शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

काहीही करा, ‘मालुर’चे पुनर्वसन रोखू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील मालुर या गावातील गत ७० वर्षात एकदाही रस्त्याचे डांबरीकरण ...

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील मालुर या गावातील गत ७० वर्षात एकदाही रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. आजपर्यंत गावात एसटी पोहोचली नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही. आजूबाजूला घनटाट जंगल असल्याने वन्यप्राण्यांचा हैदोस ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे काहीही करा, मालुर गावांचे पुनर्वसन रोखू नका, अशी हाक ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

मालुर ग्रामस्थांनी गावातील दुरावस्थेची कैफियत निवेदनातून मांङली आहे. गावात चौथीपर्यत शाळा असून, तीन घरांनाच वीज मिटर आहे. एकदा वीज गुल झाली की, आठ ते दहा दिवसांपर्यंत वीज येत नाही. गावची शेती ही मुरूमाची आहे. गावात आजपर्यंत मोबाईलची रेंज नाही. गावात साधा दवाखाना सुद्धा नाही. कुणी आजारी पडले की, ४० किमी. अंतरावरील धारणी येथे उपचारासाठी जावे लागते.गत वर्षी मांगीया गावचे शिरजगाव कसबा येथे पुनर्वसन झाले. मांगीया ग्रामस्थांना पुनर्वसनानंतर मिळालेल्या सोईसुविधा नजरेसमोर आहेत. परिणामी मालुरचे पुनर्वसन करावे, यासाठी एकमताने ठराव झाला आणि ठरावाची प्रत

प्रशासनाला सुपूर्द केली. दिवाळीनंतर मालुर येथील गावकऱ्यांचे पुनर्वसन होत असून, काहींनी वाघोली तर, काहींनी बहिरम

येथे पुनर्वसनाला पसंती दर्शविली. मात्र, मालुर येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन अचानकपणे रोखण्यात आले आहे.एनजीओंनी

कोऱ्या कागदावर घेतलेल्या स्वाक्षरीमुळे मालुरचे पुनर्वसन थांबल्याची माहिती आहे. आता मालुरचे पुनर्वसन करा, ते रोखू नका, आम्ही स्वेच्छेने पुनर्वसीत होत आहे, अशी मागणी किसन चिमोटे, चंदुलाल जामुनकर, सुगंधी जामुनकर, मानकु कास्देकर, भुरा कास्देकर, ब्रिजलाल मावस्कर, जानकुलाल चिमोटे, सुशिल चिमोटे, सुनील चिमोटे, साबुलाल चिमोटे आदींनी केले आहे.