शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा करणारे टँकर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:53 IST

एक महिन्यापासून चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना अधिग्रहित केलेल्या विहिरींतून आदिवासींपर्यंत पाणीपुरवठा करणारे टँकरच निवडणुकीसह इतर तालुक्यांतील कामांसाठी पळविले. परिणामी मेळघाटात एकही टँँकर सुरू झाला नसल्याचे वास्तव आहे. पाण्यासाठी वणवण सुरू असताना प्रशासनाकडून प्रस्ताव मंजुरीचा खेळ होत असल्याचा संताप आदिवासींमध्ये आहे.

ठळक मुद्देशासन झोपेत : दीड महिन्यांपासून आदिवासींची पाण्यासाठी भटकंती

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : एक महिन्यापासून चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना अधिग्रहित केलेल्या विहिरींतून आदिवासींपर्यंत पाणीपुरवठा करणारे टँकरच निवडणुकीसह इतर तालुक्यांतील कामांसाठी पळविले. परिणामी मेळघाटात एकही टँँकर सुरू झाला नसल्याचे वास्तव आहे. पाण्यासाठी वणवण सुरू असताना प्रशासनाकडून प्रस्ताव मंजुरीचा खेळ होत असल्याचा संताप आदिवासींमध्ये आहे.उन्हाळा लागताच चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांंना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नऊ गावात टँकरने पुरवठा करण्याचे प्रस्ताव धारणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले होते. त्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली. परंतु, टँकरच नसल्याने आदिवासींपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचलेले नाही.आदिवासी तहानलेलेचचिखलदरा तालुक्यात पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदचे चार, अचलपूर व दयार्पूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रत्येकी दोन असे आठ टँकर प्रस्तावित करण्यात आले होते. त्यातील एक टँकर चांदूर रेल्वे येथे पाठविण्यात आला. दुसरा टँकर अंजनगाव तालुक्यातील चिंचोना येथे पाठविण्यात आला आहे. दोन टँकर निवडणूक कामानिमित्त ठेवण्यात आले असून, जिल्हा परिषदेचे टँकर नेमके कोठे गेले, याची अजूनपर्यंत माहिती मिळालेली नाही.जिल्हा प्रशासन केवळ पाणीटंचाईच्या बैठका कागदावरच घेऊन वेळ मारून नेत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे पहाटे ४ वाजतापासून आदिवासींची दऱ्याखोºयातून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.१७ गावात भीषण टंचाईतालुक्यातील पिपादरी, सोमवारखेडा, धरमडोह, बहाद्दरपूर, भिलखेडा, सोनापूर, कोयलारी, पाचडोंगरी आणि मनभंग या नऊ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात टँकरने तात्काळ पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावास धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दिली. मलकापूर, खिरपाणी, कोरडा, कालापांढरी, हतरू, घाणा, खंडुखेडा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी काही गावांतील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. परंतु, टँकरच नसल्याने आदिवासींची पायपीट सुरू आहे. दुसरीकडे हातपंप नादुरुस्त व पाण्याची पातळी खोलवर गेल्याने विहिरीसुद्धा कोरड्या पडू लागल्या आहेत.टँकरचे प्रस्ताव मंजूर होऊन आले असले तरी अजूनपर्यंत तालुक्यात एकही टँकर आलेला नाही. यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार सुरू आहे.- नरेंद्र ठाकरे, कनिष्ठ सहायक, पाणीपुरवठा विभागपं. स. चिखलदरानिवडणूक महत्त्वाचीच, मात्र आदिवासींचा जीवसुद्धा मोलाचा आहे. मेळघाटवासी महिनाभारापासून पाणीटंचाईस सामोरे जात असताना प्रशासनाची लेटलतिफी संतापजनक आहे.- सुनंदा काकडजिल्हा परिषद सदस्य