युवकांच्या भन्नाट दुचाकींना 'ब्रेक' केंव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2016 00:05 IST

महाविद्यालयीन विद्यार्थी व अल्पवयीन मुलांच्या भन्नाट दुचाकीमुळे दररोज अपघात घडून अनेक जण जखमी होत आहेत.

दररोज किरकोळ अपघात : दसरा मैदान, साईनगर रोडवर अनेक घटना अमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थी व अल्पवयीन मुलांच्या भन्नाट दुचाकीमुळे दररोज अपघात घडून अनेक जण जखमी होत आहेत. या मनमानी कारभारामुळे दसरा मैदान ते साईनगर मार्गाने जाणाऱ्या वाहन चालकांचा जीव टांगणीवर आहे. भुतेश्वर ते साईनगरपर्यंतच्या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थी व अल्पवयीन मुले भरधाव दुचाकी चालवित असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे. स्टंटबाजी करणारे दुचाकीस्वार अन्य दुचाकीला कट मारून पुढे निघून जातात. मात्र, या यामुळे अपघात घडून तो दुचाकीस्वार खाली कोसळून जखमी होत आहे. मात्र, हे सैराट युवक भरधाव वेगाने पुढे निघून जातात. या अपघातात जखमी नागरिकांना उचलून स्थानिक रहिवासी त्यांच्या जखमावर प्राथमिक उपचार करतात. असे किरकोळ अपघात दररोज घडत असले तरी एखादवेळी दुचाकीचालकाला जीव गमावावा लागू शकतो, याची पुसटशी कल्पनाही या भन्नाट युवकांना नसते. या मार्गाने पोलिसांसह सीआरओ वाहनांची गस्त अधूनमधून सुरूच असते. मात्र, तरीसुध्दा पोलिसांच्या दृष्टीस हे वेगाने जाणारे युवक का पडत नाहीत, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. किरकोळ अपघात घडल्यास वाहनचालक जवळच्याच एखाद्या दवाखान्यात उपचार करून घेतात. परंतु त्याची तक्रार पोलिसांपर्यंत येत नाही.मोठा अपघात झाल्यास त्याची नोंद पोलीस ठाण्यात होते. परंतु या अपघातात कुणी जायबंदी झाल्यास प्रकरणाला कधीकधी वेगळे वळण लागते. अशा सैराट दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप न केल्यास नागरिकच कायदा हातात घेऊन दुचाकीस्वारांना चोप देऊ शकतात. याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. दाम्पत्यासह चिमुकला बचावलादोन दिवसांपूर्वी साईनगरकडून राजापेठकडे दुचाकीने जाणाऱ्या एका दाम्पत्याच्या गाडीला नवाथेनगर चौकात अज्ञात दुचाकीस्वाराने कट मारला. दाम्पत्यासह दोन महिन्याचा चिमुकलाही कोसळला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली.सुदैवाने मोठा अपघात टळला. अनर्थ घडला असता तर जबाबदारी कुणाची? अशी चर्चा परिसरात होती. अधिसूचनेनंतरही शहरात जड वाहतूक सुरुच पोलीस विभागाने अधिसूचना काढून जड वाहतुकीस बंदी केली आहे. जिवनाश्वक वस्तुंच्या वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, तरी सुद्धा छुप्या मार्गाने शहरात जड वाहतूक सुरुच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या जड वाहतुकीमुळे मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यावर तातडीची उपायययोजना गरजेची असल्याचे चित्र आहे. भरधाव दुचाकी चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी ड्राईव्ह घेण्यात येईल. वाहतूक पोलीस तैनात करून दुचाकीस्वारांवर लक्ष ठेवून कारवाई करू. -पी.डी.डोंगरदिवे, सहायक पोलीस आयुक्त.