शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाई, ६३४ लाखांचा आराखडा

By admin | Updated: January 17, 2015 00:51 IST

जिल्ह्यात सध्या दुष्काळ असून उन्हाळ्याच्या दिवसात भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला होता.

जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यात सध्या दुष्काळ असून उन्हाळ्याच्या दिवसात भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला होता. यावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शिक्कामोर्तब केला आहे. दरवर्षी जिल्ह्यात आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यांत पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. त्यामुळे या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावांच्या प्रस्तावित कामे व उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षीही पाणी टंचाईचा पहिला टप्पा आटोपला असताना आता जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या दोन टप्प्यात जिल्ह्यातील ज्या गाव व वाड्या तसेच वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी तीनही टप्प्यातील संयुक्त आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यानुसार जानेवारी ते मार्च या कालावधीत १४६ गावे व वाड्यांमध्ये १५१ उपाययोजना केल्या जाणार असून यासाठी संभाव्य खर्च ३००.४६ लाख रुपये अपेक्षित आहेत. तर एप्रिल ते जून या कालावधीत २५३ गावे व वाड्यांमध्ये २७२ पाणी टंचाईसाठी विविध उपाययोजना करिता ३३४.०४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे संभाव्य गावातील पाणी टंचाईवर त्वरित मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने हा आराखडा तयार करुन तो कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यावर सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याने संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.