शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेंदोळा खुर्द येथे दहा दिवसांनी पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:16 IST

तालुक्यातील आदर्शग्राम व मुख्यमंत्री दत्तक गाव असलेल्या शेंदोळा (खुर्द) येथील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. येथे अजूनही आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.

ठळक मुद्देविहीर, बोअरचे अधिग्रहण : नळावरील वादामुळे टँकरला नकार

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील आदर्शग्राम व मुख्यमंत्री दत्तक गाव असलेल्या शेंदोळा (खुर्द) येथील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. येथे अजूनही आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे. भीषण पाणीटंचाई असूनही गावात आपसात वादविवाद निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने टँकरने होणारा पाणी पुरवठा नाकारला आहे.अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शेंदोळा (खुर्द) या गावातील नागरिकांसाठी आरओ प्लाँट आहे. पाच रुपयांचा शिक्का टाकल्यानंतर कॅनभर पाणी मिळते. मात्र लगतच्या अन्य गावात पाणीटंचाई असल्याने थंड व शुद्ध पाण्यासाठी शेंदोळा खुर्द येथे नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे स्थानिकांनाच पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गावात दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने गावातील एक विहीर व बोअर अधिग्रहित करण्यात आल्या. तरीही गावात पाणी समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आणखी काही शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहित करण्याच्या हालचाली ग्रामपंचायतीने चालविल्या आहेत. गावात पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात कुलर सुरू असल्याने पाण्याची मागणी वाढली असली तरी शेंदोळा येथे टँकरने पाणी पुरवठा केला जात नाही. कारण टँकर येताच पाणी भरण्यासाठी नागरिकांची धावाधाव होते. त्यात वादही होतो. हाणामारीपर्यंत वाद पोहोचल्यास गावातील शांततेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीने टँकरची मागणी प्रशासनाकडे केलेली नाही.सरपंचपद रिक्त, उपसरपंचांकडे प्रभारशेंदोळा खुर्द येथील तत्कालीन सरपंचा मेघा नागदिवे यांना मागील वर्षी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी महिनाभरापूर्वी नागदिवे यांना ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदासाठी अपात्र ठरविले. त्यामुळे सरपंचपद रिक्त असून उपसरपंचाकडे प्रभार देण्यात आला आहे. सहा महिन्यांपासून हा वाद सुरू असल्याने शासकीय काम थंडावले. पाणीटंचाईवर उपाययोजना सुचविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पाणी नागरिकांना पाणीटंचाईची झळ पोहचत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई