शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र लढणार; समाजवादीच्या अबू आझमी यांची घोषणा

By उज्वल भालेकर | Updated: March 3, 2024 20:05 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत संविधानविरोधी पक्षांना संपवणार.

अमरावती : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष इंडिया आघाडीमध्ये सहभागी असला तरी महाराष्ट्रामध्ये मात्र आम्ही स्वतंत्र आहोत. आमची कोणाशीही युती नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष हा धर्मनिरपेक्ष उमेदवारांच्या सोबत राहील, अशी भूमिका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी रविवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केली. सध्या देशात संविधानविरोधी लोक सत्तेत आहेत. त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्रात ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ यात्रा सुरू करण्यात आली आहे. यानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी अबू आझमी अमरावतीमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अबू आझमी म्हणाले, देशात ७० टक्के नागरिक हे शेतकरी आहेत, देशभरातील शेतकरी आज संकटात असून महाराष्ट्रात जवळपास तीन हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारकडे कोणतेही धोरण नाही. देशावरील कर्ज हे चारपटीने वाढले, तर दुसरीकडे कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योगपतींचे १० लाख कोटी सरकारने माफ केले. देशातील गरिबीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून देशात धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. लव्ह जिहादच्या नावावर हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. देशातील न्यायालयाचे निर्णयदेखील भावनिक आणि आस्थेच्या नावावर दिले जात असतील, तर या देशातील अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमांना कधीच न्याय मिळणार नाही. त्यामुळे आम्ही द्वेषाच्या विरोधात हिंदू-मुस्लिम एकतेसाठी लढा देत आहोत आणि आगामी लोकसभा निवडणुकीतही आम्ही धर्मनिरपेक्ष उमेदवारांसोबत राहणार असल्याचे अबू आझमी म्हणाले. यावेळी त्यांनी कॉँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत कॉँग्रेसवरही निशाणा साधला. कॉँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या होत होत्या. आज ते मुस्लिम आरक्षण देण्याची गोष्ट करतात. परंतु जेव्हा ते सत्तेत होते तर त्यांनी मुस्लिम आरक्षण का दिले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जरी इंडिया आघाडीमध्ये समाजवादी पक्ष असला तरी महाराष्ट्रात स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नेत्यांनी दिल्याचेही अबू आझमी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Amravatiअमरावती