शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

रोपवाटिकेत पाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:46 IST

मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी वनविभागाने नजीकच्या तलावातून पाण्याची चक्क चोरी चालविली आहे.

ठळक मुद्देपाझर तलावात इंजीन लावले : मोर्शी रोहयो परिक्षेत्राचा अफलातून कारभार

आॅनलाईन लोकमतअमरावती : मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी वनविभागाने नजीकच्या तलावातून पाण्याची चक्क चोरी चालविली आहे. दरदिवशी तलावातून हजारो लिटर पाणी रोपवाटिकेमध्ये रिते केले जात आहे.मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड तलावाला लागून रोजगार हमी योजनेमधून रोपवाटिका तयार करण्यात आली. रोपवाटिका तयार करण्यापूर्वी वनविभागाने त्या ठिकाणी नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी बोअर किंवा विहीर तयार करणे गरजेचे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून रोपवाटिकेतील रोपांना वाचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाझर तलावानजीक इंजिन बसवून लोखंडी पाइपने पाणी आणून रोपवाटिकेतील टाक्यांमध्ये गोळा केले जाते आणि ते रोपांना देण्यात येत आहे.दिवाणखेड गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी, याकरिता वनक्षेत्रावर या पाझर तलावाची उभारणी करण्यात आली. मात्र, रोहयो रोपवाटिकेत कार्यरत असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी कसलीही परवानगी न घेता पाणी चोरी करून रोपटे जगविण्याची शक्कल लढविली आहे.रोपे जगविण्यासाठी पाणी आवश्यक असल्यास नियमानुसार जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडून परवानगी घेऊनच तलावातून पाण्याची उचल करणे अपेक्षित आहे. शासकीय विभाग नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी तत्पर असतात. अशा स्थितीत संबंधित वनाधिकाºयांनी हा प्रकार कशासाठी करावा, हा प्रश्न उपस्थित होत आहे.सिंचन विभाग अनभिज्ञदिवाणखेड येथील पाझर तलाव जि.प.च्या अखत्यारीत येतो. या तलावातून पाण्याची चोरी होत असताना सिंचन विभाग अनभिज्ञ आहे. रोपवाटिकेतील रोपांना व इतर कामांसाठी पाण्याची गरज असताना संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी रीतसर परवानगी घेऊन तलावातील पाण्याची उचल करणे आवश्यक आहे. रोपवाटिकेत दरदिवशी हजारो लिटर रिते केले जात असल्याचे वास्तव आहे.वनविभाग सिंचन तलावातून पाणी घेत असल्याबाबत परवानगी घेतली अथवा नाही. याबाबत तपासले जाईल. यात काही गैर असल्यास नियमानुसार कारवाई करू.- प्रमोद तलवारे,जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद