शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

अमरावती विभागात २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: May 15, 2014 02:17 IST

वार्षिक सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, अवकाळी पावसाने लावलेली संततधार. यामुळे अमरावती विभागातील जलसाठय़ाची स्थिती भर उन्हाळ्यात समाधानकारक आहे

१६ गावांचा समावेश : मागील वर्षी पाणीपुरवठय़ासाठी २0१ टॅंकरचा वापरअमरावती : वार्षिक सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, अवकाळी पावसाने लावलेली संततधार. यामुळे अमरावती विभागातील जलसाठय़ाची स्थिती भर उन्हाळ्यात समाधानकारक आहे. मोठय़ा प्रमाणावर झालेला पाऊस त्यासोबतच प्रशासनाचे पाणीटंचाई निवारणासाठी झालेले कोटेकोर प्रयत्न यामुळे विभागात सध्या २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी याच महिन्यात तब्बल २0१ टँकरचा उपयोग पाणी पुरवठय़ासाठी करावा लागला. मात्र त्यातुलनेत यावर्षी पाणी टंचाईची स्थिती विभागात सुसह्य आहे.गतवर्षी अवर्षणाच्या छायेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १४८ गावांमध्ये पाणीटंचाई होती. या गावांची तहान भागविण्यासाठी १९३ टँकर प्रशासनाला लावावे लागले. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात केवळ ४ गावे पाणीटंचाई सदृश आहेत. या चार गावांच्या पाणीपुरवठय़ासाठी प्रशासनाने १0 टँकर लावले आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी अमरावती जिल्ह्यातील ११ गावांना पाणीटंचाईची झळ बसली. यावर्षी अमरावती जिल्ह्यात ८ गावे पाणीटंचाईसदृश आहेत. येथे पाणीपुरवठय़ासाठी प्रशासनाकडून ८ टँकर लावण्यात आले आहेत.२0१३ मध्ये १७९ गावे विभागात पाणीटंचाईच्या विळख्यात होती. मात्र यावर्षी फार कमी गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. गतवर्षी अकोला जिल्ह्यात ४, वाशिममध्ये ९ आणि यवतमाळ जिल्ह्यात ७ गावांना पाणीटंचाईचा फटका बसला. यावर्षी अकोला व वाशीम जिल्ह्यात एकही गाव पाणीटंचाईने ग्रस्त नाही.भूजल पातळीत झालेल्या कमालीच्या सुधारणेचा हा परिणाम आहे. यवतमाळ जिल्ह्यात ४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती आहे. याठिकाणी ४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. अवकाळी पाऊस, खरिपात सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, तसेच अनुभवलेला गारपिटीचा तडाखा या सर्वांचा परिपाक म्हणजे भूजल पातळीत झालेली समाधानकारक वाढ २0१४ चा उन्हाळा सुसह्य करीत आहे. (प्रतिनिधी)