शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचा गहू, तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांच्या घशात

By admin | Updated: December 6, 2014 22:39 IST

तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात एकूण १४४ स्वस्त धान्य दुकानदार कार्यरत आहेत. परंतु अनेक दिवसांपासून येथील पुरवठा निरीक्षक नियमितपणे दुकानांची तपासणी करीत नसल्याने गरिबांचा गहू,

संदीप मानकर - दर्यापूरतालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात एकूण १४४ स्वस्त धान्य दुकानदार कार्यरत आहेत. परंतु अनेक दिवसांपासून येथील पुरवठा निरीक्षक नियमितपणे दुकानांची तपासणी करीत नसल्याने गरिबांचा गहू, तांदूळ काही स्वस्त धान्य दुकानदारंच्या घशात जात आहे. यामध्ये लाखो रूपयांचा अपहार होत असल्याची परिसरात चर्चा आहे. शासनाने फेब्रुवारी महिन्यापासून अन्न सुरक्षा योजना लागू केली. या अंतर्गत लाभार्थ्यांना २ रूपये किलो दराने २० किलो गहू व ३ रूपये किलो दराने १५ किलो तांदूळ मिळते. तसेच १३.५० पैसे किलो दराने प्रती व्यक्ती ३७५ ग्रॅम साखर देण्याची तरतूद आहे. तालुक्यात ७०८४ लाभार्थी आहेत. तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी (बीपीएल) या योजनेंतर्गत एका व्यक्तीला ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देण्याची तरतूद आहे. तर केशरी शिधापत्रिका (एपीएल) धारकांना उपलब्ध कोट्यानुसार ७ रूपये २० पैसे किलो दराने गहू व ९.६० पैसे किलो या दराने तांदूळ देण्यात येतो. दर महिन्याला प्राधान्य कुटुंबातील १८,५९० लाभार्थ्यांना २ हजार ८८६ क्विंटल गहू व १ हजार ९२४ क्विंटल तांदूळ शासनामार्फत दर महिन्याला देण्यात येतो तर अंत्योदयच्या लाभार्थ्यांना १ हजार ४१७ क्विंटल गहू व १ हजार ६३ क्विंटल तांदूळ वितरित केला जातो. परंतु हे धान्य खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते का, हा खरा प्रश्न आहे. अनेकदा स्वस्त धान्य दुकानदारांकडे धान्याचा कोटा उपलब्ध असतानाही अनेक दुकानदार धान्य मिळाले नसल्याचे लाभार्थ्यांना सांगून त्यांच्या तोंडचा घास खासगी व्यापाऱ्यांना विकून लाखोंची माया जमवीत असल्याचे दिसते. यामुळे काही स्वस्त धान्य दुकानदार गब्बर झाले आहेत. त्यांच्या सोबत अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे त्यांची नियमित नोंदवही तपासली जात नाही, अशी देखील परिसरात चर्चा आहे. काही केरोसिन विक्रेतेसुध्दा केरोसिनचा काळाबाजार करून आॅटोचालकांना जादा दराने केरोसिन विकत असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळेच शिंगणवाडी येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाणीची घटना ताजी आहे. त्यामुळे या प्रकरणाची उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.