शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

काहीही करा, ‘मालुर’चे पुनर्वसन रोखू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील मालुर या गावातील गत ७० वर्षात एकदाही रस्त्याचे डांबरीकरण ...

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील मालुर या गावातील गत ७० वर्षात एकदाही रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. आजपर्यंत गावात एसटी पोहोचली नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही. आजूबाजूला घनटाट जंगल असल्याने वन्यप्राण्यांचा हैदोस ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे काहीही करा, मालुर गावांचे पुनर्वसन रोखू नका, अशी हाक ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

मालुर ग्रामस्थांनी गावातील दुरावस्थेची कैफियत निवेदनातून मांङली आहे. गावात चौथीपर्यत शाळा असून, तीन घरांनाच वीज मिटर आहे. एकदा वीज गुल झाली की, आठ ते दहा दिवसांपर्यंत वीज येत नाही. गावची शेती ही मुरूमाची आहे. गावात आजपर्यंत मोबाईलची रेंज नाही. गावात साधा दवाखाना सुद्धा नाही. कुणी आजारी पडले की, ४० किमी. अंतरावरील धारणी येथे उपचारासाठी जावे लागते.गत वर्षी मांगीया गावचे शिरजगाव कसबा येथे पुनर्वसन झाले. मांगीया ग्रामस्थांना पुनर्वसनानंतर मिळालेल्या सोईसुविधा नजरेसमोर आहेत. परिणामी मालुरचे पुनर्वसन करावे, यासाठी एकमताने ठराव झाला आणि ठरावाची प्रत

प्रशासनाला सुपूर्द केली. दिवाळीनंतर मालुर येथील गावकऱ्यांचे पुनर्वसन होत असून, काहींनी वाघोली तर, काहींनी बहिरम

येथे पुनर्वसनाला पसंती दर्शविली. मात्र, मालुर येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन अचानकपणे रोखण्यात आले आहे.एनजीओंनी

कोऱ्या कागदावर घेतलेल्या स्वाक्षरीमुळे मालुरचे पुनर्वसन थांबल्याची माहिती आहे. आता मालुरचे पुनर्वसन करा, ते रोखू नका, आम्ही स्वेच्छेने पुनर्वसीत होत आहे, अशी मागणी किसन चिमोटे, चंदुलाल जामुनकर, सुगंधी जामुनकर, मानकु कास्देकर, भुरा कास्देकर, ब्रिजलाल मावस्कर, जानकुलाल चिमोटे, सुशिल चिमोटे, सुनील चिमोटे, साबुलाल चिमोटे आदींनी केले आहे.