शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

मोतीनाल्यावर किती बळी हवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:18 IST

दीड वर्षात ३० पेक्षा अधिक अपघातात पाच जणांचा बळी व ३० जण जखमी झाल्याची नोंद सेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलावर झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल केला जात आहे.

ठळक मुद्दे‘बी अँड सी’ला सवाल : ३० हून अधिक अपघात; ५ जणांचा बळी

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : दीड वर्षात ३० पेक्षा अधिक अपघातात पाच जणांचा बळी व ३० जण जखमी झाल्याची नोंद सेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलावर झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल केला जात आहे.परतवाडा-खंडवा या मध्यप्रदेशात जाणाऱ्या आंतरराज्यीय महामार्गावर सेमाडोहपासून सहा कि.मी अंतरावर मोतीनाला पूल आहे. तो संपूर्ण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही त्यांचीच आहे. अनेक ब्रिटिशकालीन पूल या रस्त्यावर आहेत. मात्र, त्यातील मोतीनालापूल वाहनधारकांच्या जीवावर उठला आहे. शनिवारी दुचाकीने जाणाºया शिक्षकांसह दोघांचा बळी याच पुलाने घेतला.तात्काळ उपाययोजनेची गरजत्यावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी कशाची वाट पाहत आहे, हे न उलगडणारे कोडेच ठरले आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने पूर्वीच्या अपघातांचे सचित्र वृत्त प्रकाशित केले आहे, हे विशेष.या करा तत्काळ उपाययोजनामोतीनाला पूल हा अरुंद आहे. त्यावर बांधण्यात येणारे सुरक्षा कठडे वळणावर असल्यामुळे ट्रक व जड वाहनांनी तुटून जातात. त्यामुळे दुचाकीस्वारासाठी हा पूल जीवघेणा ठरला आहे. भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन २५ फूट खाली कोसळतात. त्यात अपघात होऊन गंभीर जखमी व जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे तेथे सुरक्षा फलक आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे नूतनीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे. सतत अपघात होणाºया या पुलाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने हा संशोधनाचा विषय ठरत आहे.मोतीनाला पुलावर अनेकदा अपघात घडले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले जाणार आहे.- आकाश शिंदे,ठाणेदार, चिखलदरामोतीनाल्यावरील पुलाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविला आहे. अपघात पाहता पुलावर कठडे, रस्त्यावर गतिरोधक व फलक तत्काळ लावण्यात येईल.- नितीन देशमुख,उपविभागीय अभियंता, सा.बां.