शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

पाणीटंचाई : कुचराई नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:58 IST

यावर्षी मान्सूनने फिरविलेली पाठ व वाढत्या टंचाई परिस्थितीमुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दृष्काळ जाहीर केला आहे. टंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना कराव्यात, यात कुचराई नकोच, अशी ताकीद जलव्यवस्थापन समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिली.

ठळक मुद्देनितीन गोंडाणे : जलव्यवस्थापन समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यावर्षी मान्सूनने फिरविलेली पाठ व वाढत्या टंचाई परिस्थितीमुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दृष्काळ जाहीर केला आहे. टंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना कराव्यात, यात कुचराई नकोच, अशी ताकीद जलव्यवस्थापन समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिली.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून शनिवारी झेडपीच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कु कडे, समिती सदस्य अनिता मेश्राम, पार्वती काठोळे, गौरी देशमुख आदी उपस्थित होते. पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढत आहे. ठिकठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटले आहे. त्यामुळे विहीर अधिग्रहण, कुपनलिका, आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठ्याचे टँकर आदी पाणीपुरवठा संबंधित उपाययोजना प्रशासनाने कराव्यात. पाणीटंचाई संदर्भातील तक्रारींचे वेळीच निराकरण कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मोर्शी तालुक्यातील ७० गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी ५६ गावांचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. याला मंजुरी मिळताच ही योजना तातडीने सुरू करावी, अशी सूचना उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी केली. त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी दिले. सिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेची कामे सर्वत्र सुरू आहेत. परंतु ही कामे करताना उद्घाटनासाठी जि.प. सदस्यांना प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रित करणे आवश्यक आहे. मात्र, अशावेळी त्यांना डावलण्यात आल्याचा मुद्दा गौरी देशमुख यांनी मांडला. यापुढे जिल्हा परिषद सदस्यांना कार्यक्रमांना बोलविण्याचे दृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. सभेला उपमुख्यकार्यकारी अधिकारी नारायन सानप, मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले, रोहयोच्या डेप्युटी सीईओ माया वानखडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.वीज कापण्यास मनाईशेतकरी दुष्काळी स्थितीचा सामना करत आहेत. जिल्ह्यात काही मंडळांत दुष्काळ जाहीर झाला असताना ऐन रबी हंगामात महावितरणकडून कृ षी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. दुष्काळी स्थिती लक्षात घेता कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी केली. त्यावर वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूृचना गोंडाणे यांनी सदर अधिकाºयांना केली.