शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या कॅलिफोर्नियात संत्राबागा सुकण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:32 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध झालेल्या वरूड तालुक्यात तीव्र पाणीटंचाईने संत्रा उत्पादकांना त्रस्त केले आहे. त्याच्या जोडीला असलेल्या वाढत्या तापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. २०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे भाडे मोजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने सुकलेल्या संत्राबागांकडे हताशपणे पाहण्याची घेण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्दे२०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे पाणी : वाढत्या तापमानात आंबिया बहराला गळती

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध झालेल्या वरूड तालुक्यात तीव्र पाणीटंचाईने संत्रा उत्पादकांना त्रस्त केले आहे. त्याच्या जोडीला असलेल्या वाढत्या तापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. २०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे भाडे मोजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने सुकलेल्या संत्राबागांकडे हताशपणे पाहण्याची घेण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.वरुड तालुक्यात संत्राबागांचे सर्वाधिक क्षेत्र २० हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी पावसाळ्यातील कमी पावसाने संत्र्याच्या आंबिया बहराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाईने तोंड वर काढले. विहिरी आटण्यास सुरुवात झाली, तर बोअर बंद पडले. सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ १० ते १५ टक्केच जलसाठा आहे. यामुळे पाणी वापर संस्थांना पाणी देणे बंद झाले आहे. अतितापमान आणि खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्रा वाचविणे शेतकºयांना कठीण झाले आहे. याकरिता २०० ते ४०० रुपये प्रतितास दराने आवक असलेल्या ठिकाणावरून पाणी घेऊन रात्री-अपरात्री ओलीत करून संत्रा जिवंत ठेवावा लागत आहे. यामुळे पुन्हा तालुक्यावर जलसंकट उभे ठाकले आहे.प्रकल्पांतील जलसाठा होतोय कमीवरूड तालुक्यात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग, लघु-मध्यम सिंचन प्रकल्पांची संख्या अधिक आहे. बागायती पिके आणि संत्र्याचे क्षेत्रसुद्धा मोठे आहे. तालुक्यातील नऊ सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ १० ते ३० टक्क््यांपर्यंत जलसाठा आहे. मार्चपासूनच भूजल पातळी खालावत असल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.संत्राबागा वाचविण्याची धडपडपाणीटंचाईमुळे संत्रा उत्पादकांना संत्राबागा वाचविण्याची चिंता लागली असून, २०० ते ४०० रुपये प्र्रतितास दराने पाणी विकत घेऊन ओलीत करावे लागते. हजारो हेक्टरमधील संत्राबागा सुकण्याच्या मार्गावर असताना आंबिया बहरालासुद्धा ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे गळती लागली आहे.विहिरीतून केवळ एक ते दोन तास पाणी मिळते, तर काहीवेळा तेसुद्धा मिळत नाही. यामुळे संत्राबागांच्या ओलिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. हे पीक हातचे गेल्यास पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होतील. शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- विजय श्रीराव,संत्रा उत्पादक, पुसला