शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना अपूर्णच

By admin | Updated: May 29, 2017 00:09 IST

भारत निर्माण योजनेंतर्गत मागील दहा वर्षापूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १२ गावांमध्ये केलेली कामे अपूर्ण असून....

चौकशीचे आदेश : जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत वास्तव उघडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारत निर्माण योजनेंतर्गत मागील दहा वर्षापूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १२ गावांमध्ये केलेली कामे अपूर्ण असून पाणीपुरवठा मात्र सुरळीत असल्याची बाब शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीत उघडकीस आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनेच्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीची सभा २६ मे रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष तथा सभापती नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. सभेत सदस्या अनिता मेश्राम यांनी नांदगाव तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला. भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत काजना, निमसवाडा, टाकळी गिलबा, सिध्दनाथपूर, चाकोरा, अडगांव खुर्द, जळू,नांदुरा खुर्द, हिंगलापूर, टाकळी कानडा, शिकरापूर आणि वाढोणा रामनाथ आदी गावांमध्ये साधारणपणे सन २००८ मध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची कामे करण्यात आली. ही कामे पूर्णत्वास गेली नसली तरी येथे पाणी पुरवठा मात्र सुरळीत आहे, अशी माहिती विभागाचे उपअभियंता साखरकर यांनी दिली. यासर्व अपूर्ण कामांची चौकशी करण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत. नांदगाव तालुक्यातच हा प्रकार नसून संपूर्ण जिल्ह्यातच ही स्थिती आहे. सभेला अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे,सभापती जयंत देशमुख,बळवंत वानखडे,सुशिला कुकडे, समिती सदस्या पुजा हाडोळे, वासंती मंगरोळे,अनिता मेश्राम, पार्वती काठोळे, गौरी देशमुख, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, कार्यकारी अभियंता प्रमोद तलावारे, के.टी. उमाळकर, डेप्युटीसीईओ संजय इंगळे व सिंचन तसेच पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता उपस्थित होते.मेळघाटातील पाणीटंचाईवर खलमेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाई आहे. मात्र याकडे प्रशानाचे दुर्लक्ष असल्याचा मुद्दा सदस्या वासंती मंगरोळे यांनी मांडला. यावेळी त्यांनी मडकी, खोगडा, खटकाली, झिंगापूर, मेनघाट, कुलंगणा, अंबापाटी, तारूबांधा, मोथाखेडा किनबंद आदी दहा गावांत भीषण पाणीटंचाई असताना उपाययोजना मात्र शून्य असल्याचे सांगितले. केवळ पस्ततलाई, मोथाखेडा , तारूबांदा याच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अंजनगांव तालुक्यात जलस्तर खालावला अंजनगांव सुर्जी तालुक्यात बागायती क्षेत्र आहे. मात्र, या भागातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे टाकरखेडा, धनेगांव, बोराळा येथे पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सदस्या पूजा हाडोळे यांनी सभेत केली आहे. या परिसरात जलयुक्त शिवार योजनेतून कोल्हापूरी बंधारे, नाला खोलीकरण,गॅबीवन बंधारे होणे गरजेचे आहे. मात्र, यावर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप पूजा हाडोळे यांनी केला.