शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

आवाहनाला प्रतिसाद देत ४६६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार  १२३ बस  विविध मार्गांवर धावत आहे. दररोज ४११ बसच्या फेऱ्या होत असून १३ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अद्यापही २०० पेक्षा जास्त  बस बंद आहेत  आणि १,२६६ कर्मचारी संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महामंडळाचे शासनात विलिनीकरण होऊ नसल्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी महामंडळ विलीनीकरणाची शक्यता आता संपुष्टात आली आहे.  विलीनीकरण होणार नसल्याचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला आहे.  त्यामुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे  पुढे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  दुसरीकडे अद्यापही अनेक गावात बसेस सुरू नाही. त्यामुळे गावात बस कधी येणार, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अद्यापही हा संप मिटलेला नाही. परिवहन मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ४६६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार  १२३ बस  विविध मार्गांवर धावत आहे. दररोज ४११ बसच्या फेऱ्या होत असून १३ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अद्यापही २०० पेक्षा जास्त  बस बंद आहेत  आणि १,२६६ कर्मचारी संपावर आहेत.एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महामंडळाचे शासनात विलिनीकरण होऊ नसल्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

ग्रामीण भागातील एसटी बंदच-    मुख्य मार्गावर बस सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने बस सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

आंदोलक कर्मचारी काय म्हणतात? 

चार महिन्यांपासून आम्ही आमच्या हक्कासाठी आंदोलन करीत आहोत. आम्हाला वाटले होते की, विलीनीकरण होईल, परंतु तसे झाले नाही. ५ एप्रिल रोजी यावर न्यायालयात सुनावणी आहे. त्यानंतर संपाबाबत निर्णय होईल.- संजय मालवीय, संपकरी एसटी

आम्ही विलीनीकरणासाठी आंदोलन करीत आहोत. आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. शासनाने आमचा विचार करून विलीनीकरण द्यावे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील. - सतीश कडू, संपकरी एसटी

एसटी महामंडळ विलीनीकरणाची शक्यता आता संपुष्टात आली आहे. विलीनीकरण होणार नसल्याचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी कामावर हजर झाले पाहिजे.- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक

४५० जण बडतर्फ

वारंवार आवाहन करूनही कामावर हजर न झालेल्या ४५० जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी अपील करून कामावर हजर व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही बडतर्फ कर्मचारी अपील करुन कामावर परतत आहेत. असे असले तरी त्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप