शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

विहीर अधिग्रहण मालकांना पाण्यासाठी आता ज्यादा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:52 IST

टंचाई काळात विहीर अथवा अन्य जलाशयांतूून पिण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खासगी मालकांना आता ज्यादा दर देण्यात येणार आहेत. अधिग्रहित जलसाठ्याकरिता खासगी मालकांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात १५० ते २०० रुपये वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदुष्काळग्रस्तांना दिलासा : शासनाकडून १५० ते २०० रुपयांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : टंचाई काळात विहीर अथवा अन्य जलाशयांतूून पिण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खासगी मालकांना आता ज्यादा दर देण्यात येणार आहेत. अधिग्रहित जलसाठ्याकरिता खासगी मालकांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात १५० ते २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. ज्या विहिरींवर विद्युत पंप आणि डिझेलपंप नसेल तर त्यासाठी ४५० रुपये व सुविधा असेल तर ६०० रुपये प्रतिदिन देण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने आदेश जारी केला आहे.यंदा राज्यात वरूणराज्याने काहीशी वक्रदृष्टी केल्यामुळे पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु, टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याचा स्त्रोतच नसेल तर अशा वेळी खासगी विहिरी अधिग्रहित करून त्यातील पाणी ग्रामस्थांना दिले जाते. यासाठी शासनाने यापूर्वीच कायदा करून घेतला असून, प्रसंगी त्याचा वापर केला जातो. खासगी मालकांना विहीर अधिग्रहित करून त्यातील पाणी वापरण्याच्या मोबदल्यात पैसेही अदा करण्याची तरतूद या कायद्यात आहे. परंतु शासनाकडून पाण्याच्या बदल्यात अल्प मोबदला दिला जात असल्यामुळे विहीरमालक पाणी देण्यास टाळाटाळ करीत होते. आतापर्यंत खासगी विहीर अधिग्रहित केल्यानंतर विहीर मालकांनी पाणी काढण्यासाठी विद्युत डिझेलपंप, वीजजोडणी उपलब्ध करून दिली नाही तर त्या मालकाला ३०० रुपये प्रतिदिन आणि विद्युत पंप वीज जोडणीसह साधन समृद्धी तर प्रतिदिन ४०० रुपये मोबदला दिला जात होता. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव पी.आर. खोटरे यांनी काढलेल्या आदेशानुसार आता विहीर बोरवेल अधिग्रहणासाठी विहीर मालकांना प्रतिदिन ४५० रुपये (विद्युत जोडणी नसल्यास) तसेच प्रतिदिन व जोडणी असल्यास प्रतिदिन ६०० रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मिळेल तेथून व्यवस्थासध्या ज्या खासगी विहिरीवर विद्युत पंप डिझेल पंपाची सोय नसेल त्याला ३०० रुपये, तर पाणी उपसा करण्यासाठी सर्व प्रकारची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ४०० रुपये प्रतिदिन मोबदला दिला जातो. दुष्काळी परिस्थितीत मिळेल तेथे पाण्याची व्यवस्था करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना अधिग्रहणाचे अधिकारपाणीटंचाई परिस्थितीमध्ये विहीर व बोअर अधिग्रहण करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत विहीर अधिग्रहण केले जाऊ शकते.विहीर मालकाकडून कायदेशीर करार केला जावा, अधिग्रहण मोबदल्याची रक्कम प्रत्येक तीन महिन्यांनी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत येण्याची प्रतीक्षा न करता संबंधितांना मोबदला प्रदान करावा, असे या आदेशात नमूद आहे.