शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

तिवसा तालुक्यातील १६ गावांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:31 IST

तालुक्यातील १६ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाच्यावतीने ११ टँकरने पाणी पुरविले जात आहे. प्रशासनाने एक बोअर व १८ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

ठळक मुद्दे११ टँकरने पाणीपुरवठा, १८ विहिरींचे अधिग्रहण

तिवसा : तालुक्यातील १६ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाच्यावतीने ११ टँकरने पाणी पुरविले जात आहे. प्रशासनाने एक बोअर व १८ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.तिवसा, गुरुकुंज मोझरी या दोन मोठ्या गावांसह तालुक्यातील अनेक गावांना वर्धा नदीपात्रातून पाणीपुरवठा होत होता. मात्र, दोन वर्षांत कमी पाऊस झाल्याने व वर्धा नदीला प्रथमच कोरड पडल्याने तिवसा, गुरुकुंज मोझरीचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. तालुक्यातील तिवसा, पालवाडी, अनकवाडी, आखतवाडा, बोर्डा, मार्डी, भिवापूर, विरगव्हाण, मोझरी, शिरजगाव मोझरी, शेंदोळा खुर्द, शेंदोळा बु, तळेगाव ठाकूर, निंबोरा, शेंदूरजना बाजार, अनकवाडी या ग्रामपंचायतीने शासनाकडे टँकरची मागणी केली होती. त्यामुळे शासनाच्यावतीने ११ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यातील विहिरी, बोअर व नदी नाले, तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. तिवसा शहरात नगरपंचायतीने पाण्याचा टँकर विकत घेतल्याने तेथील सर्व प्रभागात दिवसरात्र टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तिवसा येथे नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा आठ दिवसांवर गेला आहे. वर्धा नदीतील डोहात पाण्याच्या मोटारी टाकल्याने तिवसा येथे गढूळ पाणीपुरवठा होत आहे.