शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

पाणीटंचाई : कुचराई नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:58 IST

यावर्षी मान्सूनने फिरविलेली पाठ व वाढत्या टंचाई परिस्थितीमुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दृष्काळ जाहीर केला आहे. टंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना कराव्यात, यात कुचराई नकोच, अशी ताकीद जलव्यवस्थापन समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिली.

ठळक मुद्देनितीन गोंडाणे : जलव्यवस्थापन समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यावर्षी मान्सूनने फिरविलेली पाठ व वाढत्या टंचाई परिस्थितीमुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दृष्काळ जाहीर केला आहे. टंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना कराव्यात, यात कुचराई नकोच, अशी ताकीद जलव्यवस्थापन समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिली.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून शनिवारी झेडपीच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कु कडे, समिती सदस्य अनिता मेश्राम, पार्वती काठोळे, गौरी देशमुख आदी उपस्थित होते. पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढत आहे. ठिकठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटले आहे. त्यामुळे विहीर अधिग्रहण, कुपनलिका, आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठ्याचे टँकर आदी पाणीपुरवठा संबंधित उपाययोजना प्रशासनाने कराव्यात. पाणीटंचाई संदर्भातील तक्रारींचे वेळीच निराकरण कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मोर्शी तालुक्यातील ७० गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी ५६ गावांचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. याला मंजुरी मिळताच ही योजना तातडीने सुरू करावी, अशी सूचना उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी केली. त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी दिले. सिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेची कामे सर्वत्र सुरू आहेत. परंतु ही कामे करताना उद्घाटनासाठी जि.प. सदस्यांना प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रित करणे आवश्यक आहे. मात्र, अशावेळी त्यांना डावलण्यात आल्याचा मुद्दा गौरी देशमुख यांनी मांडला. यापुढे जिल्हा परिषद सदस्यांना कार्यक्रमांना बोलविण्याचे दृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. सभेला उपमुख्यकार्यकारी अधिकारी नारायन सानप, मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले, रोहयोच्या डेप्युटी सीईओ माया वानखडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.वीज कापण्यास मनाईशेतकरी दुष्काळी स्थितीचा सामना करत आहेत. जिल्ह्यात काही मंडळांत दुष्काळ जाहीर झाला असताना ऐन रबी हंगामात महावितरणकडून कृ षी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. दुष्काळी स्थिती लक्षात घेता कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी केली. त्यावर वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूृचना गोंडाणे यांनी सदर अधिकाºयांना केली.