शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

‘अ‍ॅप्रोच’ मार्गाचा अडसर हटणार कधी?

By admin | Updated: December 11, 2014 22:57 IST

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, अकोला-यवतमाळ राज्य महामार्गाला जोडणाऱ्या जळू गावापर्यंतच्या ‘अ‍ॅप्रोच’

बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण : शासनाकडे फाईल पडून, पावणेचार किलोमीटरचा प्रश्नअमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, अकोला-यवतमाळ राज्य महामार्गाला जोडणाऱ्या जळू गावापर्यंतच्या ‘अ‍ॅप्रोच’ रस्त्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. परिणामी विमानतळाचे विस्तारीकरण रखडले असून पावणेचार किलोमीटर मार्गाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागणार? हा सवालदेखील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे,बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ७५० एकर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानतळाचे विस्तारीकरणसौंदर्यीकरणाची जबाबदारी भारतीय विमानतळ प्रािधकरणाकडे सोपविली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणात आताच्या १४०० मीटर धावपट्टीऐवजी २४०० मीटरची धावपट्टी निर्माण केली जाणार आहे. एवढेच नव्हे, जमीन अधिग्रहणासाठी ५५ कोटी रुपयांचे वाटप प्रकल्पग्रस्तांना करण्यात आले आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाकरिता २० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याकरिता ४ कोटी रुपये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देणे शिल्लक आहे. मात्र, अकोला महामार्गाहून जळू ते निंभोरा या पावणेचार किलोमिटरच्या अ‍ॅप्रोच रस्त्याच्या निर्मितीसाठी लागणारे १३.५० कोटी रूपये शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अद्यापही मंजूर केले नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला या अ‍ॅप्रोच रस्ता निर्मितीच्या निविदा काढता आल्या नाहीत. विस्तारीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची गरज भागणार आहे. असे असताना अ‍ॅप्रोच रस्त्याच्या निर्मितीसाठीच निधी नसेल तर भविष्यात बेलोरा विमानतळाचे काही खरे नाही, अशी प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आहे. गत महिन्यात आ. सुनील देशमुख यांच्या विशेष उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावेळी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव मीनादेखील हजर होते. त्यावेळी यावर चर्चा झाली होती.