शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

बाळाच्या जन्माचे स्वागत आता रोपट्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:12 IST

शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात जन्माला आलेल्या बाळाचे स्वागत संबंधित कुटुंबाला वृक्ष किंवा फळझाडांची रोपे देऊन करावे लागणार आहे.

ठळक मुद्देनगरविकास विभागाचा पुढाकार : ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात जन्माला आलेल्या बाळाचे स्वागत संबंधित कुटुंबाला वृक्ष किंवा फळझाडांची रोपे देऊन करावे लागणार आहे. याकरिता नगरविकास विभागाने पुढाकार घेतला असून, ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ या अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे.राष्ट्रीय वननीती, १९८८ मधील धोरणानुसार देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादान, वनीकरण असणे आवश्यक आहे. परंतु, राज्यात हे प्रमाण एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सर्वसाधारणपणे २० टक्के आहे. त्यामुळे तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतूमध्ये होणारे बदल, दुष्काळ किंवा अतिवृष्टी, पूर आदी नैसर्गिक आपत्तींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम लोकचळवळीत रूपांतरित करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक, व्यक्ती, कुटुंब, संस्था आदींचा सहभाग महत्त्वाचा गणला आहे. पुणे जिल्ह्यातील रानमळा ग्रामपंचायतीने जन्म, विवाह आणि मृत्यू आदी प्रसंगाच्या निमित्ताने लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा पॅटर्न आता राज्यभरात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रामुख्याने महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतींमध्ये ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा उपक्रम राबविण्याचे लक्ष आहे. यात जन्म वृक्ष, शुभमंगल वृक्ष, माहेरची साडी, आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष अशा प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करावे लागणार आहे. जन्माला बाळ आल्यास सदर कुटुंबाकडे जाऊन बाळाच्या जन्माचे स्वागत तसेच विवाहप्रसंगी वधू-वरांना शुभाशीर्वाद म्हणून रोपटे द्यावे लागणार आहे. विवाहित मुलगी सासरी गेल्यास तिच्या आई-वडिलांना आपल्या लेकीप्रमाणे माया देऊन झाडांचे संगोपन करण्यासाठीे विनंती प्रशासनाला करावे लागणार आहे. इयत्ता दहावी व बारावीत उत्तीर्ण, नोकरी, स्पर्धा परीक्षेत यशस्वी अथवा निवडणुकांमध्ये विजयी उमेदवारांचे रोपटे देऊन स्वागत करावे लागेल. स्मृती वृक्ष संबंधित दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबीयांना वृक्ष, फळझाडांंची रोपे देऊन श्रद्धांजली अर्पण करावी लागेल तसेच सदर व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्या रोपाचे रोपण करून झाडाच्या रूपाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याबाबत विनंती करावी लागणार आहे.अशी आहेत वृक्षारोपणाची उद्दिष्टेमहापालिका प्रतिवॉर्ड ६०० वृक्ष लागवड. ‘अ’ वर्ग नगर परिषद प्रतिवॉर्ड ३००. ‘ब’ वर्ग नगर परिषद १५०. ‘क’ वर्ग नगर परिषद आणि नगरपंचायती प्रतिवॉर्ड १००.