शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

मोतीनाल्यावर किती बळी हवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:18 IST

दीड वर्षात ३० पेक्षा अधिक अपघातात पाच जणांचा बळी व ३० जण जखमी झाल्याची नोंद सेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलावर झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल केला जात आहे.

ठळक मुद्दे‘बी अँड सी’ला सवाल : ३० हून अधिक अपघात; ५ जणांचा बळी

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : दीड वर्षात ३० पेक्षा अधिक अपघातात पाच जणांचा बळी व ३० जण जखमी झाल्याची नोंद सेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलावर झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल केला जात आहे.परतवाडा-खंडवा या मध्यप्रदेशात जाणाऱ्या आंतरराज्यीय महामार्गावर सेमाडोहपासून सहा कि.मी अंतरावर मोतीनाला पूल आहे. तो संपूर्ण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही त्यांचीच आहे. अनेक ब्रिटिशकालीन पूल या रस्त्यावर आहेत. मात्र, त्यातील मोतीनालापूल वाहनधारकांच्या जीवावर उठला आहे. शनिवारी दुचाकीने जाणाºया शिक्षकांसह दोघांचा बळी याच पुलाने घेतला.तात्काळ उपाययोजनेची गरजत्यावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी कशाची वाट पाहत आहे, हे न उलगडणारे कोडेच ठरले आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने पूर्वीच्या अपघातांचे सचित्र वृत्त प्रकाशित केले आहे, हे विशेष.या करा तत्काळ उपाययोजनामोतीनाला पूल हा अरुंद आहे. त्यावर बांधण्यात येणारे सुरक्षा कठडे वळणावर असल्यामुळे ट्रक व जड वाहनांनी तुटून जातात. त्यामुळे दुचाकीस्वारासाठी हा पूल जीवघेणा ठरला आहे. भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन २५ फूट खाली कोसळतात. त्यात अपघात होऊन गंभीर जखमी व जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे तेथे सुरक्षा फलक आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे नूतनीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे. सतत अपघात होणाºया या पुलाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने हा संशोधनाचा विषय ठरत आहे.मोतीनाला पुलावर अनेकदा अपघात घडले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले जाणार आहे.- आकाश शिंदे,ठाणेदार, चिखलदरामोतीनाल्यावरील पुलाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविला आहे. अपघात पाहता पुलावर कठडे, रस्त्यावर गतिरोधक व फलक तत्काळ लावण्यात येईल.- नितीन देशमुख,उपविभागीय अभियंता, सा.बां.