शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

बुधवारी १७९ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST

अमरावती : मार्चपासून सुरू झालेला कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव नवीन वर्षात कमी होईल, असे संकेत मानले जात होते. मात्र, नव्या ...

अमरावती : मार्चपासून सुरू झालेला कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव नवीन वर्षात कमी होईल, असे संकेत मानले जात होते. मात्र, नव्या वर्षातही जानेवारीपासून दिवसागणिक कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी तब्बल १७९ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही बाब जिल्हा प्रशासनाची चिंतनीय मानली जात आहे.

शासनाने कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे गृहीत धरून व्यापारी संकुल, मॉल, बाजारपेठा, मंगल कार्यालये, आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोना नियमावलींचे पालन करावे, अशी बंधने लादण्यात आली आहेत. तथापि, ८० टक्के नागरीक मास्कचा वापर करीत नाही, हे वास्तव आहे. काही प्रमाणात शाळा सुरू झाल्यात. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होतील, अशी माहिती आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढत असल्याचे आढळून येत असलेल्या संक्रमितांच्या रुग्णसंख्येवरुन स्पष्ट होत आहे.

आरोग्य प्रशासनाच्या माहितीनुसार, बुधवारी एकूण १७९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, गत २४ तासात दोन रुग्ण दगावले आहेत. यात छत्रसालनगरातील ६७ वर्षीय पुरूष तर, अंबिकानगरातील ६४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ४२२ रुग्ण दगावले. तसेच मार्च २०२० ते ३ फेब्रुवारी २०२१ यादरम्यान २२ हजार २७६ संक्रमित आढळून आले आहेत. नव्या वर्षात प्रथमच सर्वाधिक १७९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद बुधवारी झाली आहे. त्यामुळे कोरोना अद्यापही गेला नाही, हे त्याचे जिवंत उदाहरण ठरणारे आहे.

----------

असे वाढले कोरोना संक्रमित रुग्ण

२५ जानेवारी- ८७

२६ जानेवारी- १११

२७ जानेवारी- ३८

२८ जानेवारी- ७८

२९ जोनवारी- ७८

३० जानेवारी- १४९

३१ जानेवारी- १२८

१ फेब्रुवारी- ९२

२ फेब्रुवारी- ११८

३ फेब्रुवारी- १७९

-------------------

जनतेला त्रिसूत्रीचा विसर

कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना जनेतला मात्र त्रिसूत्रीचा विसर पडल्याचे वास्तव आहे. आजही नागरीक बिनधास्तपणे वावरत असून, मास्कचा वापर करीत नाही. मास्क, सॅनिटायझरचा वापर व शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर केल्याशिवाय कोरोना रोखता येणार नाही, असे जिल्हाप्रशासनाने म्हटले आहे. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मात्र, नागरिकांची अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

-----

बाधितांची वाढती संख्या ही बाब प्रशासनासाठी चिंतनीय आहे. नागरीकांनी कोरोना नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने नियमावलींचे पालन करण्यासाठी कठोर उपाययाेजना केल्या जातील.

-प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका.