शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

विदर्भाच्या कॅलिफोर्नियात संत्राबागा सुकण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:32 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध झालेल्या वरूड तालुक्यात तीव्र पाणीटंचाईने संत्रा उत्पादकांना त्रस्त केले आहे. त्याच्या जोडीला असलेल्या वाढत्या तापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. २०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे भाडे मोजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने सुकलेल्या संत्राबागांकडे हताशपणे पाहण्याची घेण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्दे२०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे पाणी : वाढत्या तापमानात आंबिया बहराला गळती

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध झालेल्या वरूड तालुक्यात तीव्र पाणीटंचाईने संत्रा उत्पादकांना त्रस्त केले आहे. त्याच्या जोडीला असलेल्या वाढत्या तापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. २०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे भाडे मोजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने सुकलेल्या संत्राबागांकडे हताशपणे पाहण्याची घेण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.वरुड तालुक्यात संत्राबागांचे सर्वाधिक क्षेत्र २० हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी पावसाळ्यातील कमी पावसाने संत्र्याच्या आंबिया बहराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाईने तोंड वर काढले. विहिरी आटण्यास सुरुवात झाली, तर बोअर बंद पडले. सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ १० ते १५ टक्केच जलसाठा आहे. यामुळे पाणी वापर संस्थांना पाणी देणे बंद झाले आहे. अतितापमान आणि खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्रा वाचविणे शेतकºयांना कठीण झाले आहे. याकरिता २०० ते ४०० रुपये प्रतितास दराने आवक असलेल्या ठिकाणावरून पाणी घेऊन रात्री-अपरात्री ओलीत करून संत्रा जिवंत ठेवावा लागत आहे. यामुळे पुन्हा तालुक्यावर जलसंकट उभे ठाकले आहे.प्रकल्पांतील जलसाठा होतोय कमीवरूड तालुक्यात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग, लघु-मध्यम सिंचन प्रकल्पांची संख्या अधिक आहे. बागायती पिके आणि संत्र्याचे क्षेत्रसुद्धा मोठे आहे. तालुक्यातील नऊ सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ १० ते ३० टक्क््यांपर्यंत जलसाठा आहे. मार्चपासूनच भूजल पातळी खालावत असल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.संत्राबागा वाचविण्याची धडपडपाणीटंचाईमुळे संत्रा उत्पादकांना संत्राबागा वाचविण्याची चिंता लागली असून, २०० ते ४०० रुपये प्र्रतितास दराने पाणी विकत घेऊन ओलीत करावे लागते. हजारो हेक्टरमधील संत्राबागा सुकण्याच्या मार्गावर असताना आंबिया बहरालासुद्धा ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे गळती लागली आहे.विहिरीतून केवळ एक ते दोन तास पाणी मिळते, तर काहीवेळा तेसुद्धा मिळत नाही. यामुळे संत्राबागांच्या ओलिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. हे पीक हातचे गेल्यास पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होतील. शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- विजय श्रीराव,संत्रा उत्पादक, पुसला