शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना खचलेल्या विहिरींचे अनुदान केव्हा?

By admin | Updated: December 27, 2014 22:43 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा जनुना येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत चंद्रकांत खंडार व रघुनाथ खंडार यांच्या शेतातील विहीर पूर्ण खचली आहे. यासंदर्भात जावराच्या तलाठ्यांना

अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा जनुना येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत चंद्रकांत खंडार व रघुनाथ खंडार यांच्या शेतातील विहीर पूर्ण खचली आहे. यासंदर्भात जावराच्या तलाठ्यांना अर्ज देऊनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ओलित ठप्प असल्याने आर्थिक सकंट ओढावले आहे. न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आयुक्तांकडे विनंती केली आहे.जावरा जनुना येथील अल्प भूधारक शेतकरी चंद्रकांत खंडार व रघुनाथ खंडार यांचे मौजा जावरा जनुना येथे सर्वे नं. ५२/२,५१ च्या शेतात विहीर आहे. मात्र सन २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत या ही विहीर खचली. त्यामुळे ओलित थांबले आहे. या संदर्भात शेतकऱ्याने १० सप्टेंबर २०१३ रोजी तलाठी जावरा यांच्याकडे अर्ज दाखल केला. मात्र तलाठी यांनी हेतुपुरस्सर अर्ज नामंजूर केल्याचा आरोप खंडार यांनी केला आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने ३१ जुलै २०१४ रोजी तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे तक्रार दाखल केली. तेव्हा तहसीलदार यांच्या आदेशान्वे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी स्थळाला भेट देऊन निरीक्षण केले. परंतु त्यानंतरही तलाठ्याने विहीर केव्हा खचली याबाबत शेतकऱ्यांनाच उलटसुलट प्रश्न विचारणे सुरु केले. शेतकऱ्यांना माहिती नाही, असे अहवालात नमूद करुन आमच्यावर अन्याय केला, असा आरोप रघुनाथ खंडार व चंद्रकांत खडार यांनी केला आहे. आम्हाला हेतुपुरस्सर डावलले गेले असून खचलेल्या विहीर अनुदानापासून आम्ही वंचित झाल्यामुळे आता विहीर कशी उपसावी व ओलित कसे करावे, असा प्रश्न अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. याउलट जावरा येथीलच शर्मा नामक शेतकऱ्याची विहीरसुध्दा अतिवृष्टीत खचली होती. मात्र ती विहीर तलाठी यांनी मंजूर केली आहे. असा भेदभाव का, असा सवाल सदर वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात न्याय मागण्यासाठी आता जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये घडलेला सर्व प्रकार नमूद करण्यात आला आहे. आमच्या अर्जाचा फेरविचार करुन खचलेल्या विहिरीचे पुन्हा सर्वेक्षण करुन दोषीवर कारवाई करावी तसेच आम्हाला शासनाकडून खचलेल्या विहिरीचे दुरुस्ती अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.