शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मोतीनाल्यावर किती बळी हवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:18 IST

दीड वर्षात ३० पेक्षा अधिक अपघातात पाच जणांचा बळी व ३० जण जखमी झाल्याची नोंद सेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलावर झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल केला जात आहे.

ठळक मुद्दे‘बी अँड सी’ला सवाल : ३० हून अधिक अपघात; ५ जणांचा बळी

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : दीड वर्षात ३० पेक्षा अधिक अपघातात पाच जणांचा बळी व ३० जण जखमी झाल्याची नोंद सेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलावर झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल केला जात आहे.परतवाडा-खंडवा या मध्यप्रदेशात जाणाऱ्या आंतरराज्यीय महामार्गावर सेमाडोहपासून सहा कि.मी अंतरावर मोतीनाला पूल आहे. तो संपूर्ण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही त्यांचीच आहे. अनेक ब्रिटिशकालीन पूल या रस्त्यावर आहेत. मात्र, त्यातील मोतीनालापूल वाहनधारकांच्या जीवावर उठला आहे. शनिवारी दुचाकीने जाणाºया शिक्षकांसह दोघांचा बळी याच पुलाने घेतला.तात्काळ उपाययोजनेची गरजत्यावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी कशाची वाट पाहत आहे, हे न उलगडणारे कोडेच ठरले आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने पूर्वीच्या अपघातांचे सचित्र वृत्त प्रकाशित केले आहे, हे विशेष.या करा तत्काळ उपाययोजनामोतीनाला पूल हा अरुंद आहे. त्यावर बांधण्यात येणारे सुरक्षा कठडे वळणावर असल्यामुळे ट्रक व जड वाहनांनी तुटून जातात. त्यामुळे दुचाकीस्वारासाठी हा पूल जीवघेणा ठरला आहे. भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन २५ फूट खाली कोसळतात. त्यात अपघात होऊन गंभीर जखमी व जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे तेथे सुरक्षा फलक आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे नूतनीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे. सतत अपघात होणाºया या पुलाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने हा संशोधनाचा विषय ठरत आहे.मोतीनाला पुलावर अनेकदा अपघात घडले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले जाणार आहे.- आकाश शिंदे,ठाणेदार, चिखलदरामोतीनाल्यावरील पुलाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविला आहे. अपघात पाहता पुलावर कठडे, रस्त्यावर गतिरोधक व फलक तत्काळ लावण्यात येईल.- नितीन देशमुख,उपविभागीय अभियंता, सा.बां.