शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

‘त्या’ केंद्राध्यक्षांवर ‘आरओ’ मेहरबान का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:25 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत केंद्रावरील मतदान आटोपल्यानंतर ३२ केंद्राध्यक्षांनी र्इ$व्हीएमचे ‘क्लोज बटन’ सुरूच ठेवल्याने मतदान यंत्र सुरूच राहिले. त्यामुळे आयोगाने आदर्श असे मानांकन दिलेल्या अमरावती लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान काही काळ खोळंबा निर्माण झाला व आकडेवारीतही विसंगती आली.

ठळक मुद्दे३२ सीयूचे प्रकरण : मतदान प्रक्रियेनंतरही ईव्हीएमचे बटन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत केंद्रावरील मतदान आटोपल्यानंतर ३२ केंद्राध्यक्षांनी र्इ$व्हीएमचे ‘क्लोज बटन’ सुरूच ठेवल्याने मतदान यंत्र सुरूच राहिले. त्यामुळे आयोगाने आदर्श असे मानांकन दिलेल्या अमरावती लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान काही काळ खोळंबा निर्माण झाला व आकडेवारीतही विसंगती आली. तीन वेळा प्रशिक्षण झाल्यानंतरही निष्काळजीपणा करणाऱ्या मतदान केंद्राध्यक्षांवर निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) अद्याप मेहरबान का, असा मतदारांचा सवाल आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी सर्व कर्मचाऱ्यांना तीन वेळा प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर १८ एप्रिल रोजी सहा विधानसभा मतदारसंघांतील दोन हजार मतदान केंद्रांवर मतदान झाले. सर्व ईव्हीएम अमरावती येथील नेमाणी गोडाऊनमधील स्ट्राँग रूममध्ये त्याच रात्री जमा करण्यात आल्यात व स्ट्राँग रूम सील करण्यात आल्यात. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी सकाळी ७ वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजता टपाली व साडेआठ वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली. अमरावती, तिवसा व अचलपूर विधानसभा मतदारसंघातील ३२ केंद्रांवरील ३२ ईव्हीएमचे कंट्रोल युनिट (सीयू) हे सुरूच असल्याचे मतमोजणी कर्मचाºयांना यावेळी आढळून आले. वास्तविक, मतदान झाल्यावर क्लोज बटन दाबून युनीट सील करावे लागते. त्यामुळे या सर्व मशीनची मतमोजणी थांबविण्यात आली व आयोगाचे मुख्य निरीक्षक दिनेशकुमार यांच्या परवानगीने संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी आटोपल्यानंतर बटन बंद करून मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणीची प्रक्रिया काही वेळासाठी खोळंबली. तीन प्रशिक्षणानंतर जर राष्ट्रीय कर्तव्यात चूक होत असेल, तर अशा कर्मचाºयाविरुद्ध आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.फेरीनिहाय संख्येतदेखील विसंगतीआयोगाने अमरावती येथील मतमोजणी केंद्र आदर्श ठरविले होते. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत खोळंबा व त्यामुळे सुविधा पोर्टल, आरओंद्वारे ध्वनिक्षेपकावरून जाहीर फेरीचे आकडे व माध्यम कक्षात देण्यात आलेली फेरीनिहाय शीट यामध्ये तफावत दिसून आली. हा घोळ शेवटपर्यत सुरू होता. सूत्रांच्या माहितीनुसार, ३२ ईव्हीएमच्या आकडेवारीमुळेच हा घोळ झाला व आदर्श मतमोजनी केंद्रात विसंगती दिसून आली.सर्व ३२ मतदान केंद्राध्यक्षांना बोलावून चूक कशी झाली, याची कारणमीमांसा करणार आहोत. त्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी याबाबतचा निर्णय घेतील.- शरद पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी