शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

पाणीपुरवठा करणारे टँकर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:53 IST

एक महिन्यापासून चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना अधिग्रहित केलेल्या विहिरींतून आदिवासींपर्यंत पाणीपुरवठा करणारे टँकरच निवडणुकीसह इतर तालुक्यांतील कामांसाठी पळविले. परिणामी मेळघाटात एकही टँँकर सुरू झाला नसल्याचे वास्तव आहे. पाण्यासाठी वणवण सुरू असताना प्रशासनाकडून प्रस्ताव मंजुरीचा खेळ होत असल्याचा संताप आदिवासींमध्ये आहे.

ठळक मुद्देशासन झोपेत : दीड महिन्यांपासून आदिवासींची पाण्यासाठी भटकंती

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : एक महिन्यापासून चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना अधिग्रहित केलेल्या विहिरींतून आदिवासींपर्यंत पाणीपुरवठा करणारे टँकरच निवडणुकीसह इतर तालुक्यांतील कामांसाठी पळविले. परिणामी मेळघाटात एकही टँँकर सुरू झाला नसल्याचे वास्तव आहे. पाण्यासाठी वणवण सुरू असताना प्रशासनाकडून प्रस्ताव मंजुरीचा खेळ होत असल्याचा संताप आदिवासींमध्ये आहे.उन्हाळा लागताच चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांंना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नऊ गावात टँकरने पुरवठा करण्याचे प्रस्ताव धारणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले होते. त्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली. परंतु, टँकरच नसल्याने आदिवासींपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचलेले नाही.आदिवासी तहानलेलेचचिखलदरा तालुक्यात पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदचे चार, अचलपूर व दयार्पूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रत्येकी दोन असे आठ टँकर प्रस्तावित करण्यात आले होते. त्यातील एक टँकर चांदूर रेल्वे येथे पाठविण्यात आला. दुसरा टँकर अंजनगाव तालुक्यातील चिंचोना येथे पाठविण्यात आला आहे. दोन टँकर निवडणूक कामानिमित्त ठेवण्यात आले असून, जिल्हा परिषदेचे टँकर नेमके कोठे गेले, याची अजूनपर्यंत माहिती मिळालेली नाही.जिल्हा प्रशासन केवळ पाणीटंचाईच्या बैठका कागदावरच घेऊन वेळ मारून नेत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे पहाटे ४ वाजतापासून आदिवासींची दऱ्याखोºयातून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.१७ गावात भीषण टंचाईतालुक्यातील पिपादरी, सोमवारखेडा, धरमडोह, बहाद्दरपूर, भिलखेडा, सोनापूर, कोयलारी, पाचडोंगरी आणि मनभंग या नऊ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात टँकरने तात्काळ पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावास धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दिली. मलकापूर, खिरपाणी, कोरडा, कालापांढरी, हतरू, घाणा, खंडुखेडा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी काही गावांतील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. परंतु, टँकरच नसल्याने आदिवासींची पायपीट सुरू आहे. दुसरीकडे हातपंप नादुरुस्त व पाण्याची पातळी खोलवर गेल्याने विहिरीसुद्धा कोरड्या पडू लागल्या आहेत.टँकरचे प्रस्ताव मंजूर होऊन आले असले तरी अजूनपर्यंत तालुक्यात एकही टँकर आलेला नाही. यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार सुरू आहे.- नरेंद्र ठाकरे, कनिष्ठ सहायक, पाणीपुरवठा विभागपं. स. चिखलदरानिवडणूक महत्त्वाचीच, मात्र आदिवासींचा जीवसुद्धा मोलाचा आहे. मेळघाटवासी महिनाभारापासून पाणीटंचाईस सामोरे जात असताना प्रशासनाची लेटलतिफी संतापजनक आहे.- सुनंदा काकडजिल्हा परिषद सदस्य