शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

पाणी भरणे हेच एकमेव काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:32 IST

तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावातील महिलाच नव्हे, तर कर्ती पुरुष मंडळींकडेही फक्त पाण्याची तजवीज करणे, हे प्रमुख व एकमेव काम राहिले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देगावात पाण्यासाठी वणवण : शिवारात संत्राबागा आॅक्सिजनवर; नागरिकांची वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावातील महिलाच नव्हे, तर कर्ती पुरुष मंडळींकडेही फक्त पाण्याची तजवीज करणे, हे प्रमुख व एकमेव काम राहिले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बागायतदारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाची पाणीटंचाईमुळे रया गेली आहे.तालुक्यातील सधन गाव म्हणून आमलाची ओळख आहे. १०० टक्के शेती संत्र्याची. प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून नावलौकिक. परंतु, सध्या या गावात पिण्याचे पाणीसुद्धा विकत घ्यावे लागत आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीलाच या गावात ग्रामपंचायतीतर्फे पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. ते टँकर आता अपुरे पडत असल्यामुळे लोकांना ३० ते ४० रुपये मोजून ड्रमभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीने गावात दोन कूपनलिका व चार हँडपम्प बसविले. मात्र, त्यास मर्यादा आल्या आहेत. गावाला भिवापूर तलाव व जळका धरणाच्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. परंतु, जानेवारी महिन्यातच हे स्रोत आटल्याने पाणीप्रश्न भीषण झाला आहे.गावाची लोकसंख्या पाहता, ९० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात ६० ते ८० हजार लिटर पाणी मिळत आहे. शासनांकडून अतिरिक्त टँकरची मागणी प्रशासनाकडे केली आहे. यंदाची पाणीटंचाई भीषण आहे.- रजनी मालखेडेसरपंच, आमला विश्वेश्वरसंत्राबागांना टँकरने पाणीपेयजलाचे संकट तीव्र असताना शिवारातील संत्राबागांचे हाल काही वेगळे नाहीत. शेकडो हेक्टरवरील संत्राबागा शेवटच्या घटका मोजत आहेत. दोन ते तीन हजार रुपये प्रतिटँकर दराने पाणी विकत घेऊन संत्राबागा जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र, देऊन देऊन किती दिवस टँकरने पाणी द्यायचे, यालाही मर्यादा आहेत. यामुळे भविष्याच्या विचाराने संत्राउत्पादक हवालदिल झाले आहेत.पाथरगाव उपसा सिंचन प्र्रकल्प केव्हा?आमला विश्वेश्वर व लगतच्या परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे, पाणीटंचाईची समस्या निकाली निघावी, यासाठी पाथरगाव उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र, हा प्रकल्प तूर्तास निविदा प्रक्रियेत अडकला आहे. काम सुरु झाले तरी पुढील चार-पाच वर्षे प्रकल्पाचे लाभ गावकऱ्यांना मिळू शकणार नाहीत. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही. हा प्रकल्प वेळेत झाला असता, तर संत्राबागा व त्यावर आधारलेली शेती शासनाला वाचविता आली असती, असे मत ग्रामस्थ गोपाल बकाले यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई