शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना अपूर्णच

By admin | Updated: May 29, 2017 00:09 IST

भारत निर्माण योजनेंतर्गत मागील दहा वर्षापूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १२ गावांमध्ये केलेली कामे अपूर्ण असून....

चौकशीचे आदेश : जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत वास्तव उघडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारत निर्माण योजनेंतर्गत मागील दहा वर्षापूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १२ गावांमध्ये केलेली कामे अपूर्ण असून पाणीपुरवठा मात्र सुरळीत असल्याची बाब शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीत उघडकीस आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनेच्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीची सभा २६ मे रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष तथा सभापती नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. सभेत सदस्या अनिता मेश्राम यांनी नांदगाव तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला. भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत काजना, निमसवाडा, टाकळी गिलबा, सिध्दनाथपूर, चाकोरा, अडगांव खुर्द, जळू,नांदुरा खुर्द, हिंगलापूर, टाकळी कानडा, शिकरापूर आणि वाढोणा रामनाथ आदी गावांमध्ये साधारणपणे सन २००८ मध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची कामे करण्यात आली. ही कामे पूर्णत्वास गेली नसली तरी येथे पाणी पुरवठा मात्र सुरळीत आहे, अशी माहिती विभागाचे उपअभियंता साखरकर यांनी दिली. यासर्व अपूर्ण कामांची चौकशी करण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत. नांदगाव तालुक्यातच हा प्रकार नसून संपूर्ण जिल्ह्यातच ही स्थिती आहे. सभेला अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे,सभापती जयंत देशमुख,बळवंत वानखडे,सुशिला कुकडे, समिती सदस्या पुजा हाडोळे, वासंती मंगरोळे,अनिता मेश्राम, पार्वती काठोळे, गौरी देशमुख, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, कार्यकारी अभियंता प्रमोद तलावारे, के.टी. उमाळकर, डेप्युटीसीईओ संजय इंगळे व सिंचन तसेच पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता उपस्थित होते.मेळघाटातील पाणीटंचाईवर खलमेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाई आहे. मात्र याकडे प्रशानाचे दुर्लक्ष असल्याचा मुद्दा सदस्या वासंती मंगरोळे यांनी मांडला. यावेळी त्यांनी मडकी, खोगडा, खटकाली, झिंगापूर, मेनघाट, कुलंगणा, अंबापाटी, तारूबांधा, मोथाखेडा किनबंद आदी दहा गावांत भीषण पाणीटंचाई असताना उपाययोजना मात्र शून्य असल्याचे सांगितले. केवळ पस्ततलाई, मोथाखेडा , तारूबांदा याच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अंजनगांव तालुक्यात जलस्तर खालावला अंजनगांव सुर्जी तालुक्यात बागायती क्षेत्र आहे. मात्र, या भागातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे टाकरखेडा, धनेगांव, बोराळा येथे पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सदस्या पूजा हाडोळे यांनी सभेत केली आहे. या परिसरात जलयुक्त शिवार योजनेतून कोल्हापूरी बंधारे, नाला खोलीकरण,गॅबीवन बंधारे होणे गरजेचे आहे. मात्र, यावर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप पूजा हाडोळे यांनी केला.