शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:10 IST

अमरावती/ संदीप मानकर संचारबंदीत शिथिलता मिळताच शहरातील मोबाईल शॉपीमध्ये दुरुस्ती तथा खरेदीकरिता नागरिकांची गर्दी उसळली. काही विनामास्क, तर सेल्फ ...

अमरावती/ संदीप मानकर

संचारबंदीत शिथिलता मिळताच शहरातील मोबाईल शॉपीमध्ये दुरुस्ती तथा खरेदीकरिता नागरिकांची गर्दी उसळली. काही विनामास्क, तर सेल्फ डिस्टंसिंगचा पूर्णत: फज्जा उडाला. यावरून मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, असे उद्गार सुजाण नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळाला.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये १ जूनपासून कोरोना संदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात आले. बाहेर पडायची वेळ दुपारी २ वाजेपर्यंतच असल्याने सर्वसामान्य नागरिक छोट्या-छोट्या कामासाठी बाहेर पडून बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. त्यात नवीन मोबाईल खरेदी करणे व जुना मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी शुक्रवारी राजकमल चौकासह इतर महत्त्वाच्या चौकांतील मोबाईल दुकानांत गर्दी केली होती. असे असताना अनेकांनी मास्क घातले नव्हते. दुकानात फिजिकल डिस्टंसिगचा फज्जा उडाला. त्यामुळे कोरोनावर मात कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्यापही कोरोना संपला नसून मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, अशी प्रतिक्रिया काही तज्ज्ञांची होती.

येथील महत्त्वाचा चौक मानल्या जाणारा राजकमल चौक, जयस्तंभ चौकात काही मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या दुकानात जावून रियालिटी चेक केली असता, गत दिड महिन्यापासून मोबाईलचे दुकाने बंद होती. त्यामुळे नवीन मोबाईल खरेदीला अचानक ब्रेक लागला. तसेच ज्यांचे मोबाईल नादुरुस्त झाली. त्यांना मोबाईल दुरुस्तीकरिता कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे दुकाने उघडतास अनेकांनी मार्केटमध्ये धाव घेतली. काहींनी मोबाईल दुरुस्तीकरिता आल्याचे तर काहींनी नविन मोबाईल खरेदी करण्याकरिता आल्याचे सांगितले. कोरोनाची भीती जरी असली तरी मोबाईल हे जीवनातील महत्त्वाचे साधन झाल्याने त्याच्याशिवाय राहणे कठीण झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

बॉक्स

स्क्रीन गार्ड, मोबाईल रिपेअरिंग

लॉकडाऊन दरम्यान अनेकांचा मोबाईल खाली पडल्याने स्क्रीन गार्ड फुटले तर अनेकांचे डिस्प्ले गेले. काहींचे चार्जर खराब झाले तर काहींची मोबाईल हँग झाले. त्यामुळे समस्या सोडविण्याकरिता अनेक नागरिकांनी मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या मोबाईल शॉपीच्या संचालकांशी संपर्क साधून कुणी मोबाईची बॉडी बदलविली. तर कुणी रिंगर, स्क्रीन गार्ड व कोम्बो टाकून घेतला.

बॉक्स

दीड महिन्यापासून मोबाईल दुकाने बंद

सव्वा वर्षात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन झाले त्यामुळे मोबाईल व्यावसायिकांचा वर्षभर व्यवसाय बुडाला. अमरावतीत फेब्रुवारी पासून तर ३१ मे पर्यंत अनेकदा कडक निर्बंध लावून लॉकडाऊन केल्या गेले. मात्र एप्रिल व मे महिन्यात दिड महिना सर्वाधिक लॉकडाऊन करण्यात आल्याने दीड महिन्यापासून शहरातील मोबाईल दुकानदारांनी शेटर उघडलेच नाही. १ जून पासून शेटर उघडण्यात आले.

कोट

नवीन मोबाईल खरेदीसाठी तसेच रिपेरींगकरीता ग्राहक येत आहेत. यात चार्जर स्क्रीनगार्डची मागणी जास्त आहे. दुकानात सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. मास्कसाठी सक्ती केली जाते.

सागर तरडेजा, मोबाईल शाॅपी संचालक राजकमल

कोट

गत वर्षीच्या तुलनेत यंदा पाहिजे तसा व्यवसाय राहला नाही. गेल्या दोन दिवसापासून काही ग्राहक संपर्क करीत आहेत. प्रशासनाने दोन वाजता ऐवजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत वेळ द्यावा म्हणजे नागरिकांची गर्दी सुद्धा होणार नाही.

शरद गासे, मोबाईल संचालक राजकमल चौक

कोट

मोबाईलमध्ये मेमरी स्टोरेज कमी असल्याने मोबाईल हँग झाला. त्याला दुरुस्तीकरण्याऐवजी नवीन मोबाईल घेण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची भीती आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल जीवनावश्यक बाब झाली आहे.

आकाश वैद्य, ग्राहक अमरावती

कोट

मोबाईल खराब झाला आहे. त्याला दुरुस्तीपण करायची होती व एक नवीन मोबाईल खरेदी करायचा होता. दीड महिन्यापासून दुकान उघडण्याची प्रतीक्षा होती.

स्वप्निल अर्मळ ग्राहक पिंपळखुटा