शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाहीतर वीजटंचाई, प्रशासनातील नियोजनाचा अभाव ...

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाहीतर वीजटंचाई, प्रशासनातील नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर यामुळे भासत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील ६७ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. यापैकी १८ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जून महिना सुरू झाला तरी जिल्ह्यातील या गावांमध्ये पाण्याची समस्था कायम आहे.

जिल्ह्यातील ६७ गावांपैकी १८ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दोन वर्षांपूर्वी पावसाने दिलेला दगा आणि गत वर्षी दिलेला हात. यामुळे टंचाईग्रस्त विदर्भातील गावांत्या संख्येत मोठी भर पडली आहे. जिल्ह्याला पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानुर, मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा ही धरणे जिल्ह्याला वरदान ठरली आहेत. परंतु तरीही धारणी व चिखलदरा मेळघाटातील भागात तसेच मोर्शी तालुक्यातील काही भागात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही मोर्शी तालुक्यात सर्वात जास्त गावे टंचाईग्रस्त आहेत. सध्या पाणीटंचाई ज्या गावात निर्माण झाली त्या गावात टँकर किंवा विहीर अधिग्रहाणाव्दारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात जे १८ टँकर सुरू आहेत. त्यातील एकट्या चिखलदरा तालुक्‍यात १७ टँकर सुरू आहेत. तर चांदूर रेल्वे तालुक्यातील एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

बॉक्स

या गावांना टँकरने पाणीपुरवठा

चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, लवादा, अलाडोह, आकी, मलकापूर, सोमवारखेडा, मोथा, धरमडोह, बहादरपूर, तारूबांदा, तोरणवाडी, बगदरी, सोनापूर, रायपूर, सावऱ्या, आवागढ, कोयलारी, पाचडोंगरी, आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

बॉक्स

तालुकानिहाय विहीर अधिग्रहण

अमरावती १३, नांदगाव खंडेश्र्वर २०, भातकुली १, तिवसा ३, मोर्शी १४, वरूड ४, चांदूर रेल्वे २०, अचलपूर १२, चिखलदरा २९, धामणगाव रेल्वे २ आदी तालुक्यातील गावांना ११८ विंधन विहीर आणि खासगी विहिरींव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.