शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई : कुचराई नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:58 IST

यावर्षी मान्सूनने फिरविलेली पाठ व वाढत्या टंचाई परिस्थितीमुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दृष्काळ जाहीर केला आहे. टंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना कराव्यात, यात कुचराई नकोच, अशी ताकीद जलव्यवस्थापन समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिली.

ठळक मुद्देनितीन गोंडाणे : जलव्यवस्थापन समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यावर्षी मान्सूनने फिरविलेली पाठ व वाढत्या टंचाई परिस्थितीमुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दृष्काळ जाहीर केला आहे. टंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना कराव्यात, यात कुचराई नकोच, अशी ताकीद जलव्यवस्थापन समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिली.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून शनिवारी झेडपीच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कु कडे, समिती सदस्य अनिता मेश्राम, पार्वती काठोळे, गौरी देशमुख आदी उपस्थित होते. पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढत आहे. ठिकठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटले आहे. त्यामुळे विहीर अधिग्रहण, कुपनलिका, आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठ्याचे टँकर आदी पाणीपुरवठा संबंधित उपाययोजना प्रशासनाने कराव्यात. पाणीटंचाई संदर्भातील तक्रारींचे वेळीच निराकरण कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मोर्शी तालुक्यातील ७० गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी ५६ गावांचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. याला मंजुरी मिळताच ही योजना तातडीने सुरू करावी, अशी सूचना उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी केली. त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी दिले. सिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेची कामे सर्वत्र सुरू आहेत. परंतु ही कामे करताना उद्घाटनासाठी जि.प. सदस्यांना प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रित करणे आवश्यक आहे. मात्र, अशावेळी त्यांना डावलण्यात आल्याचा मुद्दा गौरी देशमुख यांनी मांडला. यापुढे जिल्हा परिषद सदस्यांना कार्यक्रमांना बोलविण्याचे दृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. सभेला उपमुख्यकार्यकारी अधिकारी नारायन सानप, मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले, रोहयोच्या डेप्युटी सीईओ माया वानखडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.वीज कापण्यास मनाईशेतकरी दुष्काळी स्थितीचा सामना करत आहेत. जिल्ह्यात काही मंडळांत दुष्काळ जाहीर झाला असताना ऐन रबी हंगामात महावितरणकडून कृ षी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. दुष्काळी स्थिती लक्षात घेता कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी केली. त्यावर वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूृचना गोंडाणे यांनी सदर अधिकाºयांना केली.