शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘त्या’ केंद्राध्यक्षांवर ‘आरओ’ मेहरबान का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:25 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत केंद्रावरील मतदान आटोपल्यानंतर ३२ केंद्राध्यक्षांनी र्इ$व्हीएमचे ‘क्लोज बटन’ सुरूच ठेवल्याने मतदान यंत्र सुरूच राहिले. त्यामुळे आयोगाने आदर्श असे मानांकन दिलेल्या अमरावती लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान काही काळ खोळंबा निर्माण झाला व आकडेवारीतही विसंगती आली.

ठळक मुद्दे३२ सीयूचे प्रकरण : मतदान प्रक्रियेनंतरही ईव्हीएमचे बटन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत केंद्रावरील मतदान आटोपल्यानंतर ३२ केंद्राध्यक्षांनी र्इ$व्हीएमचे ‘क्लोज बटन’ सुरूच ठेवल्याने मतदान यंत्र सुरूच राहिले. त्यामुळे आयोगाने आदर्श असे मानांकन दिलेल्या अमरावती लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान काही काळ खोळंबा निर्माण झाला व आकडेवारीतही विसंगती आली. तीन वेळा प्रशिक्षण झाल्यानंतरही निष्काळजीपणा करणाऱ्या मतदान केंद्राध्यक्षांवर निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) अद्याप मेहरबान का, असा मतदारांचा सवाल आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी सर्व कर्मचाऱ्यांना तीन वेळा प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर १८ एप्रिल रोजी सहा विधानसभा मतदारसंघांतील दोन हजार मतदान केंद्रांवर मतदान झाले. सर्व ईव्हीएम अमरावती येथील नेमाणी गोडाऊनमधील स्ट्राँग रूममध्ये त्याच रात्री जमा करण्यात आल्यात व स्ट्राँग रूम सील करण्यात आल्यात. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी सकाळी ७ वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजता टपाली व साडेआठ वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली. अमरावती, तिवसा व अचलपूर विधानसभा मतदारसंघातील ३२ केंद्रांवरील ३२ ईव्हीएमचे कंट्रोल युनिट (सीयू) हे सुरूच असल्याचे मतमोजणी कर्मचाºयांना यावेळी आढळून आले. वास्तविक, मतदान झाल्यावर क्लोज बटन दाबून युनीट सील करावे लागते. त्यामुळे या सर्व मशीनची मतमोजणी थांबविण्यात आली व आयोगाचे मुख्य निरीक्षक दिनेशकुमार यांच्या परवानगीने संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी आटोपल्यानंतर बटन बंद करून मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणीची प्रक्रिया काही वेळासाठी खोळंबली. तीन प्रशिक्षणानंतर जर राष्ट्रीय कर्तव्यात चूक होत असेल, तर अशा कर्मचाºयाविरुद्ध आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.फेरीनिहाय संख्येतदेखील विसंगतीआयोगाने अमरावती येथील मतमोजणी केंद्र आदर्श ठरविले होते. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत खोळंबा व त्यामुळे सुविधा पोर्टल, आरओंद्वारे ध्वनिक्षेपकावरून जाहीर फेरीचे आकडे व माध्यम कक्षात देण्यात आलेली फेरीनिहाय शीट यामध्ये तफावत दिसून आली. हा घोळ शेवटपर्यत सुरू होता. सूत्रांच्या माहितीनुसार, ३२ ईव्हीएमच्या आकडेवारीमुळेच हा घोळ झाला व आदर्श मतमोजनी केंद्रात विसंगती दिसून आली.सर्व ३२ मतदान केंद्राध्यक्षांना बोलावून चूक कशी झाली, याची कारणमीमांसा करणार आहोत. त्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी याबाबतचा निर्णय घेतील.- शरद पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी