शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पणन केंद्रांची गरजच काय ?

By admin | Updated: March 24, 2017 00:09 IST

सहा महिन्यांपासून पणन् महासंघ व सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्रावर कापसाच्या एका बोंडाची देखील खरेदी झालेली नाही.

शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी : खुल्या बाजारात मिळतो जादा भाव अमरावती : सहा महिन्यांपासून पणन् महासंघ व सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्रावर कापसाच्या एका बोंडाची देखील खरेदी झालेली नाही. शासन हमीभावात वाढ करीत नाही आणि त्यासाठी पणन् मंडळाद्वारे केले जाणारे प्रयत्नही थिटे पडत असल्याने केवळ शेतकऱ्यांना मदत करण्याचा देखावा करण्यासाठी असलेली ही केंद्र, हवीत तरी कशाला, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला खुल्या बाजारात जादा दर मिळत असल्याने शेतकरी मागील दीड दशकांत या केंद्रांकडे फिरकलेला नाही. शासनाकडून हमीभावात वाढ केली जात नसल्याने शेतकरी खुल्या बाजाराकडे वळतात. परिणामी १२-१५ वर्षांपासून पणन्च्या कापूस खरेदी केंद्रांवर अवकळा आली आहे. शासकीय खरेदी केंद्रांमध्ये उद्घाटनालाही कापूस मिळत नसल्याची लाजिरवाणी अवस्था आहे. अशीच स्थिती राहिल्यास लवकरच पणन्चे अस्तित्व नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. राज्याचे ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाडात एकेकाळच्या वैभवप्राप्त पणन् महासंघांची अवस्था दयनिय झाली आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, म्हणून पणन् महासंघाद्वारा दरवर्षी दिवाळीला शासकीय खरेदी केंद्र सुरू होतात. परंतु ते केवळ नामधारी असतात. हमीभाव अत्यंत कमी असल्याने महत्प्रयासाने पिकविलेला कापूस याकेंद्रांमध्ये आणून मातीमोल भावात विकण्याऐवजी शेतकरी खुल्या बाजाराकडे वळतात. त्यामुळे पणन्चे केंद्र केवळ दिखाव्यापुरतेच उरलेत, अशी स्थिती आहे. यंदा हंगामापूर्वीच कापसाला ५८०० रूपये क्विंटल दर होता. शिवाय सद्यस्थितीत खुल्या बाजारात कापासाला हमीपेक्षा अधिक भाव असल्याने कापूस उत्पादक मात्र याकेंद्रांकडे फिरकलेलेच नाहीत. तरीही शेतकरी येतील, या आशेवर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत पणन्द्वारे व सीसीआयद्वारा तीन तालुक्यांमध्ये ३१ मार्चपर्यंत हे केंद्र सुरू राहणार आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असलेला हमीभाव आणि दुसरीकडे वाढत चाललेली ढेप, सरकीची मागणी, असे विरोधाभासी चित्र आहे. दरवर्षीच पणन् महासंघाच्या बैठकीत कापसाचे हमीभाव वाढवावेत, यासाठी ठराव घेऊन केंद्र शासनाकडे पाठविण्यात येतो. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. मात्र, खुल्या बाजारात दर कमी झाल्यास शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, याउद्देशाने ३१ मार्चपर्यंत केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. - छाया दंडाळे, संचालिका, पणन् महासंघ, मुंबई