शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

राष्ट्रसंतांच्या साहित्याचा गैरवापर करणाऱ्यांची खैर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:11 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रचार साहित्यात अनेक प्रकारे ढवळाढवळ केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा वापर करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा श्रीगुरुदेव सेवा मंडळाने उगारला. यासंबंधी गुरुदेवभक्त व अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी यांच्यात मंगळवारी महासमाधी स्थळावर बैठक झाली.

ठळक मुद्देगुरुदेवभक्त, पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा : मंगळवारी तोडगा नाही, पुन्हा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रचार साहित्यात अनेक प्रकारे ढवळाढवळ केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा वापर करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा श्रीगुरुदेव सेवा मंडळाने उगारला. यासंबंधी गुरुदेवभक्त व अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी यांच्यात मंगळवारी महासमाधी स्थळावर बैठक झाली. यात काही तोडगा निघाला नसला तरी काही दिवसांत पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती गुरुदेवभक्तांनी दिली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता, भजने, सुविचार, श्लोक, पोवाडे, भाषणे, लेख, पत्र, ग्रंथ अशा अनेक महत्त्वपूर्ण साहित्यात वारंवार बदल झाल्याचे अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा आरोप आहे. राष्ट्रसंतांचे साहित्य, वस्तू, प्रचाराचे साहित्य, ग्रामगीता प्रकाशनाचा अधिकार राष्ट्रसंतांनीच श्रीगुरुदेव सेवा मंडळाला दिला आहे. मात्र, अनेक जण आपल्या सोयीनुसार त्यात ढवळाढवळ करून चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे अधिकार मंडळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच अनुषंगाने श्री अध्यात्म गुरुकुलचे संचालक रवी खडतकर यांच्या नेतृत्वात गुरुदेवभक्त व श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी यांच्यात पुढील बैठकीत चर्च्चा होणार आहे. या बैठकीला श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, राजाराम बोथे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.यांच्यावर कारवाई होणार काय?संस्थेचे माजी संचालक सुब्बाराव तसेच रामदेवबाबा, आसाराम बापू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यात बदल केले. आता या लोकांवर संस्था कारवाई करणार की खऱ्या प्रचारकांना वेठीस धरणार, असा प्रश्न गुरुदेवभक्त करीत आहेत.माझ्या समाधी परिसरात कुठेही मूर्तिपूजा नको, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीच स्पष्ट केले होते. परंतु, तेथे कित्येक वर्षांपासून हनुमानाची मूर्ती आहे. निवेदन देऊनही या मूर्तीचे स्थलांतर नाही. यावरसुद्धा चर्चा होईल.- रवि खडतकर,संचालक, भूवैकुंठ अध्यात्म गुरुकुल, मोझरीराष्ट्रसंतांच्या साहित्य प्रकाशनाचे सर्व अधिकार अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाला आहेत. जो कोणी साहित्याची मोडतोड करेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात आमच्याशी संपर्क करावा.- जनार्दनपंत बोथे,सरचिटणीस, अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ