शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याचा निधी शौचालयावर खर्च

By admin | Updated: June 1, 2017 00:07 IST

झेडपीला पाणी पुरवठ्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेला परंतु अखर्चित राहिलेला ४ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला परत केला गेला.

जिल्हा परिषद : १५ कोटींची रक्कमही अखर्चितलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : झेडपीला पाणी पुरवठ्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेला परंतु अखर्चित राहिलेला ४ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला परत केला गेला. मात्र, प्रशासनाने तो वळती करून घेण्यात विलंब लावल्याने पाणी पुरवठा विभागाने परस्परच या निधीचा वापर शौचालयांच्या निर्मितीसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दोन वर्षापूर्वी केंद्र व राज्य शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी ४ कोटींचा रूपयांचा निधी मिळाला होता. मात्र हा निधी अखर्चित राहिला. नियमानुसार तो जिल्हाधिकाऱ्यांना परत केला गेला. मात्र, निधी वळता करण्यास विलंब लागल्याने झेडपीच्या पाणी पुरवठा विभागाने शासनाची परवानगी न घेताच यानिधीचा वापर स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत शौचालय बांधकामासाठी केल्याचा आरोप जि.प.सदस्य रविंद्र मुंदे यांनी केला आहे. जिल्ह्यात १५० गावांमध्ये पाणीटंचाई आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी विविध लेखाशिर्षातून जि.प.ला प्राप्त १५ कोटी ८९ लाख ८२ हजार ६८० रूपयांचा निधी दोन वर्षात खर्च होणे अपेक्षित होते. मात्र, तो खर्च करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनासाठी जिल्हा नियोजन समिती व शासनाकडून दोन वर्षांपूर्वी पाणी पुरवठा विभागाला निधी उपलब्ध झाला होता. यातून नळ पाणी पुरवठा, हातपंप विद्युत (खासदार निधी), आमदार स्थानिक विकास निधीतून नळ पाणीपुरवठा योजना, सर्वसाधारण अनुदान निधीतून अनुसूचित जाती घटकांसाठी पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरूस्ती अशी विविध कामे अपेक्षित होती. हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात १५ कोटी ८९ लाख ८२ हजार ६८० रूपये अखर्चित असल्याच्या गंभीर प्रकाराला दोषी कोण, असा प्रश्न विरोधी पक्षाने केला आहे. स्वच्छ भारत मिशनकडे ४ कोटी रूपये वर्ग करण्याचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होते. त्यानुसार निधी वळता केला. अखर्चित १५ कोटी खर्च करण्यासाठी तांत्रिक अडचणी असल्याने मार्चपर्यंत तो खर्च झाला नाही. मात्र हा निधी पाणी पुरवठा योजनेवरच खर्च केला जाईल. निधी परत जाणार नाही- के.टी.उमाळकरकार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा पाणी पुरवठ्याचे ४ कोटी शौचालयांसाठी वापरताना शासनाची परवानगी घेतली नाही. जिल्ह्यात पाणीटंचाई असताना १५ कोटींचा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च होणे अपेक्षित होते. मात्र, यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे याला जबाबदार कोण, पदाधिकारी की प्रशासन, याचा जाब द्यावा.- रविंद्र मुंदे विरोधी पक्षनेता, झेडपी