शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पाणी भरणे हेच एकमेव काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:32 IST

तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावातील महिलाच नव्हे, तर कर्ती पुरुष मंडळींकडेही फक्त पाण्याची तजवीज करणे, हे प्रमुख व एकमेव काम राहिले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देगावात पाण्यासाठी वणवण : शिवारात संत्राबागा आॅक्सिजनवर; नागरिकांची वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावातील महिलाच नव्हे, तर कर्ती पुरुष मंडळींकडेही फक्त पाण्याची तजवीज करणे, हे प्रमुख व एकमेव काम राहिले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बागायतदारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाची पाणीटंचाईमुळे रया गेली आहे.तालुक्यातील सधन गाव म्हणून आमलाची ओळख आहे. १०० टक्के शेती संत्र्याची. प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून नावलौकिक. परंतु, सध्या या गावात पिण्याचे पाणीसुद्धा विकत घ्यावे लागत आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीलाच या गावात ग्रामपंचायतीतर्फे पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. ते टँकर आता अपुरे पडत असल्यामुळे लोकांना ३० ते ४० रुपये मोजून ड्रमभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीने गावात दोन कूपनलिका व चार हँडपम्प बसविले. मात्र, त्यास मर्यादा आल्या आहेत. गावाला भिवापूर तलाव व जळका धरणाच्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. परंतु, जानेवारी महिन्यातच हे स्रोत आटल्याने पाणीप्रश्न भीषण झाला आहे.गावाची लोकसंख्या पाहता, ९० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात ६० ते ८० हजार लिटर पाणी मिळत आहे. शासनांकडून अतिरिक्त टँकरची मागणी प्रशासनाकडे केली आहे. यंदाची पाणीटंचाई भीषण आहे.- रजनी मालखेडेसरपंच, आमला विश्वेश्वरसंत्राबागांना टँकरने पाणीपेयजलाचे संकट तीव्र असताना शिवारातील संत्राबागांचे हाल काही वेगळे नाहीत. शेकडो हेक्टरवरील संत्राबागा शेवटच्या घटका मोजत आहेत. दोन ते तीन हजार रुपये प्रतिटँकर दराने पाणी विकत घेऊन संत्राबागा जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र, देऊन देऊन किती दिवस टँकरने पाणी द्यायचे, यालाही मर्यादा आहेत. यामुळे भविष्याच्या विचाराने संत्राउत्पादक हवालदिल झाले आहेत.पाथरगाव उपसा सिंचन प्र्रकल्प केव्हा?आमला विश्वेश्वर व लगतच्या परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे, पाणीटंचाईची समस्या निकाली निघावी, यासाठी पाथरगाव उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र, हा प्रकल्प तूर्तास निविदा प्रक्रियेत अडकला आहे. काम सुरु झाले तरी पुढील चार-पाच वर्षे प्रकल्पाचे लाभ गावकऱ्यांना मिळू शकणार नाहीत. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही. हा प्रकल्प वेळेत झाला असता, तर संत्राबागा व त्यावर आधारलेली शेती शासनाला वाचविता आली असती, असे मत ग्रामस्थ गोपाल बकाले यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई