शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पश्चिम विदर्भात कपाशीपेक्षा सोयाबीनचे क्षेत्र जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अमरावती : यंदा ९ जुलैनंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने खरिपाच्या पेरण्यांची गती आलेली आहे. पश्चिम विदर्भात सद्यस्थितीत सरासरी ३२,२८,५०० हेक्टरच्या ...

अमरावती : यंदा ९ जुलैनंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने खरिपाच्या पेरण्यांची गती आलेली आहे. पश्चिम विदर्भात सद्यस्थितीत सरासरी ३२,२८,५०० हेक्टरच्या तुलनेत २९,८०,१०० हेक्टरवर पेरणी आटोपली, ही ९२ टक्केवारी आहे. यात सोयाबीनचे १३,९९,९१० हेक्टर व कपाशीची ९,७०,४०० हेक्टरमध्ये सद्यस्थितीत लागवड झालेली आहे.

विभागात मान्सून थबकल्यानंतर खरिपाच्या पेरण्याही रखडल्या होत्या. आता मात्र, पावसाची रिपरिप सुरू असल्याने पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पेरण्या सर्वाधिक माघारल्या होत्या. आता पेरण्यांची लगबग सुरू आहे. विभागीय कृषी संहसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यात ६,६१,९०० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली, ही ९०.२ टक्केवारी आहे. अकोला जिल्ह्यात ४,४७,२०० हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या, याची ९२.५ टक्केवारी आहे.

वाशिम जिल्ह्यात ३,८२,३०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही ९४.१ टक्केवारी आहे. अमरावती जिल्ह्यात ६,५०,१०० हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. ही ९४.४ टक्केवारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात ८,४३,००० हेक्टरमध्ये पेरणी आटोपली, ही ९२ टक्केवारी आहे. मागच्या हंगामात याच कालावधीत ९२ टक्के पेरण्या आटोपल्या होत्या.

बॉक्स

कपाशी, सोयाबीनचे पेरणीक्षेत्र

* सोयाबीनची सद्यस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात ३,५५,७०० हेक्टर, अकोला २,१७,६००, वाशिम २,९१,३००, अमरावती २,५१,३०० व यवतमाळ जिल्ह्यात २,८३,८०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.

* कपाशीकरिता बुलडाणा जिल्ह्यात १,८१,१०० हेक्टर, अकोला १,३२,२००, वाशिम २२,०००, अमरावती २,१९,५०० व यवतमाळ जिल्ह्यात ४,२२,५०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.