शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जंगलातील पाणीस्रोत आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:28 IST

वडाळी व चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रातील आटलेल्या जलस्रोतांमुळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अपघाताचे प्रमाण अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर वाढले आहेत.

ठळक मुद्देवडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र : कृत्रिम पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची मदार

लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा : वडाळी व चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रातील आटलेल्या जलस्रोतांमुळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अपघाताचे प्रमाण अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर वाढले आहेत.मान्सून यंदा अतिशय कमी झाल्याने नैसर्गिक स्रोत पूर्णपणे आटले. यामुळे या जंगलामध्ये ज्या पाणवठ्यांमध्ये वर्षभर पाणी राहायचे, तेदेखील आटले आहेत. वनविभागाच्या माध्यमातून दोन्ही वनक्षेत्रांमध्ये काही सिमेंटचे पाणवठे, तर काही नैसर्गिक पाणवठे तयार करण्यात आले. सिमेंटच्या पाणवठ्याचा आधार झाला, तरीही तो पुरेसा नाही. बरेचसे वन्यप्राणी त्यांची जागा सोडत नाहीत. विशेषत: हरिण, माकडे, रानडुक्कर, रोही हे दुपारी १२ ते ४ या वेळेत वनक्षेत्रातील पाणवठ्यांवर तहान भागवितात. यावर्षी काही पाणवठे आटल्यामुळे ते गावतलावांकडे कूच करीत आहे. मात्र, तेथे पाळीव जनावरे असल्यामुळे वर्दळ कमी झाल्यानंतर रात्री उशिरा ते तहान भागविण्यासाठी या वनक्षेत्रातून त्या वनक्षेत्रात रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत मृत्यू ओढवण्याची घटना नित्याची झाली आहे.वरूडा व पानखोरीचे वनक्षेत्र वन्यप्राण्यांच्या वास्तव्यास अतिशय समृद्ध आहे. त्यामुळे या भागात आणखी पाणवठ्यांची गरज आहे. वनविभागाने जेवढे जलस्रोत निर्माण केले, तेथे पोहोचण्यासाठी चांदूर रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो. यामध्ये २०१८ च्या उत्तरार्धात पाच हरिणांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला. वडाळी, पोहरा, चिरडी, मार्डी, मालेगाव, मालखेड, कारला, भानखेडा, गोविंदपूर, अंजनगाव बारी, कोंडेश्वर या राखीव जंगलात वन्यपशूंची संख्या वाढीस लागली आहे. त्यांचा रस्ते अपघातातून बचाव व्हावा, यासाठी अमरावती-चांदूर रेल्वे राज्य मार्गावरील वनक्षेत्रात गतिरोधक बसविण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वनविभागाने सादर केला. १० वर्षांपूर्वी अमरावती-चांदूर रेल्वे रस्ता ओलांडताना चार बिबट्यांचा मृत्यू झाला, ही बाबसुद्धा वनविभागाने प्रस्तावात नमूद केली आहे.समृद्ध वन्यजीवनअमरावतीनजीकच्या एसआरपी क्वार्टर्सपासून राखीव वनक्षेत्र सुरू होते. ते क्षेत्र पुढे चांदूर रेल्वेपर्यंत विस्तारले आहे. यामध्ये बिबट, हरीण, चितळ, रानडुक्कर, रानकुत्रे, रोही, चिंकारा, भेडकी, काळविट, सोनकुत्रे, मोर, सायाळ आदी वन्यपशू आहेत. राखीव जंगलात एका क्षेत्रातून दुसरीकडे जाताना राज्य मार्ग ओलांडावा लागतो. हा मार्ग ओलांडताना वन्यपशूंचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे कळविले आहे.- आशिष कोकाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदूर रेल्वेसिमेंटच्या पाणवठ्याची पाहणी, स्वच्छता दरदिवशी येथील वनरक्षक, वनमजूर करतात. रस्ता अपघाताबाबत उपाययोजना केल्या आहेत.- कैलास भुंबर, वनपरिक्षेत्र अधिकारी वडाळी