शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही किती खाल्ल्या पाली ?

By admin | Updated: September 29, 2016 00:07 IST

मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात निघालेली पाल, त्यानंतर एफडीएने निर्मिती कारखान्याची केलेली तपासणी यातून मनभरी कारखान्यात पालींचा सतत वावर असल्याचे उघड झाले आहे.

केवळ व्यवसाय : ग्राहक हक्क का विसरलो?अमरावती : मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात निघालेली पाल, त्यानंतर एफडीएने निर्मिती कारखान्याची केलेली तपासणी यातून मनभरी कारखान्यात पालींचा सतत वावर असल्याचे उघड झाले आहे. पालींच्या सहवासात तयार होणाऱ्या या उत्पादनातून मनभरीने ग्राहकांना आतापर्यंत किती पाली खाऊ घातल्यात, असा गंभीर सवाल निर्माण होतो. सिलबंद खाद्यपदार्थांचे उत्पादन होत असणाऱ्या कारखान्यात अन्न व औषधी प्रशासनाचे काटेकोर नियम पाळले जाणे आवश्यक आहे. एक माशीदेखील अन्न निर्माण होणाऱ्या कक्षात पोहोचू नये, असा नियम आहे. तथापि मनभरी उत्पादने तयार होतात तेथे विषबाधा होऊ शकणाऱ्या पालींचा सातत्याने वावर होता. पालींंना ये-जा करण्यासाठी तेथे मार्ग उपलब्ध होता. पालींच्या सानिध्यात अन्ननिर्मितीचे कार्य सुरू ठेवताना मनभरीच्या मालकाला जराही दखल घ्यावीशी वाटली नाही. लोक जे अन्न विश्वासाने सेवन करतात, त्या अन्नात लोकांच्या विश्वासाचा घात करून पालीसारखे विषारी प्राणी तळून मिसळले जाईपर्यंतचे अक्षम्य दुर्लक्ष उत्पादकांकडून केले जाते, याचा अर्थ काय लावायचा? हे अन्न इतरांसांठी असल्याने, केवळ उत्पन्न म्हणूनच या उत्पादनाकडे बघितले गेले, हे तेथील गैरव्यवस्थेतून लक्षात येते. वाचविता येतील तितके पैसे वाचवायचे, हा तद्दन व्यापारी उद्देश यामागे दिसतो. मनभरीची उत्पादने लोक खातात. घरातील लहानग्यांना देतात. ही उत्पादने जे तयार करतात, ती मंडळी त्यांच्या मुलाबाळांना हे अन्न खाऊ घालतात काय? ती पाल कुण्या लहान मुलाच्या चिवड्याच्या आली असती तर त्याने ती चिवड्यातील आगळा प्रकार समजून खाल्लीही असती. हा चिवडा निर्माण करणाऱ्या मंडळींच्या कुटुंबातील महिलांच्या, लहान मुलांच्या वाट्याला ही पाल येण्याची शक्यताच नसावी, म्हणूनच तर ती चिवड्यात पॅक केली गेली! आम्ही काय तयार करतो, याची जाण या मंडळींना असल्याशिवाय का इतके भयंकर गुन्हेगारी कृत्य घडते. 'अन्न परब्रह्म' असे आमच्या संस्कृतित सांगितले आहे. अत्यंत पे्रमाने आणि तितक्याच काळजीने बनविलेल्या आईच्या हातचा चिवडा खाणारे वऱ्हाड-विदर्भातील आणि महाराष्ट्रातील लोक आता सिलबंद चिवडा खाऊ लागले आहेत. उपवासालाही सिलबंद चिवडा बोलविला जातो. मनभरीचे उत्पादन अमरावतीचे असल्यामुळे येथील लोकांनी त्यावर माया दाखविली होती; परंतु या उत्पादनाला ती माया जपता आली नाही. 'धंदा' करू लागलेले हे उत्पादन चक्क पाली खाऊ घालू लागले. एक पाल दिसली. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला; परंतु दाबता आले नाही म्हणून ते उघड झाले. उघड न होऊ शकलेली अनेक प्रकरणे रफादफा झाली नसतील हे कशावरून? पालीची तळलेली लहानगी पिले अनेकांच्या पोटात गेली नसतील, तळून चुरा झालेल्या पाली आणि किटकही अनेकांनी पचविले नसतील याचा काय भरवसा? हे घडू शकते कारण एकच- आम्ही ग्राहक हक्क गुंडाळून ठेवला म्हणून! जे विकले जाते, ते मुकाट्याने खातो म्हणून!