शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पाणी टंचाई, ६३४ लाखांचा आराखडा

By admin | Updated: January 17, 2015 00:51 IST

जिल्ह्यात सध्या दुष्काळ असून उन्हाळ्याच्या दिवसात भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला होता.

जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यात सध्या दुष्काळ असून उन्हाळ्याच्या दिवसात भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला होता. यावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शिक्कामोर्तब केला आहे. दरवर्षी जिल्ह्यात आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यांत पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. त्यामुळे या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावांच्या प्रस्तावित कामे व उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षीही पाणी टंचाईचा पहिला टप्पा आटोपला असताना आता जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या दोन टप्प्यात जिल्ह्यातील ज्या गाव व वाड्या तसेच वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी तीनही टप्प्यातील संयुक्त आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यानुसार जानेवारी ते मार्च या कालावधीत १४६ गावे व वाड्यांमध्ये १५१ उपाययोजना केल्या जाणार असून यासाठी संभाव्य खर्च ३००.४६ लाख रुपये अपेक्षित आहेत. तर एप्रिल ते जून या कालावधीत २५३ गावे व वाड्यांमध्ये २७२ पाणी टंचाईसाठी विविध उपाययोजना करिता ३३४.०४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे संभाव्य गावातील पाणी टंचाईवर त्वरित मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने हा आराखडा तयार करुन तो कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यावर सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याने संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.