शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:10 IST

अमरावती/ संदीप मानकर संचारबंदीत शिथिलता मिळताच शहरातील मोबाईल शॉपीमध्ये दुरुस्ती तथा खरेदीकरिता नागरिकांची गर्दी उसळली. काही विनामास्क, तर सेल्फ ...

अमरावती/ संदीप मानकर

संचारबंदीत शिथिलता मिळताच शहरातील मोबाईल शॉपीमध्ये दुरुस्ती तथा खरेदीकरिता नागरिकांची गर्दी उसळली. काही विनामास्क, तर सेल्फ डिस्टंसिंगचा पूर्णत: फज्जा उडाला. यावरून मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, असे उद्गार सुजाण नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळाला.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये १ जूनपासून कोरोना संदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात आले. बाहेर पडायची वेळ दुपारी २ वाजेपर्यंतच असल्याने सर्वसामान्य नागरिक छोट्या-छोट्या कामासाठी बाहेर पडून बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. त्यात नवीन मोबाईल खरेदी करणे व जुना मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी शुक्रवारी राजकमल चौकासह इतर महत्त्वाच्या चौकांतील मोबाईल दुकानांत गर्दी केली होती. असे असताना अनेकांनी मास्क घातले नव्हते. दुकानात फिजिकल डिस्टंसिगचा फज्जा उडाला. त्यामुळे कोरोनावर मात कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्यापही कोरोना संपला नसून मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, अशी प्रतिक्रिया काही तज्ज्ञांची होती.

येथील महत्त्वाचा चौक मानल्या जाणारा राजकमल चौक, जयस्तंभ चौकात काही मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या दुकानात जावून रियालिटी चेक केली असता, गत दिड महिन्यापासून मोबाईलचे दुकाने बंद होती. त्यामुळे नवीन मोबाईल खरेदीला अचानक ब्रेक लागला. तसेच ज्यांचे मोबाईल नादुरुस्त झाली. त्यांना मोबाईल दुरुस्तीकरिता कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे दुकाने उघडतास अनेकांनी मार्केटमध्ये धाव घेतली. काहींनी मोबाईल दुरुस्तीकरिता आल्याचे तर काहींनी नविन मोबाईल खरेदी करण्याकरिता आल्याचे सांगितले. कोरोनाची भीती जरी असली तरी मोबाईल हे जीवनातील महत्त्वाचे साधन झाल्याने त्याच्याशिवाय राहणे कठीण झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

बॉक्स

स्क्रीन गार्ड, मोबाईल रिपेअरिंग

लॉकडाऊन दरम्यान अनेकांचा मोबाईल खाली पडल्याने स्क्रीन गार्ड फुटले तर अनेकांचे डिस्प्ले गेले. काहींचे चार्जर खराब झाले तर काहींची मोबाईल हँग झाले. त्यामुळे समस्या सोडविण्याकरिता अनेक नागरिकांनी मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या मोबाईल शॉपीच्या संचालकांशी संपर्क साधून कुणी मोबाईची बॉडी बदलविली. तर कुणी रिंगर, स्क्रीन गार्ड व कोम्बो टाकून घेतला.

बॉक्स

दीड महिन्यापासून मोबाईल दुकाने बंद

सव्वा वर्षात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन झाले त्यामुळे मोबाईल व्यावसायिकांचा वर्षभर व्यवसाय बुडाला. अमरावतीत फेब्रुवारी पासून तर ३१ मे पर्यंत अनेकदा कडक निर्बंध लावून लॉकडाऊन केल्या गेले. मात्र एप्रिल व मे महिन्यात दिड महिना सर्वाधिक लॉकडाऊन करण्यात आल्याने दीड महिन्यापासून शहरातील मोबाईल दुकानदारांनी शेटर उघडलेच नाही. १ जून पासून शेटर उघडण्यात आले.

कोट

नवीन मोबाईल खरेदीसाठी तसेच रिपेरींगकरीता ग्राहक येत आहेत. यात चार्जर स्क्रीनगार्डची मागणी जास्त आहे. दुकानात सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. मास्कसाठी सक्ती केली जाते.

सागर तरडेजा, मोबाईल शाॅपी संचालक राजकमल

कोट

गत वर्षीच्या तुलनेत यंदा पाहिजे तसा व्यवसाय राहला नाही. गेल्या दोन दिवसापासून काही ग्राहक संपर्क करीत आहेत. प्रशासनाने दोन वाजता ऐवजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत वेळ द्यावा म्हणजे नागरिकांची गर्दी सुद्धा होणार नाही.

शरद गासे, मोबाईल संचालक राजकमल चौक

कोट

मोबाईलमध्ये मेमरी स्टोरेज कमी असल्याने मोबाईल हँग झाला. त्याला दुरुस्तीकरण्याऐवजी नवीन मोबाईल घेण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची भीती आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल जीवनावश्यक बाब झाली आहे.

आकाश वैद्य, ग्राहक अमरावती

कोट

मोबाईल खराब झाला आहे. त्याला दुरुस्तीपण करायची होती व एक नवीन मोबाईल खरेदी करायचा होता. दीड महिन्यापासून दुकान उघडण्याची प्रतीक्षा होती.

स्वप्निल अर्मळ ग्राहक पिंपळखुटा