शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आम्ही किती खाल्ल्या पाली ?

By admin | Updated: September 29, 2016 00:07 IST

मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात निघालेली पाल, त्यानंतर एफडीएने निर्मिती कारखान्याची केलेली तपासणी यातून मनभरी कारखान्यात पालींचा सतत वावर असल्याचे उघड झाले आहे.

केवळ व्यवसाय : ग्राहक हक्क का विसरलो?अमरावती : मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात निघालेली पाल, त्यानंतर एफडीएने निर्मिती कारखान्याची केलेली तपासणी यातून मनभरी कारखान्यात पालींचा सतत वावर असल्याचे उघड झाले आहे. पालींच्या सहवासात तयार होणाऱ्या या उत्पादनातून मनभरीने ग्राहकांना आतापर्यंत किती पाली खाऊ घातल्यात, असा गंभीर सवाल निर्माण होतो. सिलबंद खाद्यपदार्थांचे उत्पादन होत असणाऱ्या कारखान्यात अन्न व औषधी प्रशासनाचे काटेकोर नियम पाळले जाणे आवश्यक आहे. एक माशीदेखील अन्न निर्माण होणाऱ्या कक्षात पोहोचू नये, असा नियम आहे. तथापि मनभरी उत्पादने तयार होतात तेथे विषबाधा होऊ शकणाऱ्या पालींचा सातत्याने वावर होता. पालींंना ये-जा करण्यासाठी तेथे मार्ग उपलब्ध होता. पालींच्या सानिध्यात अन्ननिर्मितीचे कार्य सुरू ठेवताना मनभरीच्या मालकाला जराही दखल घ्यावीशी वाटली नाही. लोक जे अन्न विश्वासाने सेवन करतात, त्या अन्नात लोकांच्या विश्वासाचा घात करून पालीसारखे विषारी प्राणी तळून मिसळले जाईपर्यंतचे अक्षम्य दुर्लक्ष उत्पादकांकडून केले जाते, याचा अर्थ काय लावायचा? हे अन्न इतरांसांठी असल्याने, केवळ उत्पन्न म्हणूनच या उत्पादनाकडे बघितले गेले, हे तेथील गैरव्यवस्थेतून लक्षात येते. वाचविता येतील तितके पैसे वाचवायचे, हा तद्दन व्यापारी उद्देश यामागे दिसतो. मनभरीची उत्पादने लोक खातात. घरातील लहानग्यांना देतात. ही उत्पादने जे तयार करतात, ती मंडळी त्यांच्या मुलाबाळांना हे अन्न खाऊ घालतात काय? ती पाल कुण्या लहान मुलाच्या चिवड्याच्या आली असती तर त्याने ती चिवड्यातील आगळा प्रकार समजून खाल्लीही असती. हा चिवडा निर्माण करणाऱ्या मंडळींच्या कुटुंबातील महिलांच्या, लहान मुलांच्या वाट्याला ही पाल येण्याची शक्यताच नसावी, म्हणूनच तर ती चिवड्यात पॅक केली गेली! आम्ही काय तयार करतो, याची जाण या मंडळींना असल्याशिवाय का इतके भयंकर गुन्हेगारी कृत्य घडते. 'अन्न परब्रह्म' असे आमच्या संस्कृतित सांगितले आहे. अत्यंत पे्रमाने आणि तितक्याच काळजीने बनविलेल्या आईच्या हातचा चिवडा खाणारे वऱ्हाड-विदर्भातील आणि महाराष्ट्रातील लोक आता सिलबंद चिवडा खाऊ लागले आहेत. उपवासालाही सिलबंद चिवडा बोलविला जातो. मनभरीचे उत्पादन अमरावतीचे असल्यामुळे येथील लोकांनी त्यावर माया दाखविली होती; परंतु या उत्पादनाला ती माया जपता आली नाही. 'धंदा' करू लागलेले हे उत्पादन चक्क पाली खाऊ घालू लागले. एक पाल दिसली. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला; परंतु दाबता आले नाही म्हणून ते उघड झाले. उघड न होऊ शकलेली अनेक प्रकरणे रफादफा झाली नसतील हे कशावरून? पालीची तळलेली लहानगी पिले अनेकांच्या पोटात गेली नसतील, तळून चुरा झालेल्या पाली आणि किटकही अनेकांनी पचविले नसतील याचा काय भरवसा? हे घडू शकते कारण एकच- आम्ही ग्राहक हक्क गुंडाळून ठेवला म्हणून! जे विकले जाते, ते मुकाट्याने खातो म्हणून!