शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

पणन केंद्रांची गरजच काय ?

By admin | Updated: March 24, 2017 00:09 IST

सहा महिन्यांपासून पणन् महासंघ व सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्रावर कापसाच्या एका बोंडाची देखील खरेदी झालेली नाही.

शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी : खुल्या बाजारात मिळतो जादा भाव अमरावती : सहा महिन्यांपासून पणन् महासंघ व सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्रावर कापसाच्या एका बोंडाची देखील खरेदी झालेली नाही. शासन हमीभावात वाढ करीत नाही आणि त्यासाठी पणन् मंडळाद्वारे केले जाणारे प्रयत्नही थिटे पडत असल्याने केवळ शेतकऱ्यांना मदत करण्याचा देखावा करण्यासाठी असलेली ही केंद्र, हवीत तरी कशाला, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला खुल्या बाजारात जादा दर मिळत असल्याने शेतकरी मागील दीड दशकांत या केंद्रांकडे फिरकलेला नाही. शासनाकडून हमीभावात वाढ केली जात नसल्याने शेतकरी खुल्या बाजाराकडे वळतात. परिणामी १२-१५ वर्षांपासून पणन्च्या कापूस खरेदी केंद्रांवर अवकळा आली आहे. शासकीय खरेदी केंद्रांमध्ये उद्घाटनालाही कापूस मिळत नसल्याची लाजिरवाणी अवस्था आहे. अशीच स्थिती राहिल्यास लवकरच पणन्चे अस्तित्व नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. राज्याचे ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाडात एकेकाळच्या वैभवप्राप्त पणन् महासंघांची अवस्था दयनिय झाली आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, म्हणून पणन् महासंघाद्वारा दरवर्षी दिवाळीला शासकीय खरेदी केंद्र सुरू होतात. परंतु ते केवळ नामधारी असतात. हमीभाव अत्यंत कमी असल्याने महत्प्रयासाने पिकविलेला कापूस याकेंद्रांमध्ये आणून मातीमोल भावात विकण्याऐवजी शेतकरी खुल्या बाजाराकडे वळतात. त्यामुळे पणन्चे केंद्र केवळ दिखाव्यापुरतेच उरलेत, अशी स्थिती आहे. यंदा हंगामापूर्वीच कापसाला ५८०० रूपये क्विंटल दर होता. शिवाय सद्यस्थितीत खुल्या बाजारात कापासाला हमीपेक्षा अधिक भाव असल्याने कापूस उत्पादक मात्र याकेंद्रांकडे फिरकलेलेच नाहीत. तरीही शेतकरी येतील, या आशेवर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत पणन्द्वारे व सीसीआयद्वारा तीन तालुक्यांमध्ये ३१ मार्चपर्यंत हे केंद्र सुरू राहणार आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असलेला हमीभाव आणि दुसरीकडे वाढत चाललेली ढेप, सरकीची मागणी, असे विरोधाभासी चित्र आहे. दरवर्षीच पणन् महासंघाच्या बैठकीत कापसाचे हमीभाव वाढवावेत, यासाठी ठराव घेऊन केंद्र शासनाकडे पाठविण्यात येतो. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. मात्र, खुल्या बाजारात दर कमी झाल्यास शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, याउद्देशाने ३१ मार्चपर्यंत केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. - छाया दंडाळे, संचालिका, पणन् महासंघ, मुंबई