शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

६ कोटी ६६ लाखांचा पाणीपुरवठा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:46 IST

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत अंजनगाव सुर्जी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सुमारे ६.६६ कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असेल. नगरविकास विभागाने २६ नोव्हेंबर रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केली.

ठळक मुद्देअंजनगाव नगर परिषदेकडे जबाबदारी : पेयजलाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत अंजनगाव सुर्जी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सुमारे ६.६६ कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असेल. नगरविकास विभागाने २६ नोव्हेंबर रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केली.राज्यातील नागरी भागात मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान राबविले जाते. त्याअनुषंगाने नगर परिषदेचा पाणीपुरवठा प्रकल्प नगर परिषद प्रशासन संचालनालायमार्फत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीकडे मान्यतेकरिता सादर केला होता. या प्रकल्पास मजीप्राने तांत्रिक मान्यता दिल्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळाली. ६.६६ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प कार्यारंभ आदेशाच्या १५ महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. या प्रकल्पामुळे अंजनगाव सुर्जी शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल. ६.६६ कोटींपैकी ५.६६ कोटी रुपये राज्य सरकार देणार असून, नगर परिषदेला ९९.९० लाख रुपये स्वहिस्सा टाकावा लागणार आहे. एकूण रकमेपैकी २,५१ कोटी रुपये वितरण व्यवस्थेवर खर्च होईल.मजीप्राची ‘पीएमसी’ म्हणून निवडप्रकल्पाचे कार्यान्वयन अंजनगाव सुर्जी नगर परिषदेमार्फत करण्याचे निर्देश नगरविकास खात्याने दिले आहेत. सदर प्रकल्पास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अर्थात पीएमसी म्हणून नियुक्त करणे बंधनकारक आहे. त्याबाबत आवश्यक ठराव नगर परिषदेने करावा. प्रक ल्प किमतीच्या ३ टक्के इतके पीएमसी चार्जेस नगरपरिषदेने मजीप्रास स्वनिधीतून प्रदान करावे लागेल.बंधनकारक सुधारणाप्रकल्प मंजुरीच्या पहिल्या वर्षात नगर परिषदेने कामकाजाचे पूर्ण संगणकीकरण करणे अनिवार्य राहील. यात प्रामुख्याने ई-गव्हर्नन्स, लेखा, जन्म-मृत्यू नोंद सुधारणा याची १०० टक्के अंमलबजावणी बंधनकारक राहील. उचित उपभोक्ता कर लागू करून किमान ८० टक्के वसुली नगर परिषद प्रशासनास बंधनकारक आहे.वैकल्पिक सुधारणामलनि:सारण प्रकल्प हाती घेतलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरी भागातील सांडपाण्याची पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर करण्याबाबतच्या घटकांचा डीपीआरमध्ये समावेश करावा, याशिवाय नगर परिषदेने त्यांच्या मालकीच्या इमारतीवर पर्जन्यजल संचय करण्याचे निर्देश आहेत.