शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाई, ६३४ लाखांचा आराखडा

By admin | Updated: January 17, 2015 00:51 IST

जिल्ह्यात सध्या दुष्काळ असून उन्हाळ्याच्या दिवसात भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला होता.

जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यात सध्या दुष्काळ असून उन्हाळ्याच्या दिवसात भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला होता. यावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शिक्कामोर्तब केला आहे. दरवर्षी जिल्ह्यात आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यांत पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. त्यामुळे या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावांच्या प्रस्तावित कामे व उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षीही पाणी टंचाईचा पहिला टप्पा आटोपला असताना आता जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या दोन टप्प्यात जिल्ह्यातील ज्या गाव व वाड्या तसेच वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी तीनही टप्प्यातील संयुक्त आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यानुसार जानेवारी ते मार्च या कालावधीत १४६ गावे व वाड्यांमध्ये १५१ उपाययोजना केल्या जाणार असून यासाठी संभाव्य खर्च ३००.४६ लाख रुपये अपेक्षित आहेत. तर एप्रिल ते जून या कालावधीत २५३ गावे व वाड्यांमध्ये २७२ पाणी टंचाईसाठी विविध उपाययोजना करिता ३३४.०४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे संभाव्य गावातील पाणी टंचाईवर त्वरित मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने हा आराखडा तयार करुन तो कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यावर सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याने संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.