शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

आकाशवाणी कार्यक्रमांचा उद्देश काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:24 IST

येथील आकाशवाणी केंद्रातून मराठी भाषा आणि विविध क्षेत्रांत अमरावतीची नवी ओळख निर्माण करणाºया व्यक्तींच्या कार्याची दखल घेतली जात नसल्याचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देप्रतिभावंत, कर्मयोगी दुर्लक्षित : अधिकारी, कर्मचाºयांचे वास्तव्य परगावी, स्थानिक गुणवत्ता हेरण्यात अपयश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील आकाशवाणी केंद्रातून मराठी भाषा आणि विविध क्षेत्रांत अमरावतीची नवी ओळख निर्माण करणाºया व्यक्तींच्या कार्याची दखल घेतली जात नसल्याचा सूर उमटत आहे.शिक्षण, माहिती-प्रसारण, प्रबोधन, प्रेरणाकार्य, कला-लोककला, भाषा आदींबाबतचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आकाशवाणी कार्यरत आहे. स्थानिक केंद्रांमधून अशा स्थानिकांना स्थान मिळणे अपेक्षित आहे. परंतु, विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे अनेक व्यक्तिमत्त्व आकाशवाणीने दुर्लक्षित केले आहेत.प्रसारणाची संधी मिळण्यासाठी कुठलीही निश्चित शिस्त आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रात नाही. संबंधितांशी स्वत: संपर्क करुन बायोडेटा मागवून प्रसारणाची संधी दिली जाते, अशी माहिती कार्यक्रम प्रमुख सुनालिनी शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही पद्धती आक्षेपार्ह नसली तरी अनेक प्रतिभावंत आणि कर्मयोगी शर्मा यांच्या यादीत समाविष्ट नसल्यामुळे त्यांच्यात नाखुषीचा सूर आहे.केंद्र सरकारच्या नभोवाणी मंत्रालयाने आकाशवाणी केंद्राच्या परिसरात अधिकारी, कर्मचाºयांसाठीे स्वतंत्र वसाहत साकारली आहे. नियमानुसार याच वसाहतीत वास्तव्य असावे, असे अपेक्षित आहे. परंतु, काही अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता ये-जा करीत असल्याने कार्यक्रमांच्या दर्जावरही त्याचा परिणाम होतो. स्थानिक पातळीवर दोन तास कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहेत. त्यातही मराठी भाषेशी दुजाभाव केला जातो, अशी खंत जिल्हाभरातील अनेक मराठीप्रेमींनी व्यक्त केली.खरे हिरे दुर्लक्षित?अमरावतीच्या महेंद्र भुतडा आणि अजय दातेराव या समाजकार्याला वाहिलेल्या मित्रांनी रक्तदान चळवळीत देशभरात नवा विक्रम केला. १९७६ पासून रक्तदान करणे आणि त्यासाठी प्रेरित करणे हेच ध्येय बाळगलेल्या या दोघांनी ४५०० रक्तदान शिबिरे आयोजित करून साडेतीन लक्ष युनिट (बॉटल) रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिले. हजारोंचे प्राण त्यामुळे वाचू शकले. नि:शुल्क सेवा देणाºया या देवदूतांची दखल राष्ट्रपतींनी घेतली. मात्र, अमरावती आकाशवाणीने त्यांना दुर्लक्षित केले. उदाहरणादाखल भुतडा आणि दातेराव यांचा उल्लेख येथे केला असला तरी अशा अनेक हिºयांची चमक आकाशवाणीला का दिसू नये?आकाशवाणी प्रसारण केंद्रातून स्थानिक २०० जणांना संधी दिली. त्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. एकाच व्यक्तीला वारंवार बोलावून प्रसार, प्रचार केला जात नाही.- सुनालिनी शर्माकार्यक्रम प्रमुख,आकाशवाणी, अमरावती.