शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

पूर्णा प्रकल्पाचे पाणी शिरले जसापूर गावात

By admin | Updated: October 22, 2015 00:15 IST

पूर्णा प्रकल्पाच्या कालव्यातून वाहणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे जसापूरवासीयांना गावामधून नदी वाहत असल्याचा अनुभव येत आहे.

प्रकल्प विभागाचे दुर्लक्ष : बांधकाम खात्याचा रस्ता जलमयचांदूर बाजार : पूर्णा प्रकल्पाच्या कालव्यातून वाहणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे जसापूरवासीयांना गावामधून नदी वाहत असल्याचा अनुभव येत आहे. त्या पाण्यामुळे जि.प. बांधकाम विभागाच्या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे.सद्यस्थितीत पूर्णा प्रकल्पातील कालव्यामधून रबी हंगामासाठी पाणी सोडणे सुरु झाले आहे. या प्रकल्पातील हैदतपूर उपलघु कालव्यामधून सुध्दा पाणी सोडणे सुरु आहे. जसापूर जवळून जाणाऱ्या या कालव्यामधून वाहणारे अतिरिक्त पाणी नाल्यांमध्ये न काढल्यामुळे हे पाणी रस्त्यावरुन वाहात आहे. या सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे गावातील रस्ते जलमय झाले आहेत. देऊरवाडा, शिरजगाव कसबा हा रस्ता तर पूर्णपणे पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येते. वास्तविक या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. वाहत्या पाण्यामुळे जि.प. बांधकाम विभागाने बांधलेल्या रस्त्याची पार वाट लागली आहे. चार वर्षांपासून हिच परिस्थिती असताना पाटबंधारे विभागाने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही. बांधकाम विभागाचे अधिकारी देखील मूग गिळून बसले आहेत. त्यामुळे या प्रकरणात नेमके पाणी मुरते कुठे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तीन वर्षांपासून पूर्णा प्रकल्पाकडे या संदर्भात तक्रारी दिल्या आहेत. मात्र, अद्याप रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची समस्या संबंधितांनी निकाली लावलेली नाही. पूर्णा प्रकल्पाने जर पाण्यासाठी पक्की नाली बांधून गावातील नाल्यात पाणी सोडल्यास हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघण्यास मदत होईल. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)कालव्याच्या अतिरिक्त पाण्यामुळे जसापूरमधून गेलेला जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा तीन किलोमिटर लांबीचा रस्ता खराब झाला आहे. नुकसान भरपाईसाठी प्रकल्पाला नोटीस देऊ.- अरूण रंगारी शाखा अभियंता, जि.प. बांधकाम विभाग