शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेंदोळा खुर्द येथे दहा दिवसांनी पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:16 IST

तालुक्यातील आदर्शग्राम व मुख्यमंत्री दत्तक गाव असलेल्या शेंदोळा (खुर्द) येथील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. येथे अजूनही आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.

ठळक मुद्देविहीर, बोअरचे अधिग्रहण : नळावरील वादामुळे टँकरला नकार

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील आदर्शग्राम व मुख्यमंत्री दत्तक गाव असलेल्या शेंदोळा (खुर्द) येथील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. येथे अजूनही आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे. भीषण पाणीटंचाई असूनही गावात आपसात वादविवाद निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने टँकरने होणारा पाणी पुरवठा नाकारला आहे.अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शेंदोळा (खुर्द) या गावातील नागरिकांसाठी आरओ प्लाँट आहे. पाच रुपयांचा शिक्का टाकल्यानंतर कॅनभर पाणी मिळते. मात्र लगतच्या अन्य गावात पाणीटंचाई असल्याने थंड व शुद्ध पाण्यासाठी शेंदोळा खुर्द येथे नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे स्थानिकांनाच पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गावात दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने गावातील एक विहीर व बोअर अधिग्रहित करण्यात आल्या. तरीही गावात पाणी समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आणखी काही शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहित करण्याच्या हालचाली ग्रामपंचायतीने चालविल्या आहेत. गावात पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात कुलर सुरू असल्याने पाण्याची मागणी वाढली असली तरी शेंदोळा येथे टँकरने पाणी पुरवठा केला जात नाही. कारण टँकर येताच पाणी भरण्यासाठी नागरिकांची धावाधाव होते. त्यात वादही होतो. हाणामारीपर्यंत वाद पोहोचल्यास गावातील शांततेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीने टँकरची मागणी प्रशासनाकडे केलेली नाही.सरपंचपद रिक्त, उपसरपंचांकडे प्रभारशेंदोळा खुर्द येथील तत्कालीन सरपंचा मेघा नागदिवे यांना मागील वर्षी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी महिनाभरापूर्वी नागदिवे यांना ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदासाठी अपात्र ठरविले. त्यामुळे सरपंचपद रिक्त असून उपसरपंचाकडे प्रभार देण्यात आला आहे. सहा महिन्यांपासून हा वाद सुरू असल्याने शासकीय काम थंडावले. पाणीटंचाईवर उपाययोजना सुचविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पाणी नागरिकांना पाणीटंचाईची झळ पोहचत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई