शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी भरणे हेच एकमेव काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:32 IST

तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावातील महिलाच नव्हे, तर कर्ती पुरुष मंडळींकडेही फक्त पाण्याची तजवीज करणे, हे प्रमुख व एकमेव काम राहिले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देगावात पाण्यासाठी वणवण : शिवारात संत्राबागा आॅक्सिजनवर; नागरिकांची वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावातील महिलाच नव्हे, तर कर्ती पुरुष मंडळींकडेही फक्त पाण्याची तजवीज करणे, हे प्रमुख व एकमेव काम राहिले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बागायतदारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाची पाणीटंचाईमुळे रया गेली आहे.तालुक्यातील सधन गाव म्हणून आमलाची ओळख आहे. १०० टक्के शेती संत्र्याची. प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून नावलौकिक. परंतु, सध्या या गावात पिण्याचे पाणीसुद्धा विकत घ्यावे लागत आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीलाच या गावात ग्रामपंचायतीतर्फे पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. ते टँकर आता अपुरे पडत असल्यामुळे लोकांना ३० ते ४० रुपये मोजून ड्रमभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीने गावात दोन कूपनलिका व चार हँडपम्प बसविले. मात्र, त्यास मर्यादा आल्या आहेत. गावाला भिवापूर तलाव व जळका धरणाच्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. परंतु, जानेवारी महिन्यातच हे स्रोत आटल्याने पाणीप्रश्न भीषण झाला आहे.गावाची लोकसंख्या पाहता, ९० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात ६० ते ८० हजार लिटर पाणी मिळत आहे. शासनांकडून अतिरिक्त टँकरची मागणी प्रशासनाकडे केली आहे. यंदाची पाणीटंचाई भीषण आहे.- रजनी मालखेडेसरपंच, आमला विश्वेश्वरसंत्राबागांना टँकरने पाणीपेयजलाचे संकट तीव्र असताना शिवारातील संत्राबागांचे हाल काही वेगळे नाहीत. शेकडो हेक्टरवरील संत्राबागा शेवटच्या घटका मोजत आहेत. दोन ते तीन हजार रुपये प्रतिटँकर दराने पाणी विकत घेऊन संत्राबागा जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र, देऊन देऊन किती दिवस टँकरने पाणी द्यायचे, यालाही मर्यादा आहेत. यामुळे भविष्याच्या विचाराने संत्राउत्पादक हवालदिल झाले आहेत.पाथरगाव उपसा सिंचन प्र्रकल्प केव्हा?आमला विश्वेश्वर व लगतच्या परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे, पाणीटंचाईची समस्या निकाली निघावी, यासाठी पाथरगाव उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र, हा प्रकल्प तूर्तास निविदा प्रक्रियेत अडकला आहे. काम सुरु झाले तरी पुढील चार-पाच वर्षे प्रकल्पाचे लाभ गावकऱ्यांना मिळू शकणार नाहीत. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही. हा प्रकल्प वेळेत झाला असता, तर संत्राबागा व त्यावर आधारलेली शेती शासनाला वाचविता आली असती, असे मत ग्रामस्थ गोपाल बकाले यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई