शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना अपूर्णच

By admin | Updated: May 29, 2017 00:09 IST

भारत निर्माण योजनेंतर्गत मागील दहा वर्षापूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १२ गावांमध्ये केलेली कामे अपूर्ण असून....

चौकशीचे आदेश : जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत वास्तव उघडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारत निर्माण योजनेंतर्गत मागील दहा वर्षापूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १२ गावांमध्ये केलेली कामे अपूर्ण असून पाणीपुरवठा मात्र सुरळीत असल्याची बाब शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीत उघडकीस आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनेच्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीची सभा २६ मे रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष तथा सभापती नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. सभेत सदस्या अनिता मेश्राम यांनी नांदगाव तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला. भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत काजना, निमसवाडा, टाकळी गिलबा, सिध्दनाथपूर, चाकोरा, अडगांव खुर्द, जळू,नांदुरा खुर्द, हिंगलापूर, टाकळी कानडा, शिकरापूर आणि वाढोणा रामनाथ आदी गावांमध्ये साधारणपणे सन २००८ मध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची कामे करण्यात आली. ही कामे पूर्णत्वास गेली नसली तरी येथे पाणी पुरवठा मात्र सुरळीत आहे, अशी माहिती विभागाचे उपअभियंता साखरकर यांनी दिली. यासर्व अपूर्ण कामांची चौकशी करण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत. नांदगाव तालुक्यातच हा प्रकार नसून संपूर्ण जिल्ह्यातच ही स्थिती आहे. सभेला अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे,सभापती जयंत देशमुख,बळवंत वानखडे,सुशिला कुकडे, समिती सदस्या पुजा हाडोळे, वासंती मंगरोळे,अनिता मेश्राम, पार्वती काठोळे, गौरी देशमुख, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, कार्यकारी अभियंता प्रमोद तलावारे, के.टी. उमाळकर, डेप्युटीसीईओ संजय इंगळे व सिंचन तसेच पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता उपस्थित होते.मेळघाटातील पाणीटंचाईवर खलमेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाई आहे. मात्र याकडे प्रशानाचे दुर्लक्ष असल्याचा मुद्दा सदस्या वासंती मंगरोळे यांनी मांडला. यावेळी त्यांनी मडकी, खोगडा, खटकाली, झिंगापूर, मेनघाट, कुलंगणा, अंबापाटी, तारूबांधा, मोथाखेडा किनबंद आदी दहा गावांत भीषण पाणीटंचाई असताना उपाययोजना मात्र शून्य असल्याचे सांगितले. केवळ पस्ततलाई, मोथाखेडा , तारूबांदा याच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अंजनगांव तालुक्यात जलस्तर खालावला अंजनगांव सुर्जी तालुक्यात बागायती क्षेत्र आहे. मात्र, या भागातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे टाकरखेडा, धनेगांव, बोराळा येथे पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सदस्या पूजा हाडोळे यांनी सभेत केली आहे. या परिसरात जलयुक्त शिवार योजनेतून कोल्हापूरी बंधारे, नाला खोलीकरण,गॅबीवन बंधारे होणे गरजेचे आहे. मात्र, यावर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप पूजा हाडोळे यांनी केला.