शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

‘ब्रीज कम बंधारा’तून आता पाणी साठवण

By admin | Updated: October 26, 2014 22:32 IST

गाव, खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पुलांवर बंधारे बांधून पाणी साठवण केली जाणार आहे. त्याकरीता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत ‘ब्रीज कम बंधारा’ साकारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची

अमरावती : गाव, खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पुलांवर बंधारे बांधून पाणी साठवण केली जाणार आहे. त्याकरीता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत ‘ब्रीज कम बंधारा’ साकारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी येथे रविवारी दिली. हा अभिनव उपक्रम भविष्यात शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.नितीन गडकरी हे येथे कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी शासकीय विश्राम भवनात काही भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी निवेदिता चौधरी, जगदीश नाना बोंडे, प्रदीप शिंगोरे, विजय मोहता यांनी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राज्यात हवे होते, असे म्हणताच गडकरी यांनी ‘मी दिल्लेत सेट झालो आहे. देशाचे नेतृत्व करण्याची पक्षाने संधी दिली. त्यामुळे आपण दिल्लीतच खुष आहोत’, असेही ते म्हणाले. गडकरी यांनी केंद्र शासनाने राबविलेल्या लोकाभिमुख योजनांचा पाढा वाचला. विदर्भात उद्योगधंदे नसल्यामुळे विदर्भ आर्थिकदृष्ट्या माघारल्याचे त्यांनी मान्य केले. नव्या योजनांची मुहूर्तमेढ रोवताना रामसेतू निर्माण कार्य हाती घेतले जाणार आहे. राज्यात सिंचन क्षमतेत विदर्भ फारच मागे असल्यामुळे पाणी साठवण करण्यासाठी ‘ब्रीज कम बंधारा’ हा उपक्रम सुरु होत आहे. या अभिनव उपक्रमामुळे लहान-मोठ्या शेतकऱ्यांना बंधाऱ्यातून शेतीसाठी पाणी वापर करता येईल. भविष्यात ही योजना विदर्भातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल, असे गडकरी म्हणाले. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत गाव-खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पूलाचे बांधकाम करुन त्याच भागात बंधारा निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता बंधाऱ्यात साठविले जाईल. गुरा, ढोरांना उन्हाळ्यात पिण्यास पाणी उपलब्ध होईल. मात्र, या बंधाऱ्यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा वापर करणे सोयीचे होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. देशभरातील ग्रामीण भागात ‘ब्रीज कम बंधारा’ या अभिनव उपक्रमातून पाणी साठवण करण्यावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून गाव, खेड्यातील रस्त्यांची निर्मिती करण्याचा उद्देश असला तरी छोट्या पुलाचे पक्के बांधकाम करणे, त्याच पुलांवर बंधारा निर्माण करणे जेणे करुन पाणी साठवण करण्याचा मार्ग सुकर होईल, असे गडकरी यांनी सांगितले. विदर्भाच्या विकासावर भरभरुन बोलत असताना गडकरींनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले, हे विशेष. इतर अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.