शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:33 IST

पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणी स्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा केलेल्या उपाययोजनांचा जि.प. अध्यक्षांनी बुधवारी आढावा घेतला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : अध्यक्षांनी घेतला पाणीटंचाईचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणी स्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा केलेल्या उपाययोजनांचा जि.प. अध्यक्षांनी बुधवारी आढावा घेतला.जिल्ह्यात पाण्याचे टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५४ गावांतील ६५ खासगी विहीर अधिग्रहित केल्या आहेत. यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईचा सामना काही गावांमध्ये करावा लागत आहे. ग्रामीण भागातील भूजल स्तर खोल गेल्याने पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत आहेत. गावातील पाणीपुरवठ्याचे स्त्रोत आटल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प असल्याचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी सांगितले. ग्रामस्थांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. यामध्ये मेळघाटातील दोन गावांचा समावेश आहे. पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध असल्याने टंचाईची तीव्रता कमी-अधिक आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार उपाययोजना सुरू केल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी अधिग्रहित करून आवश्यक तेथे उपाययोजना करण्याचे निर्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी अधिकाºयांना दिले आहेत. बैठकीला उपअभियंता संदीप देशमुख, अनूप खासबागे, दीपक डोंगरे, आर.डी सावळकर, दिपेंद्र कोराटे, जी.आर पाटणे आदी उपस्थित होते.