शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

पालकमंत्र्यांच्या ‘स्पेशल ड्राईव्ह’चे झाले तरी काय?

By admin | Updated: July 30, 2014 23:45 IST

पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या प्रसिध्दीसाठी ‘स्पेशल ड्राईव्ह’ काढण्याची घोषणा फसवी ठरली आहे. या योजनेची मुदतवाढ ३१ जुलै रोजी संपुष्टात आल्याने पालकमंत्र्यांच्या या घोषणेचे काय झाले,

३१ जुलै अखेरचा दिवस : राष्ट्रीय पीक विमा योजनेला मुदतवाढ नाही; घोषणा फसवी?गजानन मोहोड - अमरावतीपालकमंत्र्यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या प्रसिध्दीसाठी ‘स्पेशल ड्राईव्ह’ काढण्याची घोषणा फसवी ठरली आहे. या योजनेची मुदतवाढ ३१ जुलै रोजी संपुष्टात आल्याने पालकमंत्र्यांच्या या घोषणेचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी अडचणीत आला असल्याने राष्ट्रीय पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पीक विमा योजनेच्या प्रसिद्धीसाठी १५ दिवसांचा ‘विशेष ड्राईव्ह’ काढण्याचे राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २१ जुलै रोजी आयुक्त कार्यालयात सांगितले. प्रत्यक्षात अशा पद्धतीची कुठलीही मोहीम कृषी विभागाद्वारा राबविण्यात आली नाही. शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या योजनेची मुदत ३१ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. यावरून पुन्हा शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट होते. खरीप हंगाम २०१४ करिता राष्ट्रीय पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. आधीच्या योजनेत बदल करून शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची दिशाभूल६० ते ८० टक्के जोखीमस्तर व पिकानुरूप दर हेक्टरी १३ हजार ते ३ लाख ४२ हजार रुपयांपर्यंत विम्याचे संरक्षण कवच पिकांना लाभणार या अपेक्षेत शेतकरी असताना या योजनेची मुदत संपुष्टात येत आहे. या योजनेचा कालावधी केवळ १० दिवसांचा राहिला आहे. वास्तविकत: ही योजना राबविण्याचा निर्णय ५ जुलै रोजी शासनाने घेतला. १० जुलै रोजी पीक विमा संदर्भातील कृषी व पणन मंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्ह्यात पोहचले. १६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना सूचना दिल्यात. १८ जुलै रोजी जिल्ह्यातील बँकांना पीक विमाबाबतच्या सूचना देण्यात आल्यात. प्रत्यक्षात योजनेच्या अंमलबजावणीसाठी १२ दिवस मिळालेत. यामध्येही ५ दिवसांच्या सुट्या आल्यात. परिणामी पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ ७ दिवस मिळालेत व अशा परिस्थितीत ३१ जुलै रोजी योजनेची मुदत संपत आहे. या हंगामात जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून पीक पेरणीला सुरूवात झाली अन चौथ्या आठवड्यात पीक विम्याची मुदत संपली ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. योजनेला किमान १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दोनदा संपर्क साधला, ते उपलब्ध होऊ शकले नाही. शेतकऱ्यांना पीक विम्यात सवलतशासनाने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सर्व पिकाकरिता विमा हप्त्यात ५० टक्के व कापूस पिकाकरिता ७५ टक्के सूट दिलेली आहे. तसेच कमाल भूधारक शेतकऱ्यांकरिता कापूस पिकासाठी ५० टक्के सूट देण्यात आली आहे.