शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

नांदगावात पाणी टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:59 IST

तालुक्यातील बेंबळा व साखळी या मोठ्या नद्या यंदा कोरड्या पडल्या आहेत.

ठळक मुद्देबेंबळा व साखळी नद्या कोरड्या : गेल्या सात वर्षांत यंदा कमी पावसाची नोंद

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील बेंबळा व साखळी या मोठ्या नद्या यंदा कोरड्या पडल्या आहेत. मार्च-एप्रिलपर्यंत खळाळून वाहणाऱ्या या नद्यांची धार काही दिवसापूर्वीच बंद झाली आहे. नदीपात्रात फक्त खोलगट भागात पाण्याचे डबके तेवढे शिल्लक उरले आहेत.गेल्या सात वर्षाच्या तुलनेत यंदा फक्त ५११ मि.मी. इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील गावागावांतून वाहणारे नाले तर कधीचेच कोरडे पडले. यंदा जानेवारीपासूनच काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.मंगरुळ चव्हाळा येथील साखळी नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाचे गेट बंद करण्यात आले होते. पण, नदीलाच पाणी नसल्याने तेथील बंधाऱ्यात पाणी अडून साठले नाही. गेल्या वर्षभरापासून अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू आहे. आताच येथे पाणी टंचाईची झळ गावकऱ्याना सोसावी लागत असल्याचे येथील ग्रामस्थ अतुल ठाकूर यांनी सांगितले.तालुक्यात ६८ ग्रामपंचायती असून, गावांची संख्या १२९ आहे. गावोगावी आगामी काळात उग्र होऊ पाहणाऱ्या पाणीटंचाईशी सामना करण्यासाठी आतापासूनच पावले उचलण्याची गरज आहे. शेतातील विहिरींची पाण्याची पातळी खालावत असल्याने फळबागा व रबी हंगाम धोक्यात आला आहे. प्रशासनाने वेळीच व्यवस्थापन न केल्यास आगामी काळात भीषण टंचाईचे सावट आहे.परिसरातील सर्वांत मोठी नदी असलेली साखळी दोन महिन्यांपूर्वीच कोरडी पडली. गावाच्या शिवारातील नाला कोरडा ठणठणीत अहे, नदी-नाले कोरडे पडल्याने जनावरांना शिवारात कुठेही पाणी नाही. जानेवारीनंतर तीव्र पाणीटंचाईचे संकेत आताच स्पष्टपणे दिसू लागले आहेत.- रूपाली सुनील इंझळकरसरपंच, सालोडगावालगत वाहणारी जळू नदी कोरडी झाली आहे. डिसेंबरनंतरच पाणीटंचाई जाणवणार आहे, विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. शेतातील विहिरींना पाणी कमी असल्यामुळे यंदा रबीच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.- राजेंद्र सरोदेमाजी सरपंच, माहुली चोर