शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

आज संपणार मुदत, ३७ हजार टोकनचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:55 IST

जिल्ह्यातील १२ तूर खरेदी केंद्रांवर मंगळवार १५ मे पासून तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे. १८ एप्रिलनंतर मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ खरेदीदार यंत्रणांनी उठविलाच नाही.

ठळक मुद्देखरेदीची मंदगतीच कारणीभूत : शेतकऱ्यांच्या घरी तीन लाख क्विंटल तूर पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १२ तूर खरेदी केंद्रांवर मंगळवार १५ मे पासून तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे. १८ एप्रिलनंतर मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ खरेदीदार यंत्रणांनी उठविलाच नाही. याऊलट बारदाना, गोदाम नाही आदी सबबीखाली मोजणीची मंदगती कायम ठेवल्यानेच जिल्ह्यातील ३७ हजार टोकनधारक शेतकरी प्रतीक्षेत राहिले आहेत. आता शेतकरी खरीपपूर्व मशागत व लगेच पेरणीच्या कामात व्यस्त होणार असल्यानेच शासनाने वेळकाढू धोरणाचा अबलंब केल्याचा आरोप होत आहे.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १२ तूर खरेदी केंद्रांवर बुधवार १८ एप्रिलपर्यंतच आॅनलाईन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश आहेत. त्यानंतर आठ दिवसांनी केंद्रांना १५ मुदतवाढ दिली असली तरी खरेदीदार यंत्रणांनी निव्वळ टाईमपास केला. त्यामुळेच आजतारखेला ३७ हजार ४४२ टोकनधारक शेतकºयांची किमान तीन लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे.जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १३ मेपर्यंत ५.२१ लाख क्विंटल तूर खरेदी झाली असली तरी किमान तीन लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. तूर खरेदीला १५ मे ची 'डेडलाइन' देण्यात आली. जिल्हा तूर उत्पादकतेच्या एकूण २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबईस्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना दिलेत. यामुळे सद्यस्थितीत ७०,१९७ शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी, प्रत्यक्षात ३२,७५५ शेतकºयांची ५.२१ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचे वास्तव आहे.यंदाच्या हंगामात साधारणपणे एक लाख १० हजार क्विंटल तुरीचे क्षेत्र होते व कृषी विभागाने हेक्टरी सरासरी उत्पादकता १५ क्विंटल जाहीर केली त्यानुसार जिल्ह्यात यंदा १५ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापैकी सहा ते सात लाख क्विंटल तूर नाफेडच्या दिरंगाईमुळे खासगी बाजारात विकल्या गेली असली तरी अद्याप शेतकºयांच्या घरी किमान तीन लाख क्विंटल तूर पडून आहे. त्यामुळे या सर्व केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.अशी आहेकेंद्रनिहाय नोंदणीसद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर ८,८६३, अमरावती- ८,६१३, अंजनगाव सुर्जी- १,२९९, चांदूरबाजार- २,००७, चांदूर रेल्वे ४,७४३, दर्यापूर- ७,२२६, धारणी- ९३५, नांदगाव खंडेश्वर- ४,७३४, तिवसा- २,७८६, मोर्शी- ७,४१५, धामणगाव रेल्वे- ६,४६४ व वरूड तालुक्यात ७,५०७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.अशी आहेकेंद्रनिहाय खरेदीसद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर ४८,४४७, अमरावती- ६९,६९३, अंजनगाव सुर्जी- ३४,४५२, चांदूरबाजार- ४०,४१५, चांदूररेल्वे- ४०,५२८, दर्यापूर- ७८,०७८, धारणी- ८,१५८, नांदगाव खंडेश्वर- २५,००२, तिवसा- २९,५२१, धामणगाव- ३४६६३, मोर्शी- ६५ हजार ८८ व वरुड तालुक्यात ४७,६४१ क्विंटल खरेदी केली आहे.