शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

शेतकऱ्यांना खचलेल्या विहिरींचे अनुदान केव्हा?

By admin | Updated: December 27, 2014 22:43 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा जनुना येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत चंद्रकांत खंडार व रघुनाथ खंडार यांच्या शेतातील विहीर पूर्ण खचली आहे. यासंदर्भात जावराच्या तलाठ्यांना

अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा जनुना येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत चंद्रकांत खंडार व रघुनाथ खंडार यांच्या शेतातील विहीर पूर्ण खचली आहे. यासंदर्भात जावराच्या तलाठ्यांना अर्ज देऊनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ओलित ठप्प असल्याने आर्थिक सकंट ओढावले आहे. न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आयुक्तांकडे विनंती केली आहे.जावरा जनुना येथील अल्प भूधारक शेतकरी चंद्रकांत खंडार व रघुनाथ खंडार यांचे मौजा जावरा जनुना येथे सर्वे नं. ५२/२,५१ च्या शेतात विहीर आहे. मात्र सन २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत या ही विहीर खचली. त्यामुळे ओलित थांबले आहे. या संदर्भात शेतकऱ्याने १० सप्टेंबर २०१३ रोजी तलाठी जावरा यांच्याकडे अर्ज दाखल केला. मात्र तलाठी यांनी हेतुपुरस्सर अर्ज नामंजूर केल्याचा आरोप खंडार यांनी केला आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने ३१ जुलै २०१४ रोजी तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे तक्रार दाखल केली. तेव्हा तहसीलदार यांच्या आदेशान्वे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी स्थळाला भेट देऊन निरीक्षण केले. परंतु त्यानंतरही तलाठ्याने विहीर केव्हा खचली याबाबत शेतकऱ्यांनाच उलटसुलट प्रश्न विचारणे सुरु केले. शेतकऱ्यांना माहिती नाही, असे अहवालात नमूद करुन आमच्यावर अन्याय केला, असा आरोप रघुनाथ खंडार व चंद्रकांत खडार यांनी केला आहे. आम्हाला हेतुपुरस्सर डावलले गेले असून खचलेल्या विहीर अनुदानापासून आम्ही वंचित झाल्यामुळे आता विहीर कशी उपसावी व ओलित कसे करावे, असा प्रश्न अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. याउलट जावरा येथीलच शर्मा नामक शेतकऱ्याची विहीरसुध्दा अतिवृष्टीत खचली होती. मात्र ती विहीर तलाठी यांनी मंजूर केली आहे. असा भेदभाव का, असा सवाल सदर वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात न्याय मागण्यासाठी आता जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये घडलेला सर्व प्रकार नमूद करण्यात आला आहे. आमच्या अर्जाचा फेरविचार करुन खचलेल्या विहिरीचे पुन्हा सर्वेक्षण करुन दोषीवर कारवाई करावी तसेच आम्हाला शासनाकडून खचलेल्या विहिरीचे दुरुस्ती अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.