शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महानगरात सोमवारी होणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

शनिवारी रात्री २ वाजता ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची तपासणी केली जाईल, असे मजीप्राचे उपअभियंता यांनी सांगितले. त्यानंतर, महानगरातील जलकुंभात पाणी भरण्यात येणार आहे. त्यानंतर, वेळापत्रकानुसार नागरिकांना सोमवारी पाणीपुरवठा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अमरावती महानगरातील जलकुंभात सिंभोरा येथून पाणी पोहोचण्यास वेळ लागेल, अशी माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी रहाटगावनजीक पुन्हा फुटल्याने, ती दुरुस्त होण्यास शनिवारी मध्यरात्र उजाडेल. त्यामुळे अमरावतीकरांना सोमवारी पाणीपुरवठा होईल, असे संकेत उपकार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत. जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी अभियंते, कंत्राटदारांसह ३० जणांची चमू घटनास्थळी तळ ठोकून आहे. मात्र, मजीप्राच्या ढिसाळ कारभारावर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.गत आठवड्यात पाच दिवस पाणीपुरवठा नाही. आता शनिवार, रविवार असे दोन दिवस पुन्हा जलवाहिनी लीकेजमुळे पाण्याचे नियोजन बिघडविले आहे. यंदा उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यात मजीप्रा सपशेल अपयशी ठरल्याचे वास्तव आहे. किमान पावसाळ्यात तरी पाणीपुरवठा सुरळीत होईल की नाही, हेही गुलदस्त्यात आहे. फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीची कामे शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून निरंतरपणे सुरू आहे. शनिवारी रात्री २ वाजता ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची तपासणी केली जाईल, असे मजीप्राचे उपअभियंता यांनी सांगितले. त्यानंतर, महानगरातील जलकुंभात पाणी भरण्यात येणार आहे. त्यानंतर, वेळापत्रकानुसार नागरिकांना सोमवारी पाणीपुरवठा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अमरावती महानगरातील जलकुंभात सिंभोरा येथून पाणी पोहोचण्यास वेळ लागेल, अशी माहिती आहे. जलहवाहिनी दुरुस्तीचे कामे वेगाने होण्यासाठी घटनास्थळी कार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांच्यासह उपअभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंता, कंत्राटदारांसह मजूर वर्ग कार्यरत आहे.

महापालिकेत टँकरची वानवानऊ लाख लाेकसंख्येच्या महानगरात महापालिकेकडे पाण्यासाठी केवळ दोनच टॅंकर असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा अशी स्थिती उद्भवली असताना प्रशासनाकडून ही बाब गंभीरतेने घेण्यात येत नाही. आता कुठे तरी आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी पाच नव्याने टॅंकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती महानगरात पाचही झोन अंतर्गत प्रत्येकी एक टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. 

पाण्याच्या कॅन महागल्याकाही दिवसांपासून मजीप्राकडून पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाणी विक्रेत्यांनी ही बाब ‘कॅश’ करण्याला प्राधान्य दिले आहे. पाण्याच्या कॅनचे दर ३० रुपयांहून ४० ते ५० रुपये करण्यात आले आहे. मजीप्राचा पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांना महागडे पाणी विकत घ्यावे लागत आहे. शहरातील काही भागात हँडपंपमध्ये पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. पुढील दोन दिवस पाण्यासाठी भटकंती होणार आहे. 

 

टॅग्स :water transportजलवाहतूक