शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

ओल्या दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 14, 2015 00:58 IST

पावसाने ७ दिवस दडी मारली खरी; मात्र यानंतर ४ आॅगस्टला सुरू झालेला पाऊस थांबायचे नाव नाही. १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे.

१० दिवसांपासून सतत पाऊस : कपाशी, तुरीला बाधकअमरावती : पावसाने ७ दिवस दडी मारली खरी; मात्र यानंतर ४ आॅगस्टला सुरू झालेला पाऊस थांबायचे नाव नाही. १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. नदी-नाले ओसंडून वाहत आहेत, शेती पिकामध्ये पाणी साचले आहे, सर्वच धरणांची स्थिती ‘ओव्हरफ्लो’ आहे. १५ आॅगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शेती पिकासह सर्वच घटकांना बाधक असल्याने जिल्हावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यात ४ आॅगस्टपासून पावसाला सुरुवात झाली. यावेळी जिल्ह्यात १ जून ते ४ आॅगस्टपर्यंत केवळ ३०४.९ मि.मी. पावसाची नोंद होती. हा पाऊस जिल्ह्याच्या अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १४० मि.मी. कमी होता. सद्यस्थितीत ३१ आॅगस्टपर्यंत पावसाची अपेक्षित सरासरी ५१४.६ मि.मी. असताना ५५९ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील १० दिवसांत तब्बल २६० मि.मी. पाऊस जिल्ह्यात पडला आहे व यापैकी १४८.८ मि.मी. पाऊस ४ ते ५ आॅगस्ट या २४ तासांत पडला होता व जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. या अतीपावसाने नदी-नाल्याकाठची किमान ५ हजार हेक्टरमधील शेतीपिके खरडली आहे. शेतात तळे साचले आहेत. शेतातील जवरणी, निंदण-खुपणाची कामे खोळंबली आहेत. कपाशी व तूर पिकावर ‘आकस्मित मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने अगदी थोड्या पावसाने नदी-नाल्यांना पूर येत आहे. यामध्ये जीवितहानी व वित्तहानी होत आहे. अनेक गावांचा संपर्क तुटतो, वीजपुरवठा खंडित होतो, हे नव्याने संकट उद्भवत आहे. ग्रामीण भागातील रस्ते चिखलात बुजले आहेत, शहरातील रस्ते खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती उद्भवली आहे. प्रदीर्घ दडीनंतर हवाहवासा व दिलासा देणारा पाऊस आता शेती पिकाच्या मुळावर उठला असल्याने जिल्ह्यातील शेती पिकावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.१५ आॅगस्टपर्यंत सतर्कतेचा इशाराविदर्भात १३ ते १५ आॅगस्टपर्यंत ४८ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे नागपूर विमानतळ येथील हवामान खात्याने कळविले आहे. या अनुषंगाने सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांना दिला आहे. हा पाऊस १८ आॅगस्टपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.कमी दाबाचे क्षेत्र होताहेत तयारउत्तर, मध्य प्रदेश, बंगालचा उपसागर, उत्तर आंध्रप्रदेश आणि ओरीसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. सौराष्ट्र, कच्छ, दक्षिण छत्तीसगढ व लगतच्या विदर्भावर ३.१ कि. मी. उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. १० दिवसांत १० व्यक्तींसह १२ जनावरांचा मृत्यूसंततधार पावसामुळे जिल्ह्यात ४ आॅगस्टपासून १३ आॅगस्ट या १० दिवसात १० व्यक्ती व १२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ व्यक्ती वीज पडून तर ६ व्यक्ती पुरात वाहले आहे. गुरांमध्ये २ बैल, ४ म्हशी, २ गाई व ४ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तीन हजार हेक्टरमधीलशेती पिकांचे नुकसानया १० दिवसांत झालेल्या पावसामुळे नदी-नाला काठावरील किमान ३ हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान तिवसा तालुक्यात आहे. साडेतीन हजार घरांची पडझड झाली, तर २० घरे पूर्णत: जमीनदोस्त झालीत.