शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

‘ब्रीज कम बंधारा’तून आता पाणी साठवण

By admin | Updated: October 26, 2014 22:32 IST

गाव, खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पुलांवर बंधारे बांधून पाणी साठवण केली जाणार आहे. त्याकरीता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत ‘ब्रीज कम बंधारा’ साकारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची

अमरावती : गाव, खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पुलांवर बंधारे बांधून पाणी साठवण केली जाणार आहे. त्याकरीता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत ‘ब्रीज कम बंधारा’ साकारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी येथे रविवारी दिली. हा अभिनव उपक्रम भविष्यात शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.नितीन गडकरी हे येथे कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी शासकीय विश्राम भवनात काही भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी निवेदिता चौधरी, जगदीश नाना बोंडे, प्रदीप शिंगोरे, विजय मोहता यांनी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राज्यात हवे होते, असे म्हणताच गडकरी यांनी ‘मी दिल्लेत सेट झालो आहे. देशाचे नेतृत्व करण्याची पक्षाने संधी दिली. त्यामुळे आपण दिल्लीतच खुष आहोत’, असेही ते म्हणाले. गडकरी यांनी केंद्र शासनाने राबविलेल्या लोकाभिमुख योजनांचा पाढा वाचला. विदर्भात उद्योगधंदे नसल्यामुळे विदर्भ आर्थिकदृष्ट्या माघारल्याचे त्यांनी मान्य केले. नव्या योजनांची मुहूर्तमेढ रोवताना रामसेतू निर्माण कार्य हाती घेतले जाणार आहे. राज्यात सिंचन क्षमतेत विदर्भ फारच मागे असल्यामुळे पाणी साठवण करण्यासाठी ‘ब्रीज कम बंधारा’ हा उपक्रम सुरु होत आहे. या अभिनव उपक्रमामुळे लहान-मोठ्या शेतकऱ्यांना बंधाऱ्यातून शेतीसाठी पाणी वापर करता येईल. भविष्यात ही योजना विदर्भातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल, असे गडकरी म्हणाले. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत गाव-खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पूलाचे बांधकाम करुन त्याच भागात बंधारा निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता बंधाऱ्यात साठविले जाईल. गुरा, ढोरांना उन्हाळ्यात पिण्यास पाणी उपलब्ध होईल. मात्र, या बंधाऱ्यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा वापर करणे सोयीचे होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. देशभरातील ग्रामीण भागात ‘ब्रीज कम बंधारा’ या अभिनव उपक्रमातून पाणी साठवण करण्यावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून गाव, खेड्यातील रस्त्यांची निर्मिती करण्याचा उद्देश असला तरी छोट्या पुलाचे पक्के बांधकाम करणे, त्याच पुलांवर बंधारा निर्माण करणे जेणे करुन पाणी साठवण करण्याचा मार्ग सुकर होईल, असे गडकरी यांनी सांगितले. विदर्भाच्या विकासावर भरभरुन बोलत असताना गडकरींनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले, हे विशेष. इतर अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.