शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

आम्ही किती खाल्ल्या पाली ?

By admin | Updated: September 29, 2016 00:07 IST

मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात निघालेली पाल, त्यानंतर एफडीएने निर्मिती कारखान्याची केलेली तपासणी यातून मनभरी कारखान्यात पालींचा सतत वावर असल्याचे उघड झाले आहे.

केवळ व्यवसाय : ग्राहक हक्क का विसरलो?अमरावती : मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात निघालेली पाल, त्यानंतर एफडीएने निर्मिती कारखान्याची केलेली तपासणी यातून मनभरी कारखान्यात पालींचा सतत वावर असल्याचे उघड झाले आहे. पालींच्या सहवासात तयार होणाऱ्या या उत्पादनातून मनभरीने ग्राहकांना आतापर्यंत किती पाली खाऊ घातल्यात, असा गंभीर सवाल निर्माण होतो. सिलबंद खाद्यपदार्थांचे उत्पादन होत असणाऱ्या कारखान्यात अन्न व औषधी प्रशासनाचे काटेकोर नियम पाळले जाणे आवश्यक आहे. एक माशीदेखील अन्न निर्माण होणाऱ्या कक्षात पोहोचू नये, असा नियम आहे. तथापि मनभरी उत्पादने तयार होतात तेथे विषबाधा होऊ शकणाऱ्या पालींचा सातत्याने वावर होता. पालींंना ये-जा करण्यासाठी तेथे मार्ग उपलब्ध होता. पालींच्या सानिध्यात अन्ननिर्मितीचे कार्य सुरू ठेवताना मनभरीच्या मालकाला जराही दखल घ्यावीशी वाटली नाही. लोक जे अन्न विश्वासाने सेवन करतात, त्या अन्नात लोकांच्या विश्वासाचा घात करून पालीसारखे विषारी प्राणी तळून मिसळले जाईपर्यंतचे अक्षम्य दुर्लक्ष उत्पादकांकडून केले जाते, याचा अर्थ काय लावायचा? हे अन्न इतरांसांठी असल्याने, केवळ उत्पन्न म्हणूनच या उत्पादनाकडे बघितले गेले, हे तेथील गैरव्यवस्थेतून लक्षात येते. वाचविता येतील तितके पैसे वाचवायचे, हा तद्दन व्यापारी उद्देश यामागे दिसतो. मनभरीची उत्पादने लोक खातात. घरातील लहानग्यांना देतात. ही उत्पादने जे तयार करतात, ती मंडळी त्यांच्या मुलाबाळांना हे अन्न खाऊ घालतात काय? ती पाल कुण्या लहान मुलाच्या चिवड्याच्या आली असती तर त्याने ती चिवड्यातील आगळा प्रकार समजून खाल्लीही असती. हा चिवडा निर्माण करणाऱ्या मंडळींच्या कुटुंबातील महिलांच्या, लहान मुलांच्या वाट्याला ही पाल येण्याची शक्यताच नसावी, म्हणूनच तर ती चिवड्यात पॅक केली गेली! आम्ही काय तयार करतो, याची जाण या मंडळींना असल्याशिवाय का इतके भयंकर गुन्हेगारी कृत्य घडते. 'अन्न परब्रह्म' असे आमच्या संस्कृतित सांगितले आहे. अत्यंत पे्रमाने आणि तितक्याच काळजीने बनविलेल्या आईच्या हातचा चिवडा खाणारे वऱ्हाड-विदर्भातील आणि महाराष्ट्रातील लोक आता सिलबंद चिवडा खाऊ लागले आहेत. उपवासालाही सिलबंद चिवडा बोलविला जातो. मनभरीचे उत्पादन अमरावतीचे असल्यामुळे येथील लोकांनी त्यावर माया दाखविली होती; परंतु या उत्पादनाला ती माया जपता आली नाही. 'धंदा' करू लागलेले हे उत्पादन चक्क पाली खाऊ घालू लागले. एक पाल दिसली. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला; परंतु दाबता आले नाही म्हणून ते उघड झाले. उघड न होऊ शकलेली अनेक प्रकरणे रफादफा झाली नसतील हे कशावरून? पालीची तळलेली लहानगी पिले अनेकांच्या पोटात गेली नसतील, तळून चुरा झालेल्या पाली आणि किटकही अनेकांनी पचविले नसतील याचा काय भरवसा? हे घडू शकते कारण एकच- आम्ही ग्राहक हक्क गुंडाळून ठेवला म्हणून! जे विकले जाते, ते मुकाट्याने खातो म्हणून!