शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाहीतर वीजटंचाई, प्रशासनातील नियोजनाचा अभाव ...

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाहीतर वीजटंचाई, प्रशासनातील नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर यामुळे भासत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील ६७ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. यापैकी १८ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जून महिना सुरू झाला तरी जिल्ह्यातील या गावांमध्ये पाण्याची समस्था कायम आहे.

जिल्ह्यातील ६७ गावांपैकी १८ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दोन वर्षांपूर्वी पावसाने दिलेला दगा आणि गत वर्षी दिलेला हात. यामुळे टंचाईग्रस्त विदर्भातील गावांत्या संख्येत मोठी भर पडली आहे. जिल्ह्याला पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानुर, मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा ही धरणे जिल्ह्याला वरदान ठरली आहेत. परंतु तरीही धारणी व चिखलदरा मेळघाटातील भागात तसेच मोर्शी तालुक्यातील काही भागात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही मोर्शी तालुक्यात सर्वात जास्त गावे टंचाईग्रस्त आहेत. सध्या पाणीटंचाई ज्या गावात निर्माण झाली त्या गावात टँकर किंवा विहीर अधिग्रहाणाव्दारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात जे १८ टँकर सुरू आहेत. त्यातील एकट्या चिखलदरा तालुक्‍यात १७ टँकर सुरू आहेत. तर चांदूर रेल्वे तालुक्यातील एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

बॉक्स

या गावांना टँकरने पाणीपुरवठा

चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, लवादा, अलाडोह, आकी, मलकापूर, सोमवारखेडा, मोथा, धरमडोह, बहादरपूर, तारूबांदा, तोरणवाडी, बगदरी, सोनापूर, रायपूर, सावऱ्या, आवागढ, कोयलारी, पाचडोंगरी, आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

बॉक्स

तालुकानिहाय विहीर अधिग्रहण

अमरावती १३, नांदगाव खंडेश्र्वर २०, भातकुली १, तिवसा ३, मोर्शी १४, वरूड ४, चांदूर रेल्वे २०, अचलपूर १२, चिखलदरा २९, धामणगाव रेल्वे २ आदी तालुक्यातील गावांना ११८ विंधन विहीर आणि खासगी विहिरींव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.